तत्त्वज्ञान

आत्मा आणि मानवी मेंदू

आत्मा आणि मानवी मेंदू
"इंद्रियाणि पराण्याहुरिंद्रियेभ्य: परं मन:।मनसस्तु परा बुद्धि: यो बुद्धे: परतस्तु स:।" [गीता ४२/३]

आस्तिक/नास्तिक

A philosopher: “All those who generalize are fools”
His friend: “You are one of them, as your statement itself is a generalization.”

नुकत्याच प्रसिध्द झालेल्या Global Index of Religion and Atheism (Win/Gallup International, 2013) सर्वेमधे काही आश्चर्यकारक आकडेवारी प्रसिद्ध झाली आहे. जगातील ५९% लोक स्वत:ला

कर्ज काढून तूप प्या

यावज्जीवेत सुखज्जीवेत ऋणं कृत्वा घृतं पिबेत
भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः

समाज रचनेला अर्थ आहे.

सध्याच्या समाज रचनेचा बारकाईने निरीक्षण केलं तर आपणास असे आढळून येईल कि,

नोकरी = अल्पबुद्धी कर्मतत्पर... कर्मचारी वर्ग ! { स्वतःचे पोट भरण्यात सुख मानणारे }
शूद्र म्हणजे वरील पूर्ण स्तरांना सेवा पुरवणारे, त्याना त्यांच्या त्यांच्या कार्यात मदत करणारे.

धंदा = पैसे असलेले बुद्धीजीवी जे मोठ्या मोठ्या व्यवहारांस भांडवल पुरवताव व चालू करतात... व्यापारी वर्ग !{ स्वतः चे व स्वतःच्या कुटुंबाचे समृद्धी करण्यात सुख मानणारे }

'डार्विन' ची वंशावळ

मानवाच्या उत्क्रांतीविषयी अनेक तर्क-वितर्कांचे फवारे गेली कित्येक वर्ष ' बुद्धीजीवी ' लोक उडवत आहेत. त्यातील सर्वात लोकप्रिय झालेले आणि बहुतांशी सर्वांनी मान्य केलेले तर्क म्हणजे "डार्विन चे सिद्धांत" !!! डार्विनच्या या नैसर्गिक निवडीच्या सिद्धांतानुसार, " या पृथ्वीवरील जीवजंतू हे नैसगिक बदला नुसार आपापल्या शरीर रचनेत बदल घडवून आणत असतात आणि या पृथ्वीतलावर जिवंत राहण्यासाठी प्रयत्न करत असतात". या नियमाला इंग्रजीमध्ये "Natural Selection" असे संबोधण्यात येते.

मोहन भागवत

देशभरातील जनता दिल्ली-बलात्कार गुन्ह्याने संतप्त आणि हतबुद्ध झाली आहे. या परिस्थितीत मोहन भागवत या संघिष्ठ सरसंघचालकांनी बलात्काराच्या घटना या भारतात होत नसून इंडियात होत आहेत असे हास्यास्पद विधान केले आहे. मोहन भागवत यांनी एकदा महाभारत वाचावे म्हणजे द्रौपदी ही भारतालीच होती (इंडियातली नव्हती) हे त्यांना समजून येईल. या महाशयांना ग्रामीण भारतात स्त्रियांविरुद्ध होणाऱ्या गुन्ह्यांची काहीच कल्पना नसावी हे आश्चर्यकारक आहे. भारतीय जनता पक्षाने अपेक्षेप्रमाणेच या व विधानाचा निषेध न करता मीडियाने भागवत यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला आहे ही नेहमीची टिमकी वाजवली आहे.

नशेचे पदार्थ खुले करुन चांगला समाज घडवा.

एक नवा विचार मांडतो आहे. कदाचित आधी कोणी मांडला ही असेल, पण मला माहीति नाही.

विचार वेड्गळ आहे असे पट्कन conclusion काढु नका. थोडा वेळ पचायला द्या.

नशेचे म्हणजे अफु, गान्जा, brown sugar असे पदार्थ कायदेशीर विक्री साठी खुले केले पाहेजेत. त्याचे असे फायदे होतील

१. हे पदार्थ filter म्हणुन काम करतील. ज्यांना काम करायचे आहे, जे सयंमी आहेत, ज्यांना जबाबदारी ची जाणिव आहे, ते ह्या मार्गाला जाणारच नाहीत. जे जातील त्यांना ह्या गोष्टी available असतील ते वापरतील आणि आपोआप च नष्ट होतिल. काही लोकांना थोड्या वेळानी अक्कल येइल, ते सुधारतील.

देश- राष्ट्र काहीसे विस्कळित....

वैधानिक इशारा:-
पुढील मजकूर काहिसा विस्कळित आणि वादावादी करताना अचानक आठवलेला मजकूर इतकाच समजावा. फार अधिक माहितीमूल्य वगैरे ह्यात अजिबात मिळणार नाही. नॉर्मल माणसांना आनंदाच्या उकळ्या फुटतात तशा आम्हाला विस्कळित प्रतिक्रियांच्या उकळ्या फुटतात असे समजून माफी करावी.
अठराव्या शतकात इंग्रज जिंकणारच होते. आपण एकसंध नव्हतो ना. भारत कधीच एकसंध वगैरे नव्हता ना. शेकडो राज्ये होती. एकसंध असा भारत नव्हता वगैरे वगैरे नेहमीची शाळकरी बडबड काल परवा कुणीतरी करत होतं.
शुंभांनो, त्याकाळी भारतच नव्हे, तर आख्खे जग तस्सेच होते. युरोपमध्ये सामंतशाहीचीच थोडी नवी आवृत्ती सुरु होती. खुद्द आज दिसणारा ब्रिटन/इंग्लंड/यू के असे काही एक राज्य नव्हते. जर्मनी , इटाली हे देश मुळातच अस्तित्वात नव्हते.

सुमारीकरणाचा उत्कर्षबिंदू की उथळीकरणाची नीचतम पातळीँ?

आजकाल जिथेतिथे 'विद्वान', 'व्यासंग' आणि 'व्यासंगी' हे शब्द प्रतिसादांतून लिखाणांतून मुक्तपणे फेकण्यात -- राजेश खन्नाच्या शैलीत सुपरफॉस्फेट, युरिया फेकावी तसे -- येतात.

 
^ वर