व्यक्तिचित्र

ओज-शंकराची कहाणी

श्री. शंकर दिनकर उपाख्य भैयाजी काणे (जन्मः ६ डिसेंबर १९२४, वरवडे, रत्नागिरी – मृत्यूः २६ ऑक्टोंबर १९९९, कोल्हापूर) हे न्यू तुसॉम, जिल्हा उख्रूल, मणीपूर राज्य, भारत, ह्या त्यांच्या कर्मभूमीत, ओज-शंकर म्हणून ओळखले जातात. तिथे, पूर्व-सीमा-विकास-प्रतिष्ठानतर्फे स्थापन करण्यात आलेल्या ओज-शंकर विद्यालयाच्या स्वरूपात, आज त्यांचे कार्य दिमाखाने उभे आहे. शिक्षणाद्वारे राष्ट्रीय एकात्मता साधण्याच्या त्यांच्या जीवनव्यापी ध्यासाचे, आज एका मोठ्या चळवळीत रूपांतरण झालेले आहे. त्या त्यांच्या भरतभूस ललामभूत ठरलेल्या कार्याची ही कहाणी आहे.

सुधारक आगरकर

भारतीय इतिहासामधील सुप्रसिध्ध असा एक किस्सा सांगितला जातो कि टिळक व सुधारक आगरकर यांच्यामध्ये "आधी समाजसुधारणा हवी कि आधी राजकीय स्वातंत्र्य मिळायला हवे" या दोन्ही बाबीवर या दोन्ही प्रिय मित्रांचे बिनसले. पुढे आगरकर आपल्या राहिले आणि समाजसुधारणा "बुधीप्रमाण्यावाद" नियमानुसार केली. व पुढे टिळक "राष्ट्रीय सभेमध्ये" जहालांचे प्रमुख नेते बनले.

धीरजभाई सोन्नेजी : एक वेगळ्या वाटेचा वाटसरू

धीरजभाई सोन्नेजी : एक वेगळ्या वाटेचा वाटसरू

अहमदाबादमध्ये इंजीनीयर ची सुखवस्तू नोकरी , राहतं घर , म्हणजे एकंदरीत अगदी सेटल्ड असं आयुष्य. तुमच्या माझ्यासारख्याला - जीने को और क्या चाहिये ! अहो, पण हे झालं , "शहाण्या" माणसांबद्दल. पण धीरजभाई एक "वेडा". पण एक "शहाणा" वेडा म्हणता येइल त्याला. शेवटी अशा मूठभर शहाण्या वेड्यांमुळेच तर जग चालतय ना !

छत्रपती घराणे...!!!

कशास हवा तुम्हा सिकंदर ,अन कशास हवा कोलंबस !
अरे छत्रपतीला स्मरा एकदा, शिव छत्रपतीला स्मरा एकदा,
अन बघा तुम्हीच कि हो सिकंदर, अन तुम्हीच हो कोलंबस !

शिवपत्नी सईबाई....!!!

छत्रपती शिवरायांच्या पहिल्या पत्नी. धर्मवीर संभाजी राजांच्या मातोश्री. जिजाऊ मातोश्रींची सर्वात प्रिय व संस्कार प्रिय सून. सईबाई या छत्रपती संभाजी राजांच्या आई होत्या, सईबाईंचे वडील माधोजीराव निंबाळकर होते. छत्रपती शिवरायांबरोबर सईबाईंचा विवाह झाला तेंव्हा त्या फक्त ७ वर्ष्याचा होत्या. आणि शिवराय ११ वर्ष्यांचे होते. त्यांच्या चेहऱ्याचा रंग गव्हाळ होता. त्या शिवरायांच्या स्फूर्तीस्थान आणि सामर्थ्यवान अश्या पत्नी होत्या. त्यांच्या मृत्युनंतर शिवरायांना त्यांची भरपूर उणीव भासली. संभू राजांना पाहताना शिवरायान पुढे सईबाईंची आभास मूर्ती उभी राहत असे. मृत्यू समयी शिवरायांच्या तोंडून शेवटचा शब्द "सई" निघाला होता.

जलतज्ञ माधव आत्माराम चितळे

आज २२-०३-२०१२. आंतरराष्ट्रीय जलविषयक जागृती दिन. त्यानिमित्ताने भारतातील विख्यात जलतज्ञ माधव आत्माराम चितळे यांच्या कार्याची आपण थोडक्यात ओळख करून घेऊ या.

अक्षरवेल

निसर्गकन्या", "सरस्वतीची लेक" या नावाने ओळखल्या जाणार्या बहिणाबाईंचे मराठी साहित्यात विशेष स्थान आहे.यांच्या नवाचा उल्लेख करताच " अरे संसार संसार ", मन वढाय वढाय" " माझी माय सरोसती " ही गाणी सहज ओठावर येतात.

गुटेनबर्ग प्रकल्पाचा जनक माय़केल स्टेर्न हार्ट (1947 - 2011)

ऍपल तंत्रज्ञान सुविधांचा सर्वेसर्वा स्टीव्ह जॉब्सच्या मृत्युनंतर ज्याप्रकारे जगभरातील सर्व प्रकारच्या माध्यमांमध्ये शोक प्रदर्शन करण्यासाठी चढाओढ दिसत आहे त्याच्या सहस्रांशानेसुद्धा या माध्यमांनी 6 सप्टेंबर, 2011 रोजी, वय

 
^ वर