संस्कृती

शिव शिव रे काऊ | हा पिंडाचा घेई खाऊ |

शिव शिव रे काऊ। हा पिंडाचा घेई खाऊ।
"शहाण्यांचा मूर्खपणा अर्थात् आपले प्रेतसंस्कार" या सुधारकातील लेखात आगरकर म्हणतात, "देशपरत्वे व धर्मपरत्वे उत्तरक्रियांचे अनेक प्रकार आहेत.मेलेल्या माणसाच्या प्रेताचा चटदिशी काहीतरी निकाल लावून मी आपला मोकळा होईन असे कोणालाही म्हणता येत नाही.शवाचा निकाल लावला म्हणजे हे काम आटोपते तर त्याविषयी विशेष चर्चा करण्याची गरज पडती ना.पण या दु:खदायक कामामागे त्याहूनही क्लेशकारक अशा विधींचे दुट्टें प्रत्येक धर्माने लावून दिले आहे. हिंदूंनी हे और्ध्वदेहिक प्रकरण भयप्रद,अमंगळ व कष्टमय केले आहे.गोवर्‍या रचण्यापासून राख होईपर्यंत आणि नंतरसुद्धा विधीच विधी.

ओज-शंकराची कहाणी

श्री. शंकर दिनकर उपाख्य भैयाजी काणे (जन्मः ६ डिसेंबर १९२४, वरवडे, रत्नागिरी – मृत्यूः २६ ऑक्टोंबर १९९९, कोल्हापूर) हे न्यू तुसॉम, जिल्हा उख्रूल, मणीपूर राज्य, भारत, ह्या त्यांच्या कर्मभूमीत, ओज-शंकर म्हणून ओळखले जातात. तिथे, पूर्व-सीमा-विकास-प्रतिष्ठानतर्फे स्थापन करण्यात आलेल्या ओज-शंकर विद्यालयाच्या स्वरूपात, आज त्यांचे कार्य दिमाखाने उभे आहे. शिक्षणाद्वारे राष्ट्रीय एकात्मता साधण्याच्या त्यांच्या जीवनव्यापी ध्यासाचे, आज एका मोठ्या चळवळीत रूपांतरण झालेले आहे. त्या त्यांच्या भरतभूस ललामभूत ठरलेल्या कार्याची ही कहाणी आहे.

मंत्रसामर्थ्य

परवा एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना एक उच्चशिक्षित अध्यात्मवादी म्हणाले, "ॐ या शब्दात प्रचंड शक्ती आहे. विज्ञानाने हे सिद्ध केले आहे.”
त्यांच्या या विधानात काही तथ्य आहे काय? या ऊर्जेचा प्रत्यक्ष प्रत्यय कधी,कोणाला, कोठे, कसा आला? ॐ मधील प्रचंड ऊर्जेचे अस्तित्व विज्ञानाने कोणत्या पद्धतीने सिद्ध केले? भर सभेत असली भरमसाट विधाने करायला अध्यात्मवादी कसे धजावतात? अर्थात सभेतील अनेक भोळसट गलिबलांना असली विधाने महान सत्ये वाटतात .ते स्वबुद्धीने विचार न करता माना डोलावतात,वा! काय विद्वत्ता आहे असे म्हणतात , हे खरे.

स्त्री जन्मा...ही तुझी कहाणी....!

स्त्री जन्मा...ही तुझी कहाणी....!

हिमाचल प्रदेश मधील "कुल्लू" या शहराला देवता ची घाटी म्हटले जाते, हि घाटी आपल्या चित्र विचित्र अंधश्रद्धा आणि देव परंपरा यासाठी प्रसिद्ध आहे. इथल्या बोली भाषेला "गणाशी" म्हटले जाते. त्या घाटीमध्येच "मलाणा" हे गाव असून, या गावात अशी मान्यता आहे, या गावावर फक्त देवाचे शासन चालते, या गावाच्या भूमीवर "जमलु" नामक देवताचा अधिकार असून गावातील लोक त्याची प्रजा आहेत.

"जमलु" नामक देवताच्या परवानगी शिवाय या गावात कोणी येवू शकत नाही आणि बाहेर देखील जाऊ शकत नाही, देवाच्या मुखातून बाहेर पडलेला शब्द हा अखेरचा मानला जातो...!

आर्य टिळा का लावतात...??

टिळा लावल्याने समाजामध्ये मान-सन्मान ने पाहतात. आर्य धर्मात प्रत्येक शुभ कार्यात टिळा लावणे हि प्रथा आहे. टिळा अनेक वस्तू आणि पदार्थाचे असतो.

उदा. हळदी, कुंकू, केशर, भस्म आणि चंदन हे प्रमुख आहे. पण तुम्हाला माहित आहे टिळा लावण्या मागे काय भावना असते...??
पुराणामध्ये असे लिहिलेले आहे कि, संगमाच्या किनार्यावर "गंगा स्नान" केल्यानंतर साधू\पंडित द्वारे टिळा लावल्यास मोक्ष प्राप्ती होते. कपाळावर टिळा लावण्यामागे आध्यात्मिक महत्व आहे. आपल्या शरीरात सात (७) सुश्मउर्जा केंद्र आहे जे अपार शक्ती चे भांडार आहे.

समाज रचनेला अर्थ आहे.

सध्याच्या समाज रचनेचा बारकाईने निरीक्षण केलं तर आपणास असे आढळून येईल कि,

नोकरी = अल्पबुद्धी कर्मतत्पर... कर्मचारी वर्ग ! { स्वतःचे पोट भरण्यात सुख मानणारे }
शूद्र म्हणजे वरील पूर्ण स्तरांना सेवा पुरवणारे, त्याना त्यांच्या त्यांच्या कार्यात मदत करणारे.

धंदा = पैसे असलेले बुद्धीजीवी जे मोठ्या मोठ्या व्यवहारांस भांडवल पुरवताव व चालू करतात... व्यापारी वर्ग !{ स्वतः चे व स्वतःच्या कुटुंबाचे समृद्धी करण्यात सुख मानणारे }

भारतीयांना भारतीय संस्कृती नकोशी झालीय का?

भारतात आल्यावर नेहेमीच काही तरी बदल पाहायला मिळतो. अलीकडे लोकांचा सूर पूर्णपणे बदलेला आढळतो. सगळ्याच प्रांतामधले कर्मचारी जेव्हा एखादी गोष्ट नजरेस आणून द्यायची असेल त्यावेळी सांगतात - Here in India THEY do it like this.., THEY call it xyx ..., इत्यादी
पूर्वी ते सांगत - Here in India WE do it like this.., WE call it xyx ..., हा बदल कशामुळे असावा? त्याचप्रमाणे पूर्वी Admin, Housekeeping चे लोक नमस्ते म्हणत असत, आता ते सुद्धा Hello Sir असेच म्हणतात.
त्याचप्रमाणे चित्रपट खूपच बदलेले दिसतात. कथा काही का असेना, काही भाग तरी परदेशात चित्रित झालेला आढळतो. किमान गाणी तरी.

मराठी वृत्त वाहिन्यांवरील भाषा थोडी सुधारता येईल का?

प्रचंड लोकप्रिय (!) असलेल्या मराठी वृत्तवाहिन्या आपले वार्ताहर नेमतांना त्यांचे भाषेवरील प्रभुत्व बहुतेक पाहत नसावेत.

त्यांचे मराठी उच्चार नेहमीच चुकत असतात आणि त्यांना ते उच्चार बरोबर आहेत असेच वाटते. जसे 'च' ह्याचा उच्चार 'च्य' करणे, 'ज' चा उच्चार 'ज्य' करणे. उदाहरणर्थ - नरेंद्र ज्यादव (जाधव), विठूनामाचा गज्यर (गजर).

त्याचप्रमाणे मराठी वाक्प्रचार आणि समर्पक शब्द माहित नसल्याने हिंदी वाक्प्रचार वापरणे. जसे - काट्याची टक्कर (हसू नका, हे नेहमी वापरले जाते), चार चांद लागले, इत्यादी.

जगन्मातेची प्रतिमा

नवरात्रीचे दिवस सुरू आहेत. सोशल नेटवर्किंग साइटवरल्या एका ग्रुपमध्ये एक प्रसंग त्या निमित्ताने घडला. तेथे अनेक उपक्रमी असल्याने त्यांनी या चर्चेत भाग घेतलाच पण इतर उपक्रमींचे मत यावर जाणून घेणे महत्त्वाचे वाटले म्हणून चर्चा प्रपंच. लज्जागौरीचे चित्र टाकून त्या जग्नमातेला नमस्कार करणार्‍या एका गुणी इतिहास तज्ञाच्या पोस्टवर अनेक लोकांच्या भावना आईला/ मातेला अशा स्वरूपात दाखवल्याने दुखावल्या.

लज्जागौरीचे चित्र येथे देत आहे. ते उपक्रमींना नवे नसावे. हा मातृकेचा प्राचीन फॉर्म आहे.

कौषीतकी उपनिषद आणि काही प्रश्न

माझ्या मुलीला इतिहासाच्या अभ्यासासाठी कौषीतकी उपनिषद आहे. असे लक्षात आले की मुलांना त्याचा संदर्भ आणि थोडाफार अर्थ कळला तरी अधिकाराने त्यावर भाष्य करणे किंवा त्यावर आधारित उत्तरे देणे जमलेले नाही. मला उपनिषदे, अध्यात्म वगैरे गोष्टींमध्ये अजिबात गती नाही. कौषीतकी हा शब्द देखील मी व्यवस्थित लिहिला आहे की नाही याची कल्पना नाही. थोडेफार समजवून दिल्यावर पुढे मला अधिकारवाणीने समजावता येत नाही.

 
^ वर