सामाजिक

बाजारीकरण

गुरुवारच्या (दिनांक १८-०७-२०१३) महाराष्ट्र टाईमसमधे प्रा. जयंत नारळीकर यांनी शिक्षण क्षेत्रातील संशोधनाच्या बाजारीकरणा बाबतीत व्यक्त केलेली मते वाचली. या क्षेत्रातील दुरावस्थेचे खापर त्यांनी 'commercialization’ म्हणजे बाजारीकरणाच्या माथी मारले आहे. तसेच “बॅक टू फ्युचर” मधे पूर्व संकल्पनांच्या पगड्यामुळे खगोल भौतिकी विज्ञानवादी दृष्टीकोन समाजातून हद्दपार झाला आहे अशी खंत व्यक्त केली आहे. दुर्दैवाने प्रा. नारळीकर स्वतःच या पूर्व संकल्पनांना बळी पडले आहेत.

गर्भधारणेचे बाजारीकरण

जननक्षमतेचा व्यापार

विज्ञान (व तंत्रज्ञान) शिक्षण व वैज्ञानिक दृष्टिकोन

श्रद्धेच्या प्रांतातील विसंगतीवर बोट ठेवण्यासाठी बुद्धीप्रामाण्यवादी चिकित्सक अनेक वैज्ञानिक पुरावे सादर करत असतात; प्रत्यक्ष प्रयोगांचे दाखले देत असतात; समीकरण मांडतात; सर्वेक्षणाच्या निष्कर्षांचे दाखले देतात; ग्राफ्स काढून मुद्दा पटवण्याचा प्रयत्न करतात. या त्यांच्या पुराव्यातून, दाखले - संदर्भातून भ्रामक विज्ञानाच्या आधारे चढवलेले श्रद्धेचे इमले कोसळू लागतील, असा एक (भाबडा) आशावाद चिकित्सक कार्यकर्त्यांच्या मनात दडलेला असतो. परंतु सश्रद्धांच्या समोर हे सर्व पालथ्या घागरीवर पाणी ओतल्यासारखे होत असते.

शिव शिव रे काऊ | हा पिंडाचा घेई खाऊ |

शिव शिव रे काऊ। हा पिंडाचा घेई खाऊ।
"शहाण्यांचा मूर्खपणा अर्थात् आपले प्रेतसंस्कार" या सुधारकातील लेखात आगरकर म्हणतात, "देशपरत्वे व धर्मपरत्वे उत्तरक्रियांचे अनेक प्रकार आहेत.मेलेल्या माणसाच्या प्रेताचा चटदिशी काहीतरी निकाल लावून मी आपला मोकळा होईन असे कोणालाही म्हणता येत नाही.शवाचा निकाल लावला म्हणजे हे काम आटोपते तर त्याविषयी विशेष चर्चा करण्याची गरज पडती ना.पण या दु:खदायक कामामागे त्याहूनही क्लेशकारक अशा विधींचे दुट्टें प्रत्येक धर्माने लावून दिले आहे. हिंदूंनी हे और्ध्वदेहिक प्रकरण भयप्रद,अमंगळ व कष्टमय केले आहे.गोवर्‍या रचण्यापासून राख होईपर्यंत आणि नंतरसुद्धा विधीच विधी.

गाडगीळ समीती अहवाल

हा लेख मी मागच्याच धाग्यात सर्वेच्या नंतर प्रकाशित केला पण त्याकडे वाचकांचे फारसे लक्श गेले नाही. सहाजीकच आहे, कारण वाचकांना हे कसे कळणार कि नवीन प्रतिसाद म्हणजे सम्पूर्ण लेख आहे? त्यांना वाटले असेल कि सर्वे वरच चर्चा पुढे चालू आहे. म्हणून तो लेख परत जसाच्या तसा नवीन धाग्यात प्रकाशित करत आहे.

पश्चिम घाटात पर्यावरण संरक्षण

एक लेख लिहीणे आहे. पण तो "लिहीण्यात" असे पर्यंत आधी एक लहानसा सर्वे. पश्चिम घाटात पर्यावरण संरक्षणा करता काही सूचना आहेत. यातील कोणकोणत्या तुम्हाला मान्य आहेत किंवा नाहीत याचा सर्वे.

१: कोयना, भाटघर, मुळशी, इत्यादी प्रकल्पातून वीज निर्मिती ताबडतोब पूर्ण बंद करावी
२: पश्चिम घाटात असलेल्या सर्व औष्णिक प्रकल्पातून पण वीज निर्मिती ताबडतोब पूर्ण बंद करावी
३: कोणतेही नवीन विद्युत प्रकल्प - जल, औष्णिक - अर्थातच पूर्ण बंदी
४: कोयना, भाटघर, मुळशी, पानशेत, वरसगाव, खडकवासला, इत्यादी धरणे पाडून टाकावीत

एथिक्स म्हणजे काय रे भाऊ?

एथिक्स म्हणजे काय रे भाऊ? हा प्रश्न विचारावासा वाटला कारण नानवटी यांच्या तंत्रज्ञान विषयीच्या धाग्यात या बाबत काही चर्चा झाली व अनेक वर्षापूर्वी मसूरी येथे लाल बहादूर शास्त्री National Academy of Administration येथे Foundations of Administration या अभ्यासक्रमात झालेल्या काही चर्चेची व त्या नंतर सरकारी नोकरीत असताना उपस्थित झालेल्या अनेक प्रश्नांची आठवण झाली.

ओज-शंकराची कहाणी

श्री. शंकर दिनकर उपाख्य भैयाजी काणे (जन्मः ६ डिसेंबर १९२४, वरवडे, रत्नागिरी – मृत्यूः २६ ऑक्टोंबर १९९९, कोल्हापूर) हे न्यू तुसॉम, जिल्हा उख्रूल, मणीपूर राज्य, भारत, ह्या त्यांच्या कर्मभूमीत, ओज-शंकर म्हणून ओळखले जातात. तिथे, पूर्व-सीमा-विकास-प्रतिष्ठानतर्फे स्थापन करण्यात आलेल्या ओज-शंकर विद्यालयाच्या स्वरूपात, आज त्यांचे कार्य दिमाखाने उभे आहे. शिक्षणाद्वारे राष्ट्रीय एकात्मता साधण्याच्या त्यांच्या जीवनव्यापी ध्यासाचे, आज एका मोठ्या चळवळीत रूपांतरण झालेले आहे. त्या त्यांच्या भरतभूस ललामभूत ठरलेल्या कार्याची ही कहाणी आहे.

नैतिकतेचा ब्रह्मघोटाळा

1आवडले! नैतिक पेचप्रसंग उभे करणारे काही प्रसंग जालावर डॉ खरे ह्यांच्या मिसळपावावरील लिखाणात वाचले. पदवीदरम्यान असलेल्या principles of ethics and cyber laws ह्या विषयाची मग आठवण झाली. त्यात चित्रविचित्र किस्से, निर्णयक्षमतेची कसोटी पाहणारे प्रश्न असत. त्यातली आमची उत्तरे व्यक्तिसापेक्ष बदलत. आम्ही उत्तरे काहीही दिली तरी चालत; पण योग्य ते जस्टिफिकेशन आम्हाला देता येते आहे की नाही; हे पाहिले जात.(वाद विवाद स्पर्धेप्रमाणे; कुठलीही बाजू मांडा; बक्षीस मिळू शकेल; पण तुमचा त्यातला अभ्यास दिसायला हवा.)
.

 
^ वर