सामाजिक

भारतीयांना भारतीय संस्कृती नकोशी झालीय का?

भारतात आल्यावर नेहेमीच काही तरी बदल पाहायला मिळतो. अलीकडे लोकांचा सूर पूर्णपणे बदलेला आढळतो. सगळ्याच प्रांतामधले कर्मचारी जेव्हा एखादी गोष्ट नजरेस आणून द्यायची असेल त्यावेळी सांगतात - Here in India THEY do it like this.., THEY call it xyx ..., इत्यादी
पूर्वी ते सांगत - Here in India WE do it like this.., WE call it xyx ..., हा बदल कशामुळे असावा? त्याचप्रमाणे पूर्वी Admin, Housekeeping चे लोक नमस्ते म्हणत असत, आता ते सुद्धा Hello Sir असेच म्हणतात.
त्याचप्रमाणे चित्रपट खूपच बदलेले दिसतात. कथा काही का असेना, काही भाग तरी परदेशात चित्रित झालेला आढळतो. किमान गाणी तरी.

आकाश टॅब्लेट पीसीची 'सुरस' कहाणी !

शासनाने प्रसिद्ध केलेली आकडेवारी, अहवाल व रोज करत असलेल्या आश्वासनांची खैरात यांच्यावर विश्वास ठेऊन आपल्या देशाच्या प्रगतीचा आढावा घेत असल्यास आपला देश अमेरिकेसकट सर्व विकसित राष्ट्रांना मागे टाकून क्रमांक एकवर केव्हाच पोचला असता. त्यासाठी एपीजे कलाम व भविष्यवेध घेणाऱ्या इतर टेक्नोक्रॅट्स यांनी निर्दिष्ट केलेल्या 2020सालाची वाट पहायची गरज पडली नसती. मुळात टेक्नोक्रॅट्सचा भर आपण विकसित करत असलेल्या तंत्रज्ञानावर आहे. तोंडपाटीलकी करून तंत्रज्ञान विकसित होत नसतात. याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणून भरपूर गाजावाजा केलेल्या आकाश टॅब्लेट पीसीचा उल्लेख करता येईल.

भारतातिल परिस्थिती

मित्रांनो, आपण या अखंड भारतात राहतो. एकदा फिरल्याशिवाय हा भारत किती मोठा आहे ते कळत नाही! तर या भारतात खुप मोठे आव्हान आज उभे ठाकले आहेत.
1) आज भारताला जर कोणता धोका असेल तर तो ' चीनचा' ! आज चीनी वस्तुंनी पुर्ण बाजारपेठ व्यापून टाकली आहे. शिवाय आपल्या पारंपारिक शत्रुशी पाकिस्तानशी हातमिळवणी करुन आपल्यासमोर आव्हान निर्माण केले आहे.

गेट्स फौंडेशनचा पुढाकार: संडास सुधार संशोधन

दि बिल अँड मिलिंडा गेट्स फौंडेशनच्या मते जगभर वापरात असलेल्या आताच्या (भारतीयांचे स्क्वॉटिंगच्या वा कमोडच्या) फ्लश टाइप संडास रचनेत सुधारणा करण्यास भरपूर वाव आहे. आपल्यासाऱख्या शहरी मध्यमवर्गीयांना आताच्या फ्लश टॉयलेटमध्ये काही उणीवा असू शकतील असे वाटत नाही. 1880 सालापासून त्या वापरात असून गेली सव्वाशे वर्षे त्यातील प्रत्येक पार्ट न पार्ट मधील डिझाइनमध्ये सुधारणा होत होत आता त्याचे optimization झालेले असावे. त्यातील फ्लशसाठी असलेल्या अत्यंत महत्वाच्या पार्टची "S", "U", "J", वा "P" आकारातून उत्क्रांत होत होत आजच्या स्थितीला ती पोचलेली आहे.

जगन्मातेची प्रतिमा

नवरात्रीचे दिवस सुरू आहेत. सोशल नेटवर्किंग साइटवरल्या एका ग्रुपमध्ये एक प्रसंग त्या निमित्ताने घडला. तेथे अनेक उपक्रमी असल्याने त्यांनी या चर्चेत भाग घेतलाच पण इतर उपक्रमींचे मत यावर जाणून घेणे महत्त्वाचे वाटले म्हणून चर्चा प्रपंच. लज्जागौरीचे चित्र टाकून त्या जग्नमातेला नमस्कार करणार्‍या एका गुणी इतिहास तज्ञाच्या पोस्टवर अनेक लोकांच्या भावना आईला/ मातेला अशा स्वरूपात दाखवल्याने दुखावल्या.

लज्जागौरीचे चित्र येथे देत आहे. ते उपक्रमींना नवे नसावे. हा मातृकेचा प्राचीन फॉर्म आहे.

नशेचे पदार्थ खुले करुन चांगला समाज घडवा.

एक नवा विचार मांडतो आहे. कदाचित आधी कोणी मांडला ही असेल, पण मला माहीति नाही.

विचार वेड्गळ आहे असे पट्कन conclusion काढु नका. थोडा वेळ पचायला द्या.

नशेचे म्हणजे अफु, गान्जा, brown sugar असे पदार्थ कायदेशीर विक्री साठी खुले केले पाहेजेत. त्याचे असे फायदे होतील

१. हे पदार्थ filter म्हणुन काम करतील. ज्यांना काम करायचे आहे, जे सयंमी आहेत, ज्यांना जबाबदारी ची जाणिव आहे, ते ह्या मार्गाला जाणारच नाहीत. जे जातील त्यांना ह्या गोष्टी available असतील ते वापरतील आणि आपोआप च नष्ट होतिल. काही लोकांना थोड्या वेळानी अक्कल येइल, ते सुधारतील.

आपला समाज इतका नकारवादी व निराशावादी का ?

चर्चेचा हा नवा विषय "कोकणासाठी हवी जल वाहतूक" या चर्चेत प्रसाद१९७१ यांच्या प्रतिसादातून पुढे आलेला आहे. प्रसाद१९७१ यांनी लिहिले होते "ह्या लेखा मागचा उद्देश च कळला नाही. लेखक विसरले असावेत की ते भारत नावाच्या देशात रहातात. इथे तर मुलभुत सुविधा नाहीत आणि होण्याची शक्यता नाही. निम्मा देश अर्धपोटी झोपतो. तिथे लेखकाची हि अपेक्षा अगदीच भाबडी आहे. कोकणात जल वाहतुक होण्या आधी PMT सुधरु दे, आहेत ते रस्ते थोडे बरे होउ देत. . . . . इथे काहीही होणार नाही. आहे त्याच्यात सुख माना. "

खैरलांजी हत्याकांडात न्याय मिळाला का ?

खैरलांजी हत्याकांडात न्याय मिळाला का ?

राज्य - हक्क - विकास आणि देश

सध्या नितिश कुमारांचा मुद्दा - "बिहारला विषेश दर्जा हा बिहारचा हक्कच आहे" चर्चेत आहे. या मुद्यामागे असलेले राजकारण सर्वचजण जाणतात. पण हि एक धोक्याची घंटा वाटते आहे. भारतातले प्रादेशिक पक्ष, प्रत्येक राज्याच्या मागण्या आणि त्यासाठीचे होणारे केंद्र सरकार बरोबरचे सौदे जर असेच सुरु राहिले तर आपली देश हि संकल्पना लवकरच बदलत जाईल असे वाटते. या विषयाला धरुन अनेक प्रश्न समोर येतात. ते तसे जुनेच आहेत. पण सध्याच्या वातावरणाला जास्त अस्थिर बनवणारे आहेत. तुम्हाला काय वाटते?

बिहारला असा विषेश दर्जा द्यावा का?
असे केल्यास अशी कोणती राज्य आहेत ज्यांना असा दर्जा देणे जास्त गरजेचे आहे?

चिल्लर पार्टी

पुण्यात मुंढवा रोडवरील ' हॉटेल रिव्हर व्ह्यू ' मध्ये झालेल्या चिल्लर पार्टीच्या सविस्तर बातम्या काल न्यूज चॅनेल्सवर झळकत होत्या. त्यानुसार ७०० च्या वर ९ वी ते १२ वी च्या मुलामुलींचा यात समावेश होता. ह्यातली बहुतेक मुले मुली दारू पिऊन स्विमिंग पूल आणि आजूबाजूला डॉल्बीच्या कर्णकर्कश आवाजात धिंगाणा घालत होती. काही मुलेमुली तर पोलिसांनी धाड टाकली तेंव्हा बोलण्या चालण्याच्या शुद्धीत नव्हती.

फेसबुक , ब्लॅकबेरी मेसेंजर, तसेच माऊथ टू माऊथ पब्लिसिटीमुळे ही पार्टी इतकी रंगली म्हणे.
मला पडलेले काही प्रश्न –

 
^ वर