सामाजिक

नेटिझन्सचा उर्मटपणा!

संगणक (व संगणकाशी संबंधित मोबाइल फोन, इंटरनेट, लॅपटॉप, वाय फाय, नेटबँकिंग, मोबाइल बँकिंग व इतर सर्व माहिती तंत्रज्ञान सुविधा) माणसांना चांगली माणसं बनण्यासाठी मदत करतात, हे संगणक क्षेत्रातील एका तज्ञाचे विधान आहे. परंतु निदान ब्लॉगोस्फेरमधील अनुभवावरून तरी नेटवरील माणसं उदात्त, शहाणे, संवेदनशील झाले आहेत, याबद्दल शंका घ्यावीशी वाटते. आपण कल्पनाही करू शकणार नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात संगणक आपल्या आयुष्याला व्यापलेले आहे. संगणक निरक्षरता हद्दपार होत आहे. नेट आता प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनत आहे.

राज यांनी मोर्चा काढून काय साधले?

राज ठाकरेंनी आझाद मैदानावर यशस्वी मोर्चा काढून एका दगडात अनेक पक्षी टिपले आहेत असे सर्वत्र म्हणले जात आहे. यावर लोकसत्तेतील अग्रलेख "राज आणि पृथ्वीराज" येथे वाचा -

http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=245...

घरमालकांनो सावधान.....भाडेकरूची माहिती द्या....नाहीतर...!!!

रोज सकाळी उठल्या उठल्या हातात वर्तमानपत्र लागते, (फक्त वाचण्यासाठी) आता न्यूज चानेल च्या भाऊगर्दीत वर्तमानपत्राचे काय एवढे महत्व...असे डायलॉग मारू नका. पण आख्या दिवसाच्या बातम्या एकदाच वाचायला मिळतात ना...तर असो, तर सकाळी-सकाळी सकाळ वाचायला घेतला अन सकाळचा (वर्तमानपत्राचा) मथळा पाहून सकाळीच माथा सरकला, बातमी होती, "भाडेकरूंची माहिती न देणाऱ्या 28 घरमालकांवर गुन्हे." भाडेकरूंची माहिती न देणाऱ्या 28 घरमालकांवर शहरातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले असून, अटक आणि अर्थीक दंड हि होऊ शकतो.

संतप्त भारतीयांची महासत्ता - तुम्हाला हवीय?

Do we really want a superpower India populated by angry Indians? ( http://economictimes.indiatimes.com/opinion/comments-analysis/do-we-real...) हा लेख नुकताचा वाचनात आला. गेल्या काही वर्षांत घडणार्‍या व्यथित/त्रस्त/दु:खी/उद्वीग्न करणार्‍या अनेक घटनांच्या पार्श्वभूमीवर विचार करण्यास प्रवृत्त करणारा हा लेख आहे.

या लेखाच्या संबधाने पुढील प्रश्न पडले.

१. भारत खरेच एका व्यापक सामाजिक उद्रेकाच्या उंबरठ्यावर उभा आहे का?
२. लेखकाने दिलेली कारणे तुम्हाला पटतात का? त्याशिवायही काही कारणे असू शकतील असे तुम्हाला वाटते का?

देश- राष्ट्र काहीसे विस्कळित....

वैधानिक इशारा:-
पुढील मजकूर काहिसा विस्कळित आणि वादावादी करताना अचानक आठवलेला मजकूर इतकाच समजावा. फार अधिक माहितीमूल्य वगैरे ह्यात अजिबात मिळणार नाही. नॉर्मल माणसांना आनंदाच्या उकळ्या फुटतात तशा आम्हाला विस्कळित प्रतिक्रियांच्या उकळ्या फुटतात असे समजून माफी करावी.
अठराव्या शतकात इंग्रज जिंकणारच होते. आपण एकसंध नव्हतो ना. भारत कधीच एकसंध वगैरे नव्हता ना. शेकडो राज्ये होती. एकसंध असा भारत नव्हता वगैरे वगैरे नेहमीची शाळकरी बडबड काल परवा कुणीतरी करत होतं.
शुंभांनो, त्याकाळी भारतच नव्हे, तर आख्खे जग तस्सेच होते. युरोपमध्ये सामंतशाहीचीच थोडी नवी आवृत्ती सुरु होती. खुद्द आज दिसणारा ब्रिटन/इंग्लंड/यू के असे काही एक राज्य नव्हते. जर्मनी , इटाली हे देश मुळातच अस्तित्वात नव्हते.

वांग मराठवाडीची संघर्षगाथा...

काही दिवसांपूर्वी मी वांग मराठवाडीला भेट देऊन आलो. त्याबद्दल इथे लिहिलं आणि खूप जणांनी जाहिर / वैयक्तिक प्रतिसाद दिले. काही जणांनी नेमके प्रश्न विचारून या सर्वच प्रकरणाबद्दल अधिक जाणून घ्यायची उत्सुकता दाखवली. काही जणांनी प्रत्यक्ष मदत करायच्या दिशेने पाऊल टाकले. सगळ्यांचेच आभार. मनापासून.

त्या लेखात मी म्हणलं होतं की माझी माहिती फार तोकडी आहे. आणि म्हणूनच, या संघर्षात, सुरूवातीपासून आघाडीवर असणार्‍या सुनिती सु. र. यांनी लिहिलेला हा लेख इथे देत आहे. त्यावरून अजून बर्‍याच बाबी वाचकांना नीट समजतील अशी आशा आहे. या बाबतीत काही प्रश्न असल्यास ते सुनितीताईंपर्यंत पोचवायचा आणि त्यांचे म्हणणे इथे मांडण्याचा प्रयत्न राहिल.

वांग मराठवाडी... एक (इन प्रोग्रेस) सत्याग्रह!

गेल्या काही दिवसांपासून, किंवा महिन्यांपासून म्हणा हवं तर, वांग मराठवाडी हे नाव सतत कानावर येत होतं. मधून मधून मेल्स येत असत. त्या सगळ्यावरून झालेलं आकलन एवढंच होतं की सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात वांग नदीवर मराठवाडी इथे एक धरण बांधलं जात आहे. शासकिय भाषेत बोलायचं तर 'वांग मध्यम प्रकल्प'. आणि बहुतेक सगळ्या धरणांच्या बाबतीत होतं तसं इथेही पुनर्वसनाच्या नावाने बोंब आहे. मात्र मागच्या आठवड्यात मेल आलं की आता तिथे सत्याग्रह चालू होतोय. सत्याग्रह म्हणजे, आपल्या हक्काच्या जमिनीवर पेरणी करणं, तिथे ठाम उभं राहणं. पाणी चढलं तरी हरकत नाही. पाहिजे तर बुडून मरू पण हक्क सोडायचा नाही. नर्मदेतले अशा पद्धतीचे फोटो बघितलेच असतील बहुतेकांनी. इथेही तसंच काहीसं.

हा खेळ सावल्यांचा

काही दिवसांपूर्वी आपण डॉ. श्री. बालाजी तांबे यांच्या लेखाविषयी आणि त्यांचा पुरस्कार करणार्‍या 'भविष्यपत्रा'विषयी (दैनिक सकाळ) चर्चा केली. (पाहा: हिग्ज बोसॉन आणि भविष्यपत्राचा अजेंडा
http://mr.upakram.org/node/3804 )

आंद्रे साखारॉव्ह: विश्वशांतीचा ध्यास घेतलेला अणुशास्त्रज्ञ


'नेचर' या विज्ञानविषयक साप्ताहिकातील 'मिलेनियम एस्सेज' या सदर लेखनात एका वैज्ञानिकाने आंद्रे साखारॉव्हच्या (1921 - 1989) कार्याची तुलना महात्मा गांधीजींच्या जीवनकार्याबरोबर करता येते असा उल्लेख केला होता. कुशाग्र बुद्धिमत्ता, आसाधारण मानसिक धैर्य व प्रामाणिकपणा या गुणांच्या जोरावर कुठल्याही राजकीय वा लष्करी दबावाला वा विरोधाला न जुमानता, प्रसंगी स्वत:चे जीवन धोक्यात घालून आपले उद्दिष्ट साधणारे विसाव्या शतकातील हे दोन महान नेते होते. पाशवी शक्तीविरुद्ध एकाकी लढताना लोक जागृती हेच ध्येय समोर ठेवून त्यानी आयुष्यभर लढा दिला. कारण या दोघानाही भविष्यकाळात मानव वंशावर कोसळणाऱ्या संकटांची पूर्ण कल्पना होती. माणूस म्हणून स्वत:वरील जबाबदारी टाळणे वा ऐन मोक्याच्या क्षणी निष्क्रीय राहणे ही एका प्रकारे स्वत:शीच केलेली प्रतारणा आहे, असे त्यांना वाटत होते.

सुमारीकरणाचा उत्कर्षबिंदू की उथळीकरणाची नीचतम पातळीँ?

आजकाल जिथेतिथे 'विद्वान', 'व्यासंग' आणि 'व्यासंगी' हे शब्द प्रतिसादांतून लिखाणांतून मुक्तपणे फेकण्यात -- राजेश खन्नाच्या शैलीत सुपरफॉस्फेट, युरिया फेकावी तसे -- येतात.

 
^ वर