राजकारण

2014 ...पंतप्रधान पद आणि भाजप

आजच्या घडीला नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान पदाचे अतिशय योग्य उमेदवार आहेत ,हे 1000% सत्य आहे.परंतु काहीवेळा सत्य आणि परिस्थितीनुरूप वास्तव यात फरक असतो. आज शिवसेनेने पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषित करण्यापूर्वि एनडीए च्या सर्व घटकपक्षांना विश्वासात घ्या असे आवाहन केले आहे. भाजपचे पक्ष पातळी वरील विस्कळीत संघटन आणि सुसूत्रतेचा अभाव , कर्नाटकातील खेळखंडोबा आणि मोदींच्या नावाला असलेला नितीशकुमारचा विरोध यासारख्या बाबी विचारात घेता 2014 च्या निवडणुकीत नक्की काय होईल,याबाबत शंकेची पाल चुकचुकते.

समाज रचनेला अर्थ आहे.

सध्याच्या समाज रचनेचा बारकाईने निरीक्षण केलं तर आपणास असे आढळून येईल कि,

नोकरी = अल्पबुद्धी कर्मतत्पर... कर्मचारी वर्ग ! { स्वतःचे पोट भरण्यात सुख मानणारे }
शूद्र म्हणजे वरील पूर्ण स्तरांना सेवा पुरवणारे, त्याना त्यांच्या त्यांच्या कार्यात मदत करणारे.

धंदा = पैसे असलेले बुद्धीजीवी जे मोठ्या मोठ्या व्यवहारांस भांडवल पुरवताव व चालू करतात... व्यापारी वर्ग !{ स्वतः चे व स्वतःच्या कुटुंबाचे समृद्धी करण्यात सुख मानणारे }

ईंदु मिल

बाबासाहेबांवर असलेल्या निसिम्म प्रेमापोटी, त्यांच्या स्मरकापासून लोकांनी प्रेरणा घ्यावी हा उद्दात्त हेतू ठेवून सरकाराने ईंदु मिलची जागा त्यांच्या स्मरकासाठी दिली अस आपल्यापैकी किती जणांना वाटते.

लेखनविषय: दुवे:

इंटरनेट हिंदूंचा अप्रामाणिकपणा... आणि विश्वासार्हता

दिल्लीमधील अत्यंत दुर्दैवी घटनेनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी 'बलात्कार भारतात होत नाहीत इंडियात होतात' दुवा असे वादग्रस्त विधान करुन प्रसिद्धीझोतात येण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर पाश्चात्य विवाहव्यवस्था व भारतीय विवाहव्यवस्था यांबाबत काहीतरी गोलमोल विधाने करुन आणखी गोंधळ उडवून दिला. कोणत्याही स्वरुपाच्या बाईट्ससाठी टपून बसलेल्या प्रसिद्धीमाध्यमांनी लगेचच हा मुद्दा उचलून धरला.

भारताला युद्ध करावे लागले तर?

मंडळी,

काय वर मागायचा ?

आजचे बरेच (सर्व नव्हे) राजकारणी भ्रष्ट आहेत असा समज आहे, व त्यात काही तथ्य ही असेल. भ्रष्टाचार हा कायद्याने गुन्हा आहेच व नैतिकतेच्या निकषावर पण गुन्हा आहे. पण जर त्या पलीकडे जावून विचार करूया.

एक दिवसाचा राजा

साल २०१४ निवडणूका होणार आहेत ह्या एका दिवशी सर्वसामान्य भारतीय नागरिक राजा होतो त्या एके दिवशी बहुतेक सर्व सरकारी यत्रना आज्ञाधारक सेवकाप्रमाणे वागु लाग्तात नेते मड्ळी त्याच्यावर आश्वास्नाची स्तुतीसुम्ने उध्ळ्तात त्यानतर ४ वषे ३६४ दिवस ह्या राजाची अव्स्था फारच बिकट होते. त्याच्या मताला काडीची किमत राह्त नाही. मतदान करुन नेता निवडूण देण्याचा अधिकार त्याला असतो पण निवडूण दिलेला नेता काम करत नसल्यास त्याला सत्तेवरुन खाली उतरविण्याचा अधिकार मात्र त्याला नसतो तस असत तर एवढ मोठ जनआदोलन ज्या लोकपालासाठी झाले तो कायदा अस्तिवात आला असता.

भारतीय लोकाशाहीचे भविष्य - अध्यक्षीय, संसदीय की आणखी काही?

भारतीय लोकशाही हि जगातली सर्वात मोठी आणि महान लोकशाही आहे असे आपण वारंवार ऐकतो अथवा ऐकवतो. प्रत्यक्षात आज त्या लोकशाहीची अवस्था काय आहे हे प्रत्येक सुजाण नागरिक जाणतो. आपली सध्याची लोकशाही हि संसदीय पद्धतीची आहे जिथे लोकं त्यांचे प्रतिनिधी निवडून देतात आणि मग ते प्रतिनिधी त्यांचा नेता निवडून देतात. तो नेता मग पंतप्रधान बनतो आणि आपले मंत्रिमंडळ बनवतो. हे झाले पुस्तकी ज्ञान. प्रत्यक्षात काय होते ते आपण पहातो. प्रादेशिक पक्ष राष्ट्रीय राजकारण बिघडवत आहेत.

कसाब आणि अफ़जल.... काँग्रेस आणि भाजपा

कसाबच्या शिक्षेच्या निमित्ताने काँग्रेस भाजपापेक्षा कितीतरी पटीने कार्यक्षम आहे हेच सिद्ध झाले आहे.

काँग्रेसच्या कारकिर्दीत कसाबचा हल्ला झाला. एका परदेशी नागरिकाने केलेल्या हल्ल्याची पूर्ण चौकशी, शिक्षा आणि प्रत्यक्ष फाशी हे सगळं काँग्रेस सरकारने ४ वर्षात पूर्ण करुन प्रकरण संपवलेदेखील.

आणि हे भाजप सरकार! १९९९ ते २००४ हे संसदेत होते. २००१ साली यांच्यावर संसदेत अफजलगुरुने- एका भारतीय माणसाने बाँब टाकला. पुढचे तीन वर्षे हेच भाजपावाले सत्तेत होते. पण यांच्या कारकिर्दीत ना तपासणी पूर्ण झाली ना शिक्षा.

पुढे २००६ साली काँग्रेस सरकारच्याच काळात त्याला फाशी सुनावली गेली.

नितीन गडकरी

भारतीय जनता पक्षाचे (खाण्याप्रमाणेच!) बोलण्याचा धरबंद नसलेले विद्यमान अध्यक्ष श्री. नितीनभाऊ गडकरी यांनी स्वामी विवेकानंद यांची तुलना कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्यासोबत केल्याने मोठाच गोंधळ माजला आहे. मुळात स्वामी विवेकानंद यांचे सर्वसमावेशक हिंदुत्त्व, 'माझ्या बंधू आणि भगिनींनो' असे ख्रिश्चन-मुस्लिम बांधवांना शिकागोमध्ये उद्देशून भाषण, याचा मागमूसही भाजपा आणि संघाच्या आक्रमक हिंदुत्त्वात सापडत नाही. तरीही संघिष्ठांचा कोणताही कार्यक्रम शक्यतो विवेकानंदांचे स्मृतीपूजन करून होतो असे वाटते. मात्र गडकरींच्या या फ्रॉईडियन स्लिपमुळे विवेकानंदांबाबत भाजपाचा मुखवटा आणि चेहरा हा असा उघड झाला आहे.

 
^ वर