संस्कृती

अंगारकी चतुर्थी

कृष्ण पक्षातील चौथी तिथी मंगळवारी आली तर ती अंगारकी चतुर्थी असते. मंगळ ग्रह लालसर दिसतो. म्हणून तो अंगारक. एका चांद्रमासात एक कृष्ण चतुर्थी. त्या दिवशी सात वारांतील कोणताही वार असण्याचा संभव समान. म्हणून अंगारकीची संभवनीयता सात चांद्रमासांत एकदा. म्हणजे साधारणपणे तीन सौर वर्षांत पाचदा अंगारकी चतुर्थी येते. अंगारकी पौर्णिमा तसेच अंगारकी अमावास्या येण्याची संभवनीयता तेवढीच (३ वर्षांत पाचदा) असते. अंगारकी अधिक मासात येण्याचा योग (संभव) वरच्या संभवनीयतेच्या एक तृतीयांश. म्हणजे ९ वर्षांत ५ वेळां.ती अधिक दुर्मीळ म्हणून श्रद्धाळूंना अधिक महत्त्वाची वाटते.ते म्हणतात "अधिकस्याधिकं फलम्" (कशाला काहीही जोडायचे झाले.) अधिक दुर्मीळ ते अधिक मौल्यवान म्हणायचे तर प्रत्येक दिनांक सर्वाधिक महत्त्वाचा ठरतो.कारण तो पुन्हा कधीच येणार नसतो ! आणि ते खरेच आहे.प्रत्येक दिवस,किंबहुना प्रत्येक क्षण ,महत्त्वाचा असतोच.आला क्षण-गेला क्षण.आणि जो गेला तो गेलाच.तो पुन्हा येणे नाही. असो. आपण मंगळवारी येणार्‍या कृष्णचतुर्थीचा पुन्हा विचार करू.

चिल्लर पार्टी

पुण्यात मुंढवा रोडवरील ' हॉटेल रिव्हर व्ह्यू ' मध्ये झालेल्या चिल्लर पार्टीच्या सविस्तर बातम्या काल न्यूज चॅनेल्सवर झळकत होत्या. त्यानुसार ७०० च्या वर ९ वी ते १२ वी च्या मुलामुलींचा यात समावेश होता. ह्यातली बहुतेक मुले मुली दारू पिऊन स्विमिंग पूल आणि आजूबाजूला डॉल्बीच्या कर्णकर्कश आवाजात धिंगाणा घालत होती. काही मुलेमुली तर पोलिसांनी धाड टाकली तेंव्हा बोलण्या चालण्याच्या शुद्धीत नव्हती.

फेसबुक , ब्लॅकबेरी मेसेंजर, तसेच माऊथ टू माऊथ पब्लिसिटीमुळे ही पार्टी इतकी रंगली म्हणे.
मला पडलेले काही प्रश्न –

भास्कराचार्यांचे पाटण आणि चंगदेवाचा मठ


चंद्रशेखर ह्यांच्याप्रमाणेच मीहि सुमारे १५ वर्षांपूर्वी औरंगाबादहून निघून पितळखोर्‍याची लेणी (२०.३१३८° उ ७४.९९२१° पू) पाहण्याचा प्रयत्न केला होता. पावसाळ्याचे दिवस होते. औरंगाबादहून दीड-दोन तास चारचाकीने गेल्यावर आम्ही ज्या दरीत लेणी आहेत तिच्या कडेवर जाऊन पोहोचलो. समोर दरीतील धबधबा आणि नाला भरून वाहात होते.

वांग मराठवाडीची संघर्षगाथा...

काही दिवसांपूर्वी मी वांग मराठवाडीला भेट देऊन आलो. त्याबद्दल इथे लिहिलं आणि खूप जणांनी जाहिर / वैयक्तिक प्रतिसाद दिले. काही जणांनी नेमके प्रश्न विचारून या सर्वच प्रकरणाबद्दल अधिक जाणून घ्यायची उत्सुकता दाखवली. काही जणांनी प्रत्यक्ष मदत करायच्या दिशेने पाऊल टाकले. सगळ्यांचेच आभार. मनापासून.

त्या लेखात मी म्हणलं होतं की माझी माहिती फार तोकडी आहे. आणि म्हणूनच, या संघर्षात, सुरूवातीपासून आघाडीवर असणार्‍या सुनिती सु. र. यांनी लिहिलेला हा लेख इथे देत आहे. त्यावरून अजून बर्‍याच बाबी वाचकांना नीट समजतील अशी आशा आहे. या बाबतीत काही प्रश्न असल्यास ते सुनितीताईंपर्यंत पोचवायचा आणि त्यांचे म्हणणे इथे मांडण्याचा प्रयत्न राहिल.

सुमारीकरणाचा उत्कर्षबिंदू की उथळीकरणाची नीचतम पातळीँ?

आजकाल जिथेतिथे 'विद्वान', 'व्यासंग' आणि 'व्यासंगी' हे शब्द प्रतिसादांतून लिखाणांतून मुक्तपणे फेकण्यात -- राजेश खन्नाच्या शैलीत सुपरफॉस्फेट, युरिया फेकावी तसे -- येतात.

सिंधू लिपी ते ब्राह्मीची वाटचाल

स्वतंत्ररित्या जगात सर्वात प्रथम लेखनकला शोधल्याचा मान सुमेरियन संस्कृतीला जातो. (या लेखात मेसोअमेरिकन आणि चिनी लिपीचा विचार केलेला नाही.) युरेशियातील अनेक लिपी या सुमेरियन लिपीमुळे उदयाला आल्याचे मानले जाते. सुमेरियन कीलाकार लेखन (cuneiform writing) हे सर्वात आद्य समजले जाते. अर्माइक, ग्रीक, ब्राह्मी, खारोष्टी, इजिप्शियन चित्रलिपी, फोनेशियन, अरबी अशा अनेक लिपी या कीलाकारीवरून व्युत्पन्न झाल्याचे सांगितले जाते पण म्हणून या लिपी कीलाकारीची सख्खी अपत्ये आहेत अशातला भाग नाही. हे कसे ते पाहू. सुमेर संस्कृतीतून लेखनकला सर्वदूर पसरली ती दोन प्रकारे १. नीलप्रत (पुनरुत्पादन) आणि २. कल्पना विसरण (idea diffusion) च्या तत्त्वाने.

गुरुविण कोण लावितो वाट?

गुरुविण कोण लावितो वाट? (समस्त गुरुभक्तांची क्षमा मागून)
(गुरुविण कोण दावितो वाट? असे एक गुरुगीत ऐकले.त्यात किंचित् बदल करून लेखाला शीर्षक दिले आहे.)

हिंदीविरोधी वादाचे व्यंगचित्र

बाबासाहेब आंबेडकरांचे व्यंगचित्र पाठ्यपुस्तकांत टाकल्याने झालेला गोंधळ शमत नाही तोवर तमिळ-हिंदी वादाच्या व्यंगचित्राने नवा गोंधळ सुरु केला आहे. याबद्दलची बातमी द हिंदूच्या वेबसाइटवर वाचली. ती अशी -

गज़वा-ए-हिन्द हादिथ

निर्मल बाबा आणि प्रसार माध्यमे

निर्मल दरबार नावाचा कार्यक्रम अनेक प्रसिद्ध टीव्ही चॅनल्सवर गेली काही वर्षे दिसत असे. या कार्यक्रमातून निर्मलजीतसिंह नरुला हा इसम चमत्काराचे दर्शन घडवतो. हा कार्यक्रम स्थगित करण्याबद्दल न्यायालयाने आदेश दिले आहेत.

 
^ वर