जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा हा व्यर्थ भार विद्येचा!

८६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन , चिपळूण

८६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन , चिपळूण येथे ११, १२ आणि १३ जानेवारी २०१३ ला होणार आहे हे सर्वश्रुत आहेच. या संबंधीची अधिक माहिती वेळोवेळी http://www.facebook.com/86VeAkhilaBharatiyaMarathiSahityaSammelana या फेसबुक पृष्ठावर प्रसिद्ध केली जाईल. कृपया या पृष्ठाला अवश्य भेट द्यावी.

कौषीतकी उपनिषद आणि काही प्रश्न

माझ्या मुलीला इतिहासाच्या अभ्यासासाठी कौषीतकी उपनिषद आहे. असे लक्षात आले की मुलांना त्याचा संदर्भ आणि थोडाफार अर्थ कळला तरी अधिकाराने त्यावर भाष्य करणे किंवा त्यावर आधारित उत्तरे देणे जमलेले नाही. मला उपनिषदे, अध्यात्म वगैरे गोष्टींमध्ये अजिबात गती नाही. कौषीतकी हा शब्द देखील मी व्यवस्थित लिहिला आहे की नाही याची कल्पना नाही. थोडेफार समजवून दिल्यावर पुढे मला अधिकारवाणीने समजावता येत नाही.

अंगारकी चतुर्थी

कृष्ण पक्षातील चौथी तिथी मंगळवारी आली तर ती अंगारकी चतुर्थी असते. मंगळ ग्रह लालसर दिसतो. म्हणून तो अंगारक. एका चांद्रमासात एक कृष्ण चतुर्थी. त्या दिवशी सात वारांतील कोणताही वार असण्याचा संभव समान. म्हणून अंगारकीची संभवनीयता सात चांद्रमासांत एकदा. म्हणजे साधारणपणे तीन सौर वर्षांत पाचदा अंगारकी चतुर्थी येते. अंगारकी पौर्णिमा तसेच अंगारकी अमावास्या येण्याची संभवनीयता तेवढीच (३ वर्षांत पाचदा) असते. अंगारकी अधिक मासात येण्याचा योग (संभव) वरच्या संभवनीयतेच्या एक तृतीयांश. म्हणजे ९ वर्षांत ५ वेळां.ती अधिक दुर्मीळ म्हणून श्रद्धाळूंना अधिक महत्त्वाची वाटते.ते म्हणतात "अधिकस्याधिकं फलम्" (कशाला काहीही जोडायचे झाले.) अधिक दुर्मीळ ते अधिक मौल्यवान म्हणायचे तर प्रत्येक दिनांक सर्वाधिक महत्त्वाचा ठरतो.कारण तो पुन्हा कधीच येणार नसतो ! आणि ते खरेच आहे.प्रत्येक दिवस,किंबहुना प्रत्येक क्षण ,महत्त्वाचा असतोच.आला क्षण-गेला क्षण.आणि जो गेला तो गेलाच.तो पुन्हा येणे नाही. असो. आपण मंगळवारी येणार्‍या कृष्णचतुर्थीचा पुन्हा विचार करू.

जन्मकुंडलीत नोकरी, करीअरचे स्थान कोणते? सहावे की दहावे?

(१) जन्मकुंडलीत नोकरी, करीअरचे स्थान कोणते? सहावे की दहावे?
(२) तसेच, सहावे स्थान शत्रू, रोग दर्शवते. त्यानुसार जर सहाव्या स्थानात सिंह राशी असून त्याचा मालक रवी बाराव्या स्थानात कुंभ राशीत असेल तर त्याचे फळ काय मिळेल?
(३) आणि दहाव्या स्थानात धनू राशी असून त्याचा मालक गुरू हा तिसर्‍या स्थानात चंद्राबरोबर वृषभ राशीत असेत तर त्याचे फळ काय?

लेखनविषय: दुवे:

एका साम्राज्याच्या शोधात: अजंठा गुंफा भाग 3

सातवाहन कालातील म्हणता येतील अशी 3 भित्तीचित्रे अजंठ्याच्या 10 क्रमांकाच्या गंफेत आहेत आणि ती अतिशय विद्रूप व खराब अवस्थेत असल्याने कॅमेर्‍याच्या सहाय्याने, झूम करून सुद्धा, त्यावरून तत्कालीन काहीही माहिती प्राप्त करण्याची सुतराम शक्यता नाही हे आपण आधी बघितले आहे. या मूळ 3 चित्रांवरून, ग्रिफिथ यांनी काढलेल्या चित्रांपैकी काही त्यांनी आपल्या पुस्तकात प्रसिद्ध केली होती. मात्र हे पुस्तक अत्यंत दुर्मिळ असल्याने मला वाचण्यास मिळणे अशक्यप्राय दिसल्याने दुसर्‍या कोणत्या पुस्तकात ही चित्रे पुनर्मुद्रित केली आहेत का याचा शोध मी घेऊ लागलो. हा शोध घेत असता श्री. जी.

चिल्लर पार्टी

पुण्यात मुंढवा रोडवरील ' हॉटेल रिव्हर व्ह्यू ' मध्ये झालेल्या चिल्लर पार्टीच्या सविस्तर बातम्या काल न्यूज चॅनेल्सवर झळकत होत्या. त्यानुसार ७०० च्या वर ९ वी ते १२ वी च्या मुलामुलींचा यात समावेश होता. ह्यातली बहुतेक मुले मुली दारू पिऊन स्विमिंग पूल आणि आजूबाजूला डॉल्बीच्या कर्णकर्कश आवाजात धिंगाणा घालत होती. काही मुलेमुली तर पोलिसांनी धाड टाकली तेंव्हा बोलण्या चालण्याच्या शुद्धीत नव्हती.

फेसबुक , ब्लॅकबेरी मेसेंजर, तसेच माऊथ टू माऊथ पब्लिसिटीमुळे ही पार्टी इतकी रंगली म्हणे.
मला पडलेले काही प्रश्न –

नेटिझन्सचा उर्मटपणा!

संगणक (व संगणकाशी संबंधित मोबाइल फोन, इंटरनेट, लॅपटॉप, वाय फाय, नेटबँकिंग, मोबाइल बँकिंग व इतर सर्व माहिती तंत्रज्ञान सुविधा) माणसांना चांगली माणसं बनण्यासाठी मदत करतात, हे संगणक क्षेत्रातील एका तज्ञाचे विधान आहे. परंतु निदान ब्लॉगोस्फेरमधील अनुभवावरून तरी नेटवरील माणसं उदात्त, शहाणे, संवेदनशील झाले आहेत, याबद्दल शंका घ्यावीशी वाटते. आपण कल्पनाही करू शकणार नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात संगणक आपल्या आयुष्याला व्यापलेले आहे. संगणक निरक्षरता हद्दपार होत आहे. नेट आता प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनत आहे.

हे कुठून आले?

१. इसवी सनाच्या पहिल्या शतकाचा प्रारंभीचा काळ :-- "शक सत्रपांनी पश्चिम भारतात राज्ये स्थापन केली. त्याचा भारतीयांना त्रास होइ. त्यांचा सडकून पराभव गौतमीपुत्राने केला."
२. इसवीसनाच्या पहिल्या शतकाच्या शेवटी :- कुषाण तर थेट आख्ख्या उत्तर भारतात पसरले. फार मोथे साम्राज्य त्यांनी स्थापले विम- कुजुल कॅडफिसस च्या नेतृत्वाखाली . त्यांचा वारसदार कनिष्क तर पामीर पठार ओलांडून जाणारा पहिलाच भारतीय सत्तेचा प्रमुख ठरला. मथुरेपासून उत्तर्-पश्चिमेकडे त्याचा मजबूत अंमल होता. काश्मीर पार करून त्याने मध्य आशियायी भागातही धाडक मारत थेट चीनच्या राजाला हैर्राण केले.

अजि म्यां ब्रह्म ऐकिले........

पृष्ठप्रांगण अर्थात ब्याकग्रौंड :

शुक्रवारी अर्थात २४ आगष्टास संध्याकाळी ६ वाजता केसरीवाड्यात प्रत्यक्ष लोकमान्य टिळकांचा आवाज असलेली ध्वनिफीत ऐकायला मिळणार आहे अशी बातमी ईईई सकाळात बुधवारी वाचली. मग म्हटले प्रत्यक्ष लोकमान्यांचा आवाज ऐकायला गेलेचि पाहिजे. गेलो मग केसरीवाड्यात.

एका साम्राज्याच्या शोधात: अजंठा गुंफा भाग 2

अजंठा घळीतील गुंफांमध्ये, "पूर्वकालीन गुंफा" या नावाने ओळखला जाणारा गुंफांचा गट आहे. या गटात 6 गुंफा असून त्या इ.स.पूर्व 200ते100 या किंवा सातवाहन राजे, सिमुक, कृष्ण व श्री सातकर्णी हे राज्यावर असण्याच्या कालखंडात खोदल्या गेलेल्या आहेत. या गुंफांना 8, 9, 10, 12, 13, आणि 15अ असे क्रमांक दिले गेले आहेत. या गटापैकी क्रमांक 13, व 15अ या गुंफा म्हणजे अगदी छोटे असे भिख्खू विहार किंवा भिख्खूंची निवासस्थाने आहेत. या दोन्ही गुंफांच्या प्रवेशद्वाराजवळील भिंतीचा भाग कोसळल्याने नष्ट झालेला आहे.

 
^ वर