जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा हा व्यर्थ भार विद्येचा!

राज यांनी मोर्चा काढून काय साधले?

राज ठाकरेंनी आझाद मैदानावर यशस्वी मोर्चा काढून एका दगडात अनेक पक्षी टिपले आहेत असे सर्वत्र म्हणले जात आहे. यावर लोकसत्तेतील अग्रलेख "राज आणि पृथ्वीराज" येथे वाचा -

http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=245...

हातच्या काकणाला आरसा कशाला?

पुढील लेखन 'ई-सकाळ'मध्ये आत्ताच वाचले आणि अंगावर काटा उभा राहिला.

एका साम्राज्याच्या शोधात: अजंठा गुंफा भाग 1

शुएन त्झांग या अत्यंत विद्वान बौद्ध भिख्खूने, इ. स, 629, या वर्षी, मूळ स्वरूपातल्या बौद्ध धर्मग्रंथाचे अध्ययन व प्राप्ती हे दोन्ही हेतू मनात ठेवून, भारतात येण्याच्या आपल्या पायी प्रवासाला चीनमधून प्रारंभ केला हा इतिहासाचा भाग आपल्यापैकी बहुतेकांना माहिती आहेच. आपल्या सुदैवाने शुएन त्झांग याने आपल्या प्रवासाचे अतिशय सूक्ष्म दृष्टीने केलेले वर्णन लिहून ठेवले आहे व त्याच्या अनुयायांनी हे वर्णन जपून ठेवल्याने आपल्याला आज उपलब्ध आहे. या कालातील भारतवर्षाचे सर्वात अधिकृत वर्णन म्हणून हे प्रवास वर्णन आज गणले जाते. शुएन त्झांगने आपला परतीचा प्रवास तमिळनाडू मधील कांचीपुरम येथून सुरू केला होता.

घरमालकांनो सावधान.....भाडेकरूची माहिती द्या....नाहीतर...!!!

रोज सकाळी उठल्या उठल्या हातात वर्तमानपत्र लागते, (फक्त वाचण्यासाठी) आता न्यूज चानेल च्या भाऊगर्दीत वर्तमानपत्राचे काय एवढे महत्व...असे डायलॉग मारू नका. पण आख्या दिवसाच्या बातम्या एकदाच वाचायला मिळतात ना...तर असो, तर सकाळी-सकाळी सकाळ वाचायला घेतला अन सकाळचा (वर्तमानपत्राचा) मथळा पाहून सकाळीच माथा सरकला, बातमी होती, "भाडेकरूंची माहिती न देणाऱ्या 28 घरमालकांवर गुन्हे." भाडेकरूंची माहिती न देणाऱ्या 28 घरमालकांवर शहरातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले असून, अटक आणि अर्थीक दंड हि होऊ शकतो.

साहेबांची रमा .........!!!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैवाहिक जीवनाची सुरुवातीची वर्षे अत्यंत हलाखिमध्ये व गरिबीत गेली. त्यांच्या पत्‍नी रमाबाई मोठ्या उदार मनाच्या व पतीला सदोदित साथ देणार्‍या होत्या. दलित-बहुजन समाजाला न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी बाबासाहेबांनी सुरू केलेल्या अथक संघर्षामुळे बाबासाहेब स्वता:च्या प्रपंचाकडे फारसे लक्ष देऊ शकले नाहीत. पण, आपल्या पत्‍नीवर त्यांचे अपार प्रेम होते.

अण्णा, काय केलंत हे?

अण्णा हजारे३ ऑगस्ट २०१२ रोजी उपोषणाची सांगता करण्याचा अण्णांचा निर्णय मनाला विषण्णतेचा चटका लावून गेला. असे वाटले कीं अतीशय पूजनीय, साक्षात् त्यागमूर्ती असलेल्या ज्या व्यक्तीला सार्‍या देशाने एका उत्तुंग आसनावर (pedestal) बसविले होते त्या व्यक्तीने सार्‍या राष्ट्राचा आज जणू अवसानघातच केला. गेल्या वर्षीच्या ऑगस्टमधील उपोषणानंतर तर त्यांनी मला "संभवामि युगे युगे" असे अर्जुनाला सांगणार्‍या भगवान श्रीकृष्णाची आठवण करून दिली होती. पण मुंबईच्या त्यांच्या उपोषणाकडे जनतेने केलेल्या दुर्लक्षामुळे मनात शंकेची पाल चुकचुकतच होती.

नवे उपक्रम

नमस्कार,
चर्चेचा विषय वाचून गैरसमज करुन घेऊ नका. मी उपक्रमाच्या नव्या रुपा बद्दल माहिती वगैरे काही देणार नाहीये अथवा ते कसे असावे/नसावे हि चर्चा करणार नाहीये. उपक्रमाचे नवे रुप हे निमित्त मात्र आहे.
दर्जेदार चर्चा/लेख आणि छायाचित्र हे उपक्रमाचे वैशिष्ठय ठरले आहे आणि उपक्रमाने ते पेलले सुद्धा आहे. पण उपक्राच्या नव्या रुपासोबत एक नवी ओळख सुद्धा तयार व्हावी हा एक विचार मनामध्ये घोळत होता (उपक्रम व्यवस्थापनाशी याचा काही एक संबंध नाही. हे आपले माझे विचार आहेत.) म्हणूनच हि चर्चा सुरु करत आहे.

एका साम्राज्याच्या शोधात; पितळखोरे गुंफा भाग 4

पितळखोर्‍यामधील 4 क्रमांकाच्या विहारातून परत बाहेर आल्यानंतर समोर पडलेल्या पाषाण खंडांकडे मी बघत असतानाच, माझ्या बरोबर असलेला पुरातत्त्व विभागाचा अधिकारी, गुंफेच्या मुखाच्या बर्‍याच वर, म्हणजे मी उभा आहे त्या स्थानापासून निदान 90 ते 100 फूट तरी ऊंचीवर, असलेल्या समोरच्या पाषाण कड्याकडे माझे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतो आहे. प्रथम नीटसे दिसत नाही. परंतु नंतर लक्षात येते की समोरच्या उभ्या कड्यावर एवढ्या ऊंचीवर काहीतरी कोरीव काम केलेले आहे.

दोन चित्रे

शिकागो ट्रिब्यूनच्या मुख्य इमारतीवरील पाटीपहिले चित्र अमेरिकेतील शिकागो इथे घेतलेले आहे. शिकागोला भेट दिलेल्यांना शिकागो ट्रिब्युनची इमारत ओळखीची असेलच. शिकागोहुन प्रसिद्ध होणारे शिकागो ट्रिब्युन ह्या वर्तमानपत्रच्या मुख्य इमारतीवरच्या भव्य पाटीमधून 'शिकागो' ही अक्षरे निवडून ते चित्रात वापरली आहेत.

दुसरे चित्र अहे कॅलिफोर्नियाततील वाइन निर्मितीसाठी जगप्रसिद्ध 'नापा व्हॅली' इथले आहे. तिथल्या भौगोलिक वैशिष्ठ्यांमुळे हा प्रांत वाइन उत्पादकांसाठी फार महत्वाचा समजला जातो.

लेखनविषय: दुवे:

महाराष्ट्राचे वैभवः हेमाडपंती मंदिरे

sangameshwarप्राचीन भारतात दैवतांची भव्य देवळे बांधण्याची प्रथा गुप्त राजवटीत (इ.स.३२० ते ५५०) सुरू झाली असे मानले जाते. गुप्त कालापासून आजतागायत भारतातील विविध प्रांतात विविध धाटणीची देवळे उभी राहिल्याचे दिसून येते. स्थानिक स्थापत्यशास्त्र, शिल्पकला, कलाकुसर वगैरेंचा या देवळांच्या बांधकामावर मोठा प्रभाव दिसतो. स्थापत्यशास्त्राचे हे पुरावे तत्कालीन संस्कृतीची ओळख आणि माहिती करून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. खजुराहो, कोणार्क, हम्पी आणि चालुक्यांची बदामी येथील मंदिरे त्यांच्या स्थापत्य आणि शिल्पकामांसाठी विशेष प्रसिद्ध आहेत आणि पर्यटनस्थळेही गणली जातात।

 
^ वर