जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा हा व्यर्थ भार विद्येचा!

एका साम्राज्याच्या शोधात: पितळखोरे गुंफा भाग 3

४ क्रमांकाची गुंफा

पितळखोरे येथे असलेली 4 क्रमांकाची गुंफा, ही सुद्धा तसे बघितले तर भिख्खूंचे निवासस्थान किंवा एक विहार आहे. परंतु माझ्या समोर असलेल्या भग्नावशेषांवर एक नजर टाकता क्षणीच, हा विहार प्रमुख किंवा वरिष्ठ आचार्यांसाठी खोदला गेला असला पाहिजे याची खात्री पटते. अर्थात या विहारात असलेल्या कोठड्या मात्र इतर विहारांतील कोठड्यांप्रमाणेच तेवढ्याच आकाराच्या व तशाच साध्या स्वरूपातील आहेत. पण ती बहुदा त्या काळातील पद्धत असावी. कदाचित हा विहार VIP साठी असल्याने येथील सर्व कोठड्यांना लाकडी द्वार झडपा बसवण्याची व्यवस्था होती. दगडात लाकडी खुंट्या मारण्यसाठी पाडलेली चौकोनी छिद्रे काय ती आता फक्त उरलेली आहेत.

संतप्त भारतीयांची महासत्ता - तुम्हाला हवीय?

Do we really want a superpower India populated by angry Indians? ( http://economictimes.indiatimes.com/opinion/comments-analysis/do-we-real...) हा लेख नुकताचा वाचनात आला. गेल्या काही वर्षांत घडणार्‍या व्यथित/त्रस्त/दु:खी/उद्वीग्न करणार्‍या अनेक घटनांच्या पार्श्वभूमीवर विचार करण्यास प्रवृत्त करणारा हा लेख आहे.

या लेखाच्या संबधाने पुढील प्रश्न पडले.

१. भारत खरेच एका व्यापक सामाजिक उद्रेकाच्या उंबरठ्यावर उभा आहे का?
२. लेखकाने दिलेली कारणे तुम्हाला पटतात का? त्याशिवायही काही कारणे असू शकतील असे तुम्हाला वाटते का?

एका साम्राज्याच्या शोधात: पितळखोरे गुंफा भाग 2

आधी उल्लेख केल्याप्रमाणे, पितळखोरे दरीत एकूण 14 गुंफा आहेत. अजंठा गुंफांच्या मानाने हा आकडा बराच लहान आहे. त्याचप्रमाणे या गुंफांचा शोध सुद्धा अजंठा गुंफांच्या नंतरच म्हणजे 1853 च्या सुमारास लागलेला आहे. मी आता माझ्या सर्वात उजव्या बाजूस असलेल्या 1 क्रमांकाच्या गुंफेसमोर उभा आहे. माझ्या डाव्या हाताला समोरच्याच कातळकड्यावर खोदलेल्या आणखी 8गुंफा लांबवर पसरत गेलेल्या मला दिसत आहेत. माझ्या मागे असलेल्या खोल दरीच्या पलीकडच्या अंगाला 10ते 14 क्रमांकच्या आणखी 4 गुंफा आहेत.

भास्कराचार्यांचे पाटण आणि चंगदेवाचा मठ


चंद्रशेखर ह्यांच्याप्रमाणेच मीहि सुमारे १५ वर्षांपूर्वी औरंगाबादहून निघून पितळखोर्‍याची लेणी (२०.३१३८° उ ७४.९९२१° पू) पाहण्याचा प्रयत्न केला होता. पावसाळ्याचे दिवस होते. औरंगाबादहून दीड-दोन तास चारचाकीने गेल्यावर आम्ही ज्या दरीत लेणी आहेत तिच्या कडेवर जाऊन पोहोचलो. समोर दरीतील धबधबा आणि नाला भरून वाहात होते.

देश- राष्ट्र काहीसे विस्कळित....

वैधानिक इशारा:-
पुढील मजकूर काहिसा विस्कळित आणि वादावादी करताना अचानक आठवलेला मजकूर इतकाच समजावा. फार अधिक माहितीमूल्य वगैरे ह्यात अजिबात मिळणार नाही. नॉर्मल माणसांना आनंदाच्या उकळ्या फुटतात तशा आम्हाला विस्कळित प्रतिक्रियांच्या उकळ्या फुटतात असे समजून माफी करावी.
अठराव्या शतकात इंग्रज जिंकणारच होते. आपण एकसंध नव्हतो ना. भारत कधीच एकसंध वगैरे नव्हता ना. शेकडो राज्ये होती. एकसंध असा भारत नव्हता वगैरे वगैरे नेहमीची शाळकरी बडबड काल परवा कुणीतरी करत होतं.
शुंभांनो, त्याकाळी भारतच नव्हे, तर आख्खे जग तस्सेच होते. युरोपमध्ये सामंतशाहीचीच थोडी नवी आवृत्ती सुरु होती. खुद्द आज दिसणारा ब्रिटन/इंग्लंड/यू के असे काही एक राज्य नव्हते. जर्मनी , इटाली हे देश मुळातच अस्तित्वात नव्हते.

वांग मराठवाडीची संघर्षगाथा...

काही दिवसांपूर्वी मी वांग मराठवाडीला भेट देऊन आलो. त्याबद्दल इथे लिहिलं आणि खूप जणांनी जाहिर / वैयक्तिक प्रतिसाद दिले. काही जणांनी नेमके प्रश्न विचारून या सर्वच प्रकरणाबद्दल अधिक जाणून घ्यायची उत्सुकता दाखवली. काही जणांनी प्रत्यक्ष मदत करायच्या दिशेने पाऊल टाकले. सगळ्यांचेच आभार. मनापासून.

त्या लेखात मी म्हणलं होतं की माझी माहिती फार तोकडी आहे. आणि म्हणूनच, या संघर्षात, सुरूवातीपासून आघाडीवर असणार्‍या सुनिती सु. र. यांनी लिहिलेला हा लेख इथे देत आहे. त्यावरून अजून बर्‍याच बाबी वाचकांना नीट समजतील अशी आशा आहे. या बाबतीत काही प्रश्न असल्यास ते सुनितीताईंपर्यंत पोचवायचा आणि त्यांचे म्हणणे इथे मांडण्याचा प्रयत्न राहिल.

एका साम्राज्याच्या शोधात: पितळखोरे गुंफा भाग 1

भारताच्या पश्चिम किनारपट्टीला लागून असलेली सह्याद्री किंवा पश्चिम घाट पर्वतराजी ही सर्वपरिचित आहे. किनारपट्टीला साधारणपणे समांतर असलेली ही सह्याद्री पर्वतराजी, भारताच्या दक्षिण टोकापासून ते पार महाराष्ट्रामधील नाशिक शहराच्या थोड्या उत्तरे पर्यंत विस्तारलेली आहे. मात्र नाशिक शहराच्या उत्तरेला असलेल्या याच स्थानापासून पूर्वेकडे, सह्याद्री पर्वतराजीला काटकोन करून, विस्तारत जाणारी आणखी एक पर्वतराजी फार कमी लोकांना माहिती आहे. सातमाला किंवा इंध्याद्री पर्वत या नावाने ओळखली जाणारी ही पर्वतराजी, दख्खनमधील प्राचीन साम्राज्यांसाठी एक सीमारेषा किंवा उत्तरेकडून होऊ शकणार्‍या आक्रमणांना प्रतिबंध करू शकेल अशी एक नैसर्गिक तटबंदी होती असे म्हणता येते.

सीरियात चाललेली उलथापालथ

नातेवाईकांच्या किंवा जातीवर आधारलेल्या राजकारणात रक्ताच्या नात्यांनाच शेवटी महत्व येते. सध्या सरकारविरोधी उठावात रस्त्यावर सांडले जाणारे रक्त आहे सुन्नी मुसलमानांचे. त्यामुळे एव्हाना तलास कुटुंबियांवर सुन्नींची बाजू घेण्यासाठी प्रचंड दबाव येऊ लागला असावा. याहूनही महत्वाची गोष्ट म्हणजे या शिया पंथाला जवळ असणार्या ’अलावी गटाच्या सत्ताधार्यां ना समर्थन देण्याची जी किंमत भविष्यकाळात मोजावी लागेल ती तेंव्हां मोजण्याऐवजी आता आपण आपले समर्थन मागे घेण्याची वेळ आताच आलेली आहे असा हिशेब तलास कुटुंबियांनी केलेला असावा! या निर्णयामागचे नक्की कारण स्पष्ट झालेले नाहीं.

वांग मराठवाडी... एक (इन प्रोग्रेस) सत्याग्रह!

गेल्या काही दिवसांपासून, किंवा महिन्यांपासून म्हणा हवं तर, वांग मराठवाडी हे नाव सतत कानावर येत होतं. मधून मधून मेल्स येत असत. त्या सगळ्यावरून झालेलं आकलन एवढंच होतं की सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात वांग नदीवर मराठवाडी इथे एक धरण बांधलं जात आहे. शासकिय भाषेत बोलायचं तर 'वांग मध्यम प्रकल्प'. आणि बहुतेक सगळ्या धरणांच्या बाबतीत होतं तसं इथेही पुनर्वसनाच्या नावाने बोंब आहे. मात्र मागच्या आठवड्यात मेल आलं की आता तिथे सत्याग्रह चालू होतोय. सत्याग्रह म्हणजे, आपल्या हक्काच्या जमिनीवर पेरणी करणं, तिथे ठाम उभं राहणं. पाणी चढलं तरी हरकत नाही. पाहिजे तर बुडून मरू पण हक्क सोडायचा नाही. नर्मदेतले अशा पद्धतीचे फोटो बघितलेच असतील बहुतेकांनी. इथेही तसंच काहीसं.

हा खेळ सावल्यांचा

काही दिवसांपूर्वी आपण डॉ. श्री. बालाजी तांबे यांच्या लेखाविषयी आणि त्यांचा पुरस्कार करणार्‍या 'भविष्यपत्रा'विषयी (दैनिक सकाळ) चर्चा केली. (पाहा: हिग्ज बोसॉन आणि भविष्यपत्राचा अजेंडा
http://mr.upakram.org/node/3804 )

 
^ वर