नवश्रीमंतांचा मंत्रघोष: ग्रीड इज गुड
श्रीमंतांच्या सामाजिक मानसिकतेचाच विचार करत असल्यास दुसऱ्या महायुद्धानंतरच्या 50- 60 च्या दशकापासून आजपर्यंतच्या काळापर्यंत त्यांच्या मानसिकतेत हळू हळू बदल होत गेला आहे, हे लक्षात येईल. स्वत:च्या हिताची काळजी, दान - देणगी - सबसिडी सबझूट, संवेदना - सहानुभूती या अविवेकीपणाची व भिकेच्या डोहाळ्याची लक्षणं, दुर्बलांसाठी हे जग नाही, पैसा हेच सर्वस्व, स्पर्धेतील यशच खरे यश,... इत्यादी गोष्टी आजकाल शिकवाव्या लागत नाहीत; त्या उपजतच आहेत की काय असे जणू वाटत आहे. यांच्या समर्थनार्थ वेगळ्या पुराव्याची गरज नाही, इतक्या त्या स्वयंसिद्ध आहेत हे, काही अपवाद वगळता, प्रत्येकाच्या मनावर बिंबवलेल्या आहेत.
भारतीयांना भारतीय संस्कृती नकोशी झालीय का?
भारतात आल्यावर नेहेमीच काही तरी बदल पाहायला मिळतो. अलीकडे लोकांचा सूर पूर्णपणे बदलेला आढळतो. सगळ्याच प्रांतामधले कर्मचारी जेव्हा एखादी गोष्ट नजरेस आणून द्यायची असेल त्यावेळी सांगतात - Here in India THEY do it like this.., THEY call it xyx ..., इत्यादी
पूर्वी ते सांगत - Here in India WE do it like this.., WE call it xyx ..., हा बदल कशामुळे असावा? त्याचप्रमाणे पूर्वी Admin, Housekeeping चे लोक नमस्ते म्हणत असत, आता ते सुद्धा Hello Sir असेच म्हणतात.
त्याचप्रमाणे चित्रपट खूपच बदलेले दिसतात. कथा काही का असेना, काही भाग तरी परदेशात चित्रित झालेला आढळतो. किमान गाणी तरी.
एका साम्राज्याच्या शोधात: नाशिक मधील त्रिरश्मी किंवा पांडव गुंफा, भाग 5
मराठी वृत्त वाहिन्यांवरील भाषा थोडी सुधारता येईल का?
प्रचंड लोकप्रिय (!) असलेल्या मराठी वृत्तवाहिन्या आपले वार्ताहर नेमतांना त्यांचे भाषेवरील प्रभुत्व बहुतेक पाहत नसावेत.
त्यांचे मराठी उच्चार नेहमीच चुकत असतात आणि त्यांना ते उच्चार बरोबर आहेत असेच वाटते. जसे 'च' ह्याचा उच्चार 'च्य' करणे, 'ज' चा उच्चार 'ज्य' करणे. उदाहरणर्थ - नरेंद्र ज्यादव (जाधव), विठूनामाचा गज्यर (गजर).
त्याचप्रमाणे मराठी वाक्प्रचार आणि समर्पक शब्द माहित नसल्याने हिंदी वाक्प्रचार वापरणे. जसे - काट्याची टक्कर (हसू नका, हे नेहमी वापरले जाते), चार चांद लागले, इत्यादी.
युरेका फोर्ब्स ची ग्राहक हित विरोधी भूमिका
डीसान अॅग्रोटेक लिमिटेड या धुळे जिल्ह्यातील अवधान एमआयडीसी स्थित नामांकित उद्योग संस्थेने आपल्या कर्मचार्यांकना स्वच्छ व शुद्ध पेयजल मिळावे या करिता युरेका फोर्ब्ज या पुणे स्थित कंपनीकडे विचारणा केली असता युरेका फोर्ब्ज तर्फे श्री. पियूष अरोंडेकर यांचेकडून दिनांक १४.०८.२०१२ रोजी अॅक्वागार्ड आर ओ (रिवर्स ओस्मोसिस) प्युरिफायर कम कुलर चा प्रस्ताव देण्यात आला.
दिवाळी अंक - वाचलेले काही फुटकळ-१
'अक्षर' दिवाळी अंकातला सुलेखा नागेश यांचा डॉ. नयना पटेल यांच्या आणंद येथील कृत्रीम गर्भारोपणाचे इस्पितळ व भाडोत्री मातांचे (सरोगेट मदर्स) वसतिगृह याविषयीचा लेख रोचक आहे. उपजीविकेची मर्यादित साधने असलेल्या स्त्रियांचे आयुष्य अशा उपक्रमात सहभागी झाल्याने कसे बदलून गेले आहे, तथापि या गोष्टींमध्ये सहभागी होणे याला समाजात अद्याप मान्यता कशी नाही आणि त्यामुळे या सरोगेट मदर्सना हे सगळे लपूनछपून कसे करावे लागते याबातची माहिती रंजक तरीही विचार करायला लावणारी आहे.
कसाब आणि अफ़जल.... काँग्रेस आणि भाजपा
कसाबच्या शिक्षेच्या निमित्ताने काँग्रेस भाजपापेक्षा कितीतरी पटीने कार्यक्षम आहे हेच सिद्ध झाले आहे.
काँग्रेसच्या कारकिर्दीत कसाबचा हल्ला झाला. एका परदेशी नागरिकाने केलेल्या हल्ल्याची पूर्ण चौकशी, शिक्षा आणि प्रत्यक्ष फाशी हे सगळं काँग्रेस सरकारने ४ वर्षात पूर्ण करुन प्रकरण संपवलेदेखील.
आणि हे भाजप सरकार! १९९९ ते २००४ हे संसदेत होते. २००१ साली यांच्यावर संसदेत अफजलगुरुने- एका भारतीय माणसाने बाँब टाकला. पुढचे तीन वर्षे हेच भाजपावाले सत्तेत होते. पण यांच्या कारकिर्दीत ना तपासणी पूर्ण झाली ना शिक्षा.
पुढे २००६ साली काँग्रेस सरकारच्याच काळात त्याला फाशी सुनावली गेली.
एका साम्राज्याच्या शोधात: नाशिक मधील त्रिरश्मी किंवा पांडव गुंफा; भाग 4
"जय जय सुरवरपुजित" विषयी
अजय अतुल यांच्या एका गीत संग्रहामध्ये हे गाणे ऐकले..
अतिशय सुंदर लय आणि शब्द अगदी भारून टाकतात..
परंतु प्रयत्न करून ही याचे बोल कुठे मिळाले नाहीत. कुठलीही माहिती देखील नाही.. अजय अतुल यांच्या एका कार्यक्रमात त्यांनी देखील याचे रचनाकार माहित नाहीत असे सांगितल्याचे आठवतेय..
तसा youtube वर एक audio सापडला..
मग बोल कसे-बसे लिहिले आहेत..
जाणकारांनी कृपया दुरुस्त्या सुचवाव्यात तसेच अर्थदेखील सांगू शकलात तर उत्तमच..
धन्यवाद..
---
जय जय सुरवरपुजित जित दानव कलभ ।
आस्वरवरलम्बोदर दर हर हर कलभ ॥
नवमी श्री भगवंतम् गणपती मति वरदम् ।
सविता हलपनवार
सविता हलपनवार नावाची आयर्लंड मधे राहणारी भारतीय गर्भवती महिला डॉक्टरांनी गर्भपात करायला नकार दिल्यामुळे जग सोडून गेली . अर्थात तुम्हीसुद्धा ही बातमी वाचलीच असेल. आयरीश कायद्यानुसार, जोपर्यंत पोटातल्या बाळाचे हृदय चालू आहे तोवर गर्भपात करू शकत नाही. त्या दुर्दैवी बाईच्या नवर्याने हरतर्हेने डॉक्टरांशी बोलून पाहीलं असणार पण तीन दिवस असह्य वेदना सहन करून शेवटी तीने प्राण ठेवला. थोडक्यात म्हणजे धर्माने (की धर्माच्या नावाखाली अंधश्रद्ध लोकांनी ?) आणखी एक बळी घेतला.
अतिशय दुर्दैवी घटना . अंधश्रद्धाळू फक्त हिंदूच असतात असे कोकलणाऱ्या महाभागांना सणसणीत चपराक !