जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा हा व्यर्थ भार विद्येचा!

भारतातिल परिस्थिती

मित्रांनो, आपण या अखंड भारतात राहतो. एकदा फिरल्याशिवाय हा भारत किती मोठा आहे ते कळत नाही! तर या भारतात खुप मोठे आव्हान आज उभे ठाकले आहेत.
1) आज भारताला जर कोणता धोका असेल तर तो ' चीनचा' ! आज चीनी वस्तुंनी पुर्ण बाजारपेठ व्यापून टाकली आहे. शिवाय आपल्या पारंपारिक शत्रुशी पाकिस्तानशी हातमिळवणी करुन आपल्यासमोर आव्हान निर्माण केले आहे.

गेट्स फौंडेशनचा पुढाकार: संडास सुधार संशोधन

दि बिल अँड मिलिंडा गेट्स फौंडेशनच्या मते जगभर वापरात असलेल्या आताच्या (भारतीयांचे स्क्वॉटिंगच्या वा कमोडच्या) फ्लश टाइप संडास रचनेत सुधारणा करण्यास भरपूर वाव आहे. आपल्यासाऱख्या शहरी मध्यमवर्गीयांना आताच्या फ्लश टॉयलेटमध्ये काही उणीवा असू शकतील असे वाटत नाही. 1880 सालापासून त्या वापरात असून गेली सव्वाशे वर्षे त्यातील प्रत्येक पार्ट न पार्ट मधील डिझाइनमध्ये सुधारणा होत होत आता त्याचे optimization झालेले असावे. त्यातील फ्लशसाठी असलेल्या अत्यंत महत्वाच्या पार्टची "S", "U", "J", वा "P" आकारातून उत्क्रांत होत होत आजच्या स्थितीला ती पोचलेली आहे.

“ पुणे ते पानिपत ” भाग १ - शनिवारवाडा - अहमदनगर – घृष्णेश्वर - औरंगाबाद

या वर्षीच्या सुरवातीला ०३ जानेवारी ते २५ जानेवारी २०१२ रोजी सुमारे २५० जणांनी “ पुणे ते पानिपत ” असा दुचाकीवर सुमारे ६००० किमी चा प्रवास केला. प्रवासात उन, हाडं गोठवणारी थंडी, मुसळधार पाऊस या सर्वांचा सामना करत हि मोहीम मावळ्यांनी यशस्वी केली. या मोहिमेचं सगळं श्रेय जातं ते आयोजक डॉ. संदीप महिंद यांना.

उपक्रम दिवाळी अंक २०१२

यावर्षीच्या दिवाळी अंकाची घोषणा करण्यात उशीर झाला त्याबद्दल दिलगीर आहोत. गेल्यावेर्षीपेक्षा यंदा वेळ कमी असल्याने शक्य तितक्या लवकर लेखन पाठवून सहकार्य करावे ही नम्र विनंती.

विविध विषयांवर माहितीपूर्ण लेख आणि चर्चांनी उपक्रम या आपल्या संकेतस्थळाने आपले वेगळेपण जपले आहे. उपक्रमींच्या सकारात्मक प्रतिसादामुळे आणि उत्साहपूर्ण सहभागामुळे गेल्या चार वर्षांचे दिवाळी अंक वैशिष्ट्यपूर्ण झाले आहेत. यावर्षीचा दिवाळी अंकही असाच वैशिष्ट्यपूर्ण व्हावा यासाठी सर्व उपक्रम सदस्यांना आवाहन आहे की त्यांनी आपले लेखन उपक्रम दिवाळी अंक २०१२ साठी पाठवावे.

मंत्र विज्ञान

मंत्र विज्ञान

सध्या नवरात्री उत्सव सुरु आहे ,अनेक भक्त सप्तशती/देवीच्या मंत्रांचे जप,/हवन,//पाठ करतात

आस्तिक दृष्टीकोनातून विचार केल्यास मंत्र-विज्ञानाचे वैज्ञानिक स्पष्टीकरण असे मिळू शकेल ---=

१. मंत्र हा मन,बुद्धी आणि त्यापेक्षा तरल अशा सूक्ष्मदेहांवर कार्य करतो

२. ब्रेनवेव्ह साऊंड थेरपी नुसार विशिष्ट ध्वनिलहरी वर मन एकाग्र झाल्यास मेंदूच्या अवस्था बदलतात ,
म्हणजे १-४ हर्ट्झ डेल्टा,/ ५- ८ हर्ट्झ थिटा / ९-१२ हर्ट्झ अल्फा /१३-१६ हर्ट्झ बीटा .........इ.या मेंदूच्या अवस्थांचा मूड्स आणि स्वभावाशी जवळचा संबंध आहे .

लेखनविषय: दुवे:

एका साम्राज्याच्या शोधात: नाशिक मधील त्रिरश्मी गुंफा, भाग 1

नाशिक मधील त्रिरश्मी पर्वतामध्ये असलेल्या प्रसिद्ध बौद्ध गुंफा बघण्यासाठी मी आता निघालो आहे. उत्तर महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे औद्योगिक शहर म्हणून जरी आजमितीला नाशिक प्रसिद्ध असले तरी ऐतिहासिक किंवा धार्मिक दृष्टिकोनातून सुद्धा नाशिकचे स्थानमाहात्म्य कोणत्याही प्रकारे कमी लेखता येत नाही. नाशिक शहराचे भौगोलिक स्थानच मोठे वैशिष्ट्यपूर्ण आहे. दक्षिणेकडे पसरत जाणार्‍या सह्याद्री पर्वताच्या रांगा व पूर्वेकडे पसरणारी सातमाला पर्वतराजी यांच्या कुशीत नाशिक पहुडले आहे असे म्हणता येते. शहराच्या कोणत्याही भागातून आजूबाजूला एक नजर जरी टाकली तरी सभोवती दिसणारा आसमंत काही आगळाच भासतो.

जगन्मातेची प्रतिमा

नवरात्रीचे दिवस सुरू आहेत. सोशल नेटवर्किंग साइटवरल्या एका ग्रुपमध्ये एक प्रसंग त्या निमित्ताने घडला. तेथे अनेक उपक्रमी असल्याने त्यांनी या चर्चेत भाग घेतलाच पण इतर उपक्रमींचे मत यावर जाणून घेणे महत्त्वाचे वाटले म्हणून चर्चा प्रपंच. लज्जागौरीचे चित्र टाकून त्या जग्नमातेला नमस्कार करणार्‍या एका गुणी इतिहास तज्ञाच्या पोस्टवर अनेक लोकांच्या भावना आईला/ मातेला अशा स्वरूपात दाखवल्याने दुखावल्या.

लज्जागौरीचे चित्र येथे देत आहे. ते उपक्रमींना नवे नसावे. हा मातृकेचा प्राचीन फॉर्म आहे.

एकच आडनाव असणार्‍या दोन व्यक्ति लग्न करू शकतात का ??

माझे एका मुलीवर प्रेम आहे...आणि मी तिला माझ्या मनातल्या भावना सांगून टाकल्या आहेत... ती माझ्याशी लग्न कारला तयार आहे पण समस्या एकच आहे की आमच्या दोघांचे आडनाव सारखेच आहे...माझ्या घरी काही समस्या येणार नाही पण तिने तिच्या घरी विचारावे म्हणून सहज याबद्दल विचारलं तर घरून तिला अस उत्तर मिळाले की "आडनाव सारखेच आहे, तुमचे लग्न होऊ शकत नाही " कारण काय तर तुम्ही भाऊ बहीण लागता म्हणे... तस पहिलं तर आमच्या कुटुंबाचे आणि तिच्या कुटुंबाचे दूर दूर पर्यन्त संबंध नाहीत ... आम्ही मूळ सांगलीचे आणि ते मूळ नागपुरचे.... असं कसं होऊ शकता कृपया कोणी मला मदत करू शकेल का इथे याबद्दल????

लेखनविषय: दुवे:

नशेचे पदार्थ खुले करुन चांगला समाज घडवा.

एक नवा विचार मांडतो आहे. कदाचित आधी कोणी मांडला ही असेल, पण मला माहीति नाही.

विचार वेड्गळ आहे असे पट्कन conclusion काढु नका. थोडा वेळ पचायला द्या.

नशेचे म्हणजे अफु, गान्जा, brown sugar असे पदार्थ कायदेशीर विक्री साठी खुले केले पाहेजेत. त्याचे असे फायदे होतील

१. हे पदार्थ filter म्हणुन काम करतील. ज्यांना काम करायचे आहे, जे सयंमी आहेत, ज्यांना जबाबदारी ची जाणिव आहे, ते ह्या मार्गाला जाणारच नाहीत. जे जातील त्यांना ह्या गोष्टी available असतील ते वापरतील आणि आपोआप च नष्ट होतिल. काही लोकांना थोड्या वेळानी अक्कल येइल, ते सुधारतील.

संशोधन आणि बंदी

cannabis for peace या संस्थेचे एक पत्रक नुकतेच वाचनात आले. त्यात cannabis च्या औषधी गुणधर्मा बाबत सखोल आणि शास्त्रशुद्ध माहिती दिली होती. मग उत्सुकता चाळवली म्हणून युट्युब वर cannabis सर्च केले ,तर एकापेक्षा एक नामवंत डॉक्टर cannabis च्या औषधी गुणधर्माची भलामण करताना दिसले.

जगभरात अनेक देशात cannabis वर बंदी आहे. भारतात "भांग "नावाचा प्रकार उत्तर भारतात सर्रास सर्वत्र उपलब्ध असतो, त्याला कायद्याने परवानगी आहे,म्हणजे दारू दुकानांचे जसे परवाने दिले जातात तसे भांगेच्या ठेक्यांचे परवाने दिले जातात. पण तिकडे भांग किंवा cannabis औषधी वनस्पती म्हणून ओळखली जाते .

 
^ वर