जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा हा व्यर्थ भार विद्येचा!

पुस्तक् 'गौतम बुध्द और उनका धम्म'

'गौतम बुध्द और उनका धम्म' डॉ. भीमराव रामजी आंबेडकरांनी लिहीलेल पुस्तक या दिवाळीच्या सुट्यांमधे वाचनात आले. बबासाहेबांनी लिहीलेल्या अनेक अप्रतीम रचनांपैकी ही त्यांची शेवटची रचना होती.

मुस्लिम देशांतील धर्मनिरपेक्षतावाद

लेखक (अनुवाद) - सुधीर काळे, जकार्ता
दूरगामी परिणाम असणार्‍या ट्युनीशियामधील निवडणुका संपून बरेच दिवस झाले आणि आता लक्ष इतरत्र द्यायची वेळ आली आहे. त्यात काळजाचा थरकाप उडविणारी गद्दाफीची निर्घृण हत्त्या, तुर्कस्तानमधला भूकंप आणि युरोपवरील आर्थिक संकट यांचा समावेश होतो. पण ट्युनीशियामधील निवडणुकांचा प्रभाव मात्र निःसंशयपणे त्या देशाच्या सीमांच्या पलीकडेही पडणार आहे.

ज्ञानेश्वरीतील अकरा ओव्या

लेखनविषय: दुवे:

करा अक्टींग..

दिवाळीच्या निमित्ताने आम्ही भावंडे एकत्र जमले होतोत.

दिवाळी अंक तर्कक्रीडा

दिवाळी अंकातील तर्कक्रीडा भागावर काही उत्तरे आली आहेत.

वजीराचे कोडे यावर मिहिर यांचे उत्तर आले आहे आणि ते बरोबर आहे.

लेखनविषय: दुवे:

बदलाचा इतिहास_धर्म

जीवन जगण्याची पद्धत म्हणजे धर्म ही धर्म या संकल्पनेची सोपी आणि सुटसुटीत व्याख्या.जगण्याची पद्धत समुहाप्रमाणे बदलत गेली आणि मग त्या प्रत्येक पद्धतीला एक एक विशिष्टं नामाभिधान चिकटवलं गेलं.मोकळं जगणं एका अर्थानं बंदिस्त झाल.धर्म संकल्पना राबवणारय़ांचा दावा असा की सामान्यातल्या सामान्याला धर्म म्हणजे नक्की काय पाळायचं हे बंदिस्त नियमावलीमुळेच स्पष्टं झालं.
या लेखाच्या निमित्ताने विचारमंथन व्हावं अशी एक इच्छा आहे.इथे काही उदाहरणं मांडली आहेत आणि त्यावर अनेक वाचक आपली मतं मांडू शकतील.परस्परांमधल्या मतमतांतर प्रक्रियेला चालना मिळून विषयाचा आवाका नजरेसमोर येत रहावा असा एक उद्देश.
एखादा धर्म सोडून दुसरा धर्म स्विकारावा हा विचार एखाद्या व्यक्तीच्या मनात का येत असावा? त्यानंतर कृतीची पूर्वतयारी आणि प्रत्यक्ष कृती कशी घडत असावी? त्यानंतरचे पडसाद काय स्वरूपाचे? हा या लेखाचा बीजविषय आहे.या संबंधातली केवळ उदाहरणं समोर ठेवणं हे या लेखाचं स्वरूप आहे.लेखावर वाचकतज्ज्ञांकडून उहापोह व्हावा ही सदिच्छा!
सुरवातीचं उदाहरण प्रत्यक्ष धर्मांतराचं नाही.कालानुक्रमानंही ते पहिलं नाही.जगण्याची पद्धत एवढाच शब्दश: आवाका या उदाहरणापुरता लक्षात घेऊया.
आपेगावच्या विठ्ठ्लपंत कुलकर्ण्यांना संसारात पडून मुरल्यानंतर, चार अपत्य झाल्यानंतर, गृहस्थधर्म सोडून संन्यस्तधर्म स्विकारावा असं का वाटलं असेल? एकाएकी, एका झटक्याच्या अंमलाखाली एखादी पुरूष व्यक्ती सर्वसंगपरित्याग करणं, तरुण वयात करणं हे त्या काळात कदाचित सहज असेल.मग काशीला जाणं.तिथे गेल्यावर विठ्ठलपंतांच्या गुरूंनी त्याना ’तू गृहस्थधर्म सोडणं ही चूक आहे.पुनश्च गृहस्थधर्म स्विकार!’ अशी आज्ञा करणं.ही आज्ञा शिरसावंद्य मानणं विठ्ठलपंतांना सोप्पं गेलं असेल? गुरूची आज्ञा तडकाफडकी शिरोधार्य मानण्याचा तो काळ.व्यक्तीच्या मनात आपल्या पुढच्या प्रवासांसंबंधात काही आलं नसेल? चलबिचल झाली नसेल? हे असं दोन टोकात गर्रकन् फिरणं या कृतीचा अर्थ एका व्यक्तीच्या अनुषंगातून कसा लावायचा? पुढे काय?

दिवाळी अंक- वाचलेले, चाळलेले, न वाचलेले

सालाबादाप्रमाणे दिवाळी आली व गेली. पहाट झाली भैरु उठला वगैरे. आता शिल्लक चिवड्या-चकल्यांची जशी नंतर एक सणसणीत तिखट मिसळ जमून जाते त्याप्रमाणे छापील दिवाळी अंकाची एक पारंपारिक खमंग चर्चा व्हायला हवी.

दिवाळी अंक २०११: "एक आनंदप्रिय, शांत देश : भूतान"

सर्वप्रथम, दिवाळी अंकातील 'एक आनंदप्रिय, शांत देश : भूतान' हा लेख वाचणार्‍यांचे व लेख वाचुन अभिप्राय कळविलेल्यांचे अनेक आभार!

दिवाळी अंक २०११: "दृष्टीचा डोळा पाहों गेलीये"

नंदन यांचा लेख खूप आवडला. स्वच्छ आणि नेमक्या भाषेत "आधुनिक कलाप्रवाहा"चा मस्त आढावा घेतला आहे.

दिवाळी अंक २०११: "उत्तर कोकणातील पोर्तुगीज वसाहत - वसई"

प्रियालींचा "उत्तर कोकणातील पोर्तुगीज वसाहत - वसई" लेख आवडला. छायाचित्रे बघून ही चर्चा आठवली! किल्ला पर्यटनासाठी "डिवेल्हप" करण्याबाबत मी उत्साही नाही. तसे झाले की प्लास्टिकच्या बाटल्या आणि चिप्स चे पुडके आले.

 
^ वर