इतिहास

भारतीय राष्ट्रध्वज....!!!

तिरंगा उत्सव तीन रंगाचा ,
आभाळी आज सजला ,
नतमस्तक मी या सर्वांसाठी ,
ज्यांनी भारत देश घडविला,
भारत देशाला मनाचा मुजरा...

छत्रपती घराणे...!!!

कशास हवा तुम्हा सिकंदर ,अन कशास हवा कोलंबस !
अरे छत्रपतीला स्मरा एकदा, शिव छत्रपतीला स्मरा एकदा,
अन बघा तुम्हीच कि हो सिकंदर, अन तुम्हीच हो कोलंबस !

साहेबांची रमा .........!!!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैवाहिक जीवनाची सुरुवातीची वर्षे अत्यंत हलाखिमध्ये व गरिबीत गेली. त्यांच्या पत्‍नी रमाबाई मोठ्या उदार मनाच्या व पतीला सदोदित साथ देणार्‍या होत्या. दलित-बहुजन समाजाला न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी बाबासाहेबांनी सुरू केलेल्या अथक संघर्षामुळे बाबासाहेब स्वता:च्या प्रपंचाकडे फारसे लक्ष देऊ शकले नाहीत. पण, आपल्या पत्‍नीवर त्यांचे अपार प्रेम होते.

शिवपत्नी सईबाई....!!!

छत्रपती शिवरायांच्या पहिल्या पत्नी. धर्मवीर संभाजी राजांच्या मातोश्री. जिजाऊ मातोश्रींची सर्वात प्रिय व संस्कार प्रिय सून. सईबाई या छत्रपती संभाजी राजांच्या आई होत्या, सईबाईंचे वडील माधोजीराव निंबाळकर होते. छत्रपती शिवरायांबरोबर सईबाईंचा विवाह झाला तेंव्हा त्या फक्त ७ वर्ष्याचा होत्या. आणि शिवराय ११ वर्ष्यांचे होते. त्यांच्या चेहऱ्याचा रंग गव्हाळ होता. त्या शिवरायांच्या स्फूर्तीस्थान आणि सामर्थ्यवान अश्या पत्नी होत्या. त्यांच्या मृत्युनंतर शिवरायांना त्यांची भरपूर उणीव भासली. संभू राजांना पाहताना शिवरायान पुढे सईबाईंची आभास मूर्ती उभी राहत असे. मृत्यू समयी शिवरायांच्या तोंडून शेवटचा शब्द "सई" निघाला होता.

महाराष्ट्राचे वैभवः हेमाडपंती मंदिरे

sangameshwarप्राचीन भारतात दैवतांची भव्य देवळे बांधण्याची प्रथा गुप्त राजवटीत (इ.स.३२० ते ५५०) सुरू झाली असे मानले जाते. गुप्त कालापासून आजतागायत भारतातील विविध प्रांतात विविध धाटणीची देवळे उभी राहिल्याचे दिसून येते. स्थानिक स्थापत्यशास्त्र, शिल्पकला, कलाकुसर वगैरेंचा या देवळांच्या बांधकामावर मोठा प्रभाव दिसतो. स्थापत्यशास्त्राचे हे पुरावे तत्कालीन संस्कृतीची ओळख आणि माहिती करून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. खजुराहो, कोणार्क, हम्पी आणि चालुक्यांची बदामी येथील मंदिरे त्यांच्या स्थापत्य आणि शिल्पकामांसाठी विशेष प्रसिद्ध आहेत आणि पर्यटनस्थळेही गणली जातात।

भास्कराचार्यांचे पाटण आणि चंगदेवाचा मठ


चंद्रशेखर ह्यांच्याप्रमाणेच मीहि सुमारे १५ वर्षांपूर्वी औरंगाबादहून निघून पितळखोर्‍याची लेणी (२०.३१३८° उ ७४.९९२१° पू) पाहण्याचा प्रयत्न केला होता. पावसाळ्याचे दिवस होते. औरंगाबादहून दीड-दोन तास चारचाकीने गेल्यावर आम्ही ज्या दरीत लेणी आहेत तिच्या कडेवर जाऊन पोहोचलो. समोर दरीतील धबधबा आणि नाला भरून वाहात होते.

देश- राष्ट्र काहीसे विस्कळित....

वैधानिक इशारा:-
पुढील मजकूर काहिसा विस्कळित आणि वादावादी करताना अचानक आठवलेला मजकूर इतकाच समजावा. फार अधिक माहितीमूल्य वगैरे ह्यात अजिबात मिळणार नाही. नॉर्मल माणसांना आनंदाच्या उकळ्या फुटतात तशा आम्हाला विस्कळित प्रतिक्रियांच्या उकळ्या फुटतात असे समजून माफी करावी.
अठराव्या शतकात इंग्रज जिंकणारच होते. आपण एकसंध नव्हतो ना. भारत कधीच एकसंध वगैरे नव्हता ना. शेकडो राज्ये होती. एकसंध असा भारत नव्हता वगैरे वगैरे नेहमीची शाळकरी बडबड काल परवा कुणीतरी करत होतं.
शुंभांनो, त्याकाळी भारतच नव्हे, तर आख्खे जग तस्सेच होते. युरोपमध्ये सामंतशाहीचीच थोडी नवी आवृत्ती सुरु होती. खुद्द आज दिसणारा ब्रिटन/इंग्लंड/यू के असे काही एक राज्य नव्हते. जर्मनी , इटाली हे देश मुळातच अस्तित्वात नव्हते.

वांग मराठवाडीची संघर्षगाथा...

काही दिवसांपूर्वी मी वांग मराठवाडीला भेट देऊन आलो. त्याबद्दल इथे लिहिलं आणि खूप जणांनी जाहिर / वैयक्तिक प्रतिसाद दिले. काही जणांनी नेमके प्रश्न विचारून या सर्वच प्रकरणाबद्दल अधिक जाणून घ्यायची उत्सुकता दाखवली. काही जणांनी प्रत्यक्ष मदत करायच्या दिशेने पाऊल टाकले. सगळ्यांचेच आभार. मनापासून.

त्या लेखात मी म्हणलं होतं की माझी माहिती फार तोकडी आहे. आणि म्हणूनच, या संघर्षात, सुरूवातीपासून आघाडीवर असणार्‍या सुनिती सु. र. यांनी लिहिलेला हा लेख इथे देत आहे. त्यावरून अजून बर्‍याच बाबी वाचकांना नीट समजतील अशी आशा आहे. या बाबतीत काही प्रश्न असल्यास ते सुनितीताईंपर्यंत पोचवायचा आणि त्यांचे म्हणणे इथे मांडण्याचा प्रयत्न राहिल.

आंद्रे साखारॉव्ह: विश्वशांतीचा ध्यास घेतलेला अणुशास्त्रज्ञ


'नेचर' या विज्ञानविषयक साप्ताहिकातील 'मिलेनियम एस्सेज' या सदर लेखनात एका वैज्ञानिकाने आंद्रे साखारॉव्हच्या (1921 - 1989) कार्याची तुलना महात्मा गांधीजींच्या जीवनकार्याबरोबर करता येते असा उल्लेख केला होता. कुशाग्र बुद्धिमत्ता, आसाधारण मानसिक धैर्य व प्रामाणिकपणा या गुणांच्या जोरावर कुठल्याही राजकीय वा लष्करी दबावाला वा विरोधाला न जुमानता, प्रसंगी स्वत:चे जीवन धोक्यात घालून आपले उद्दिष्ट साधणारे विसाव्या शतकातील हे दोन महान नेते होते. पाशवी शक्तीविरुद्ध एकाकी लढताना लोक जागृती हेच ध्येय समोर ठेवून त्यानी आयुष्यभर लढा दिला. कारण या दोघानाही भविष्यकाळात मानव वंशावर कोसळणाऱ्या संकटांची पूर्ण कल्पना होती. माणूस म्हणून स्वत:वरील जबाबदारी टाळणे वा ऐन मोक्याच्या क्षणी निष्क्रीय राहणे ही एका प्रकारे स्वत:शीच केलेली प्रतारणा आहे, असे त्यांना वाटत होते.

एका साम्राज्याच्या शोधात कार्ले गुंफा भाग 4

सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी याच्या 24 वर्षाच्या राज्यकालानंतर इ.स.110 मध्ये त्याचा पुत्र वशिष्ठीपुत्र पुळुमावी हा सातवाहनांच्या गादीवर आला. पुळुमावीने 28 वर्षे राज्य केले. इ.स.

 
^ वर