माहिती

साहेबांची रमा .........!!!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैवाहिक जीवनाची सुरुवातीची वर्षे अत्यंत हलाखिमध्ये व गरिबीत गेली. त्यांच्या पत्‍नी रमाबाई मोठ्या उदार मनाच्या व पतीला सदोदित साथ देणार्‍या होत्या. दलित-बहुजन समाजाला न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी बाबासाहेबांनी सुरू केलेल्या अथक संघर्षामुळे बाबासाहेब स्वता:च्या प्रपंचाकडे फारसे लक्ष देऊ शकले नाहीत. पण, आपल्या पत्‍नीवर त्यांचे अपार प्रेम होते.

महाराष्ट्राचे वैभवः हेमाडपंती मंदिरे

sangameshwarप्राचीन भारतात दैवतांची भव्य देवळे बांधण्याची प्रथा गुप्त राजवटीत (इ.स.३२० ते ५५०) सुरू झाली असे मानले जाते. गुप्त कालापासून आजतागायत भारतातील विविध प्रांतात विविध धाटणीची देवळे उभी राहिल्याचे दिसून येते. स्थानिक स्थापत्यशास्त्र, शिल्पकला, कलाकुसर वगैरेंचा या देवळांच्या बांधकामावर मोठा प्रभाव दिसतो. स्थापत्यशास्त्राचे हे पुरावे तत्कालीन संस्कृतीची ओळख आणि माहिती करून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. खजुराहो, कोणार्क, हम्पी आणि चालुक्यांची बदामी येथील मंदिरे त्यांच्या स्थापत्य आणि शिल्पकामांसाठी विशेष प्रसिद्ध आहेत आणि पर्यटनस्थळेही गणली जातात।

भास्कराचार्यांचे पाटण आणि चंगदेवाचा मठ


चंद्रशेखर ह्यांच्याप्रमाणेच मीहि सुमारे १५ वर्षांपूर्वी औरंगाबादहून निघून पितळखोर्‍याची लेणी (२०.३१३८° उ ७४.९९२१° पू) पाहण्याचा प्रयत्न केला होता. पावसाळ्याचे दिवस होते. औरंगाबादहून दीड-दोन तास चारचाकीने गेल्यावर आम्ही ज्या दरीत लेणी आहेत तिच्या कडेवर जाऊन पोहोचलो. समोर दरीतील धबधबा आणि नाला भरून वाहात होते.

वांग मराठवाडीची संघर्षगाथा...

काही दिवसांपूर्वी मी वांग मराठवाडीला भेट देऊन आलो. त्याबद्दल इथे लिहिलं आणि खूप जणांनी जाहिर / वैयक्तिक प्रतिसाद दिले. काही जणांनी नेमके प्रश्न विचारून या सर्वच प्रकरणाबद्दल अधिक जाणून घ्यायची उत्सुकता दाखवली. काही जणांनी प्रत्यक्ष मदत करायच्या दिशेने पाऊल टाकले. सगळ्यांचेच आभार. मनापासून.

त्या लेखात मी म्हणलं होतं की माझी माहिती फार तोकडी आहे. आणि म्हणूनच, या संघर्षात, सुरूवातीपासून आघाडीवर असणार्‍या सुनिती सु. र. यांनी लिहिलेला हा लेख इथे देत आहे. त्यावरून अजून बर्‍याच बाबी वाचकांना नीट समजतील अशी आशा आहे. या बाबतीत काही प्रश्न असल्यास ते सुनितीताईंपर्यंत पोचवायचा आणि त्यांचे म्हणणे इथे मांडण्याचा प्रयत्न राहिल.

सीरियात चाललेली उलथापालथ

नातेवाईकांच्या किंवा जातीवर आधारलेल्या राजकारणात रक्ताच्या नात्यांनाच शेवटी महत्व येते. सध्या सरकारविरोधी उठावात रस्त्यावर सांडले जाणारे रक्त आहे सुन्नी मुसलमानांचे. त्यामुळे एव्हाना तलास कुटुंबियांवर सुन्नींची बाजू घेण्यासाठी प्रचंड दबाव येऊ लागला असावा. याहूनही महत्वाची गोष्ट म्हणजे या शिया पंथाला जवळ असणार्या ’अलावी गटाच्या सत्ताधार्यां ना समर्थन देण्याची जी किंमत भविष्यकाळात मोजावी लागेल ती तेंव्हां मोजण्याऐवजी आता आपण आपले समर्थन मागे घेण्याची वेळ आताच आलेली आहे असा हिशेब तलास कुटुंबियांनी केलेला असावा! या निर्णयामागचे नक्की कारण स्पष्ट झालेले नाहीं.

वांग मराठवाडी... एक (इन प्रोग्रेस) सत्याग्रह!

गेल्या काही दिवसांपासून, किंवा महिन्यांपासून म्हणा हवं तर, वांग मराठवाडी हे नाव सतत कानावर येत होतं. मधून मधून मेल्स येत असत. त्या सगळ्यावरून झालेलं आकलन एवढंच होतं की सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात वांग नदीवर मराठवाडी इथे एक धरण बांधलं जात आहे. शासकिय भाषेत बोलायचं तर 'वांग मध्यम प्रकल्प'. आणि बहुतेक सगळ्या धरणांच्या बाबतीत होतं तसं इथेही पुनर्वसनाच्या नावाने बोंब आहे. मात्र मागच्या आठवड्यात मेल आलं की आता तिथे सत्याग्रह चालू होतोय. सत्याग्रह म्हणजे, आपल्या हक्काच्या जमिनीवर पेरणी करणं, तिथे ठाम उभं राहणं. पाणी चढलं तरी हरकत नाही. पाहिजे तर बुडून मरू पण हक्क सोडायचा नाही. नर्मदेतले अशा पद्धतीचे फोटो बघितलेच असतील बहुतेकांनी. इथेही तसंच काहीसं.

उपक्रमवरील प्रस्तावित बदलांविषयी निवेदन

उपक्रमला ड्रुपलच्या सुधारीत आवृत्तीवर नेण्याचे काम सुरू आहे. त्यात होणार्‍या प्रगतीविषयी या धाग्यावर वेळोवेळी माहिती दिली जाईल. या बदलादरम्यान सदस्यांना कमीतकमी गैरसोय होईल याची काळजी घेण्याचा आमचा प्रयत्न आहे.

- उपक्रम व्यवस्थापन

आंद्रे साखारॉव्ह: विश्वशांतीचा ध्यास घेतलेला अणुशास्त्रज्ञ


'नेचर' या विज्ञानविषयक साप्ताहिकातील 'मिलेनियम एस्सेज' या सदर लेखनात एका वैज्ञानिकाने आंद्रे साखारॉव्हच्या (1921 - 1989) कार्याची तुलना महात्मा गांधीजींच्या जीवनकार्याबरोबर करता येते असा उल्लेख केला होता. कुशाग्र बुद्धिमत्ता, आसाधारण मानसिक धैर्य व प्रामाणिकपणा या गुणांच्या जोरावर कुठल्याही राजकीय वा लष्करी दबावाला वा विरोधाला न जुमानता, प्रसंगी स्वत:चे जीवन धोक्यात घालून आपले उद्दिष्ट साधणारे विसाव्या शतकातील हे दोन महान नेते होते. पाशवी शक्तीविरुद्ध एकाकी लढताना लोक जागृती हेच ध्येय समोर ठेवून त्यानी आयुष्यभर लढा दिला. कारण या दोघानाही भविष्यकाळात मानव वंशावर कोसळणाऱ्या संकटांची पूर्ण कल्पना होती. माणूस म्हणून स्वत:वरील जबाबदारी टाळणे वा ऐन मोक्याच्या क्षणी निष्क्रीय राहणे ही एका प्रकारे स्वत:शीच केलेली प्रतारणा आहे, असे त्यांना वाटत होते.

एका साम्राज्याच्या शोधात कार्ले गुंफा भाग 4

सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी याच्या 24 वर्षाच्या राज्यकालानंतर इ.स.110 मध्ये त्याचा पुत्र वशिष्ठीपुत्र पुळुमावी हा सातवाहनांच्या गादीवर आला. पुळुमावीने 28 वर्षे राज्य केले. इ.स.

एका साम्राज्याच्या शोधात कार्ले गुंफा भाग 3

मगध देशामध्ये राज्य करणार्‍या शुंग राजघराण्याची इ.स.पूर्व 26 मध्ये संपुष्टात आलेली कारकीर्द व कुषाणांचा इ.स.

 
^ वर