अणू आहेत की नाहीत? - अणुवादाचे प्राचीन खंडन

प्रस्तावना

शाळेत असताना इतिहासाच्या पुस्तकात आपण शिकलो की प्राचीन काळात भारतातले कणाद ऋषी अणु-वादी होते. त्यावेळी अशी शंका माझ्या मनात आली, की मग त्यानंतर त्या ज्ञानाची प्रगती का नाही झाली? त्या अणुवादाचे सांगोपांग खंडन झाले, हेच त्याचे कारण. खंडन करणार्‍यांपैकी प्रखर बुद्धिमत्तेचे शंकराचार्य हे अग्रणी होते.

प्राचीन अणुवादाचे स्वरूप काय होते? त्याचे आद्यशंकराचार्यांनी कसे खंडन केले? ते खंडन आज आपल्याला पटण्यासारखे आहे का? हे सर्व विचार मनात येऊ शकतात. म्हणून मूळ स्रोताकडे जाऊन बघणे उपयोगी ठरावे. ब्रह्मसूत्रांच्या शांकरभाष्यात हे विवेचन सापडते. दुसर्‍या अध्यायातली काही सूत्रे, आणि त्यावरील भाष्य या कार्याला वाहिलेली आहेत. याला "परमाणु-जगद्-अकारणत्व-अधिकरण", म्हणजे "परमाणू हे जगाचे कारण नसल्याचे प्रकरण" असे म्हणतात (ब्रह्मसूत्रभाष्य २.२.१२-२.२.१७). प्राचीन विचारवंतांचे वादविवाद आणि विचार अभ्यास करण्यासारखे असतात. केवळ "प्राचीन" म्हणून त्यांचा नवीन विचारांशी घटस्फोट होऊ नये. शिवाय प्राचीन विचारांच्या आह्वानाला पुरला, तरच नवीन विचार स्वीकार करावा. या कारणासाठी प्राचीन अणुवाद, आणि त्याचे खंडन आजही विचारात घेण्यालायक ठरावे.

यात जुन्या काळच्या वादांचे एक चांगले वैशिष्ट्य सांगितल्यावाचून राहात नाही - सुरुवातीला शंकराचार्य थोडक्यात कणादांचे मत थोडेफार पटेल अशा पद्धतीने देतात, आणि मगच त्याचे खंडन करतात. दुसर्‍याचे म्हणणे निरर्थक आहे, अशा रीतीने चर्चा सुरू करत नाहीत. (तसा शेवट करतात ते महत्त्वाचे नाही, कारण त्यांच्या मते त्यांनी उत्तम वाद मांडला आहे, पूर्ण खंडन झाले आहे.) दुसर्‍याचे म्हणणे जवळजवळ पटेल असे सुरुवातीला मांडण्याची ही स्तुत्य पद्धत अंगीकारली तर आजचेही अनेक वादविवाद अधिक प्रगतिशील होऊ शकतील.

अनुक्रमणिका

 
^ वर