धर्मांतरण म्हणजे काय ?
धर्मांतरण म्हणजे काय ?
धर्मातरण म्हणजे धर्म बदलणे.
धर्म हा नैसर्गिक आहे, शाश्वत आहे, धर्मांतरण अनैसर्गिक व अशाश्वत असून ते स्वीकारणे योग्य नाही.
धर्मातरणाची प्रवृत्ती का निर्माण होते व कोणामध्ये निर्माण होते ते पाहूया -
जगाच्या इतिहासात हिंदूंनी अत्याचार केले धर्मातरण केले आक्रमणे केली याची कोठेही नोंद नाही. परंतु
काही हजार वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या बौध्द ख्रिस्ती व इस्लाम या पंथांनी तलवारीच्या बळावर,
कपटाने, अमिषाने, आक्रमणाने लाखो हिंदूंना धमे बदलायला लावला. संपूर्ण जगावर राज्य करण्याची
सुक्त व तीका इच्छाशक्ती तसेच आपलाच धर्म सर्वश्रेष्ठ आहे याची अज्ञानावर आधारलेली संकुचित
विचारसरणी त्यांना इतरांचे धर्मातरण करण्यास प्रवृत्त करते.
याबाबत त्यांच्या धर्मग्रंथात दिलेली शिकवण, ती न पाळल्यास देवाकडून होणारी प्रचंड शिक्षा व
पाळल्यास स्वर्गाचे मिळणारे प्रचंड लाभ त्यांना सातत्याने व कोणत्याही मार्गाने स्वर्गाचे करण्यास
प्रवत्त करतात यामुळेच आजच्या जगाच्या स्थितीचा विचार केला तर इस्लाम व ख्रिस्ती धर्मीयांमध्ये
जग पादाक्रांत करण्यासाठी प्रचंड चढाओढ असल्याचे दिसते. त्यासाठी सर्व नैतिक व अनैतिक मार्गांचा
सर्रास व राजरोसपणे वापर केला जातो.
भारताचा विचार कएएेल्यास पूर्वेकडील सात राज्ये जवळजवळ िख्र्तासी झाल्याचे दिसून येते. िख्र्त्यासंनी ही
राज्ये गिळकृंत केल्यातच जमा आहे. तेथील आदिवासी सुध्दा त्यांची भाषा सोडून इंग्रजी बोलतात व
पेहरावही ख्रिस्ती लोकांप्रमाणेच घालतात.
आज भारतातील २४० जिल्ह्यांची स्थिती अशी आहे की तेथे मुसलमानांनी पध्दतशीरपणे त्यांची
लोकसंख्या वाढवली आहे. या जिल्ह्यांमध्ये काही काळातच मुसलमान आपले लोकप्रतिनीधी
निश्चीतपणे ठरवू शकतील अशी स्थिती निर्माण होणार आहे. असे निडून आलेले प्रतिनीधी ज्या ज्या
ठिकाणी त्या त्या ठिकाणी जबरदस्तीने धर्मातरण करवून घेता येईल, तसेच लोकशाही अंतर्गत मुस्लिम
राजवटीखाली हिंदूंचा अनन्वित छळ करण्यात येईल जेणेकरुन ते धर्मातरीत होतील किंवा तो प्रदेश
सोडून जातील.
धर्मातरण करण्याच्या मुसलमांनाच्या पध्दती -
१. हिंदु मुलींना फूस लावून मुस्लिम मुलांशी लग> करायला लावणे.
२. मागासवर्गीय हिंदूंना आमिष दाखवून धर्मातरीत करणे.
३. मुस्लिमबहुल विभागातील हिंदूंना दहशतीने धर्मातरीत करणे.
४. विवीध मार्गांनी हिंदूंशी संघर्ष करुन त्यांची हत्या करणे.
भारताचे इस्लामीकरण करण्याचे नियोजन व धोरणे -
१. भारत सरकारचा कुटुंबनियोजन कार्यक्रम धुडकावून लोकसंख्या वाढविणे.
२. मशिदी, मदरसे यांची भक्कम व व्यापक साखळी तयार करणे.
३. भारतातील प्रत्येक मुस्लिमबहुल विभागातील अशिक्षीत मुस्लिम तरुणांना अतिरेकी कारवायांसाठी
उत्तेजित करणे.
४. पाकपुरस्कृत अतिरेकी कारवायांना मदत करणे.
५. त्यासाठी परदेशातून पैसा गोळा करणे.
६. शरियत व मुस्लिम कायद्यात ढवळाढवळ न करण्याबाबत सरकारवर दबाव आणणे.
७. धार्मिक दंगली घडवून आणणे.
८. राज्यकर्ते प्रसारमाध्यमे, विद्वान, लेखक यांना विकत घेऊन पध्दतशीरपणे हिंदु संस्कृती, नेते व
संघटना यांची बदनामी करणे.
९. बांग्लादेशी मुसलमानांना आसरा देऊन लोकसंख्या वाढविणे.
फाळणीच्या वेळी एकूण २४ ज्ञ् मुसलमान भारतातच राहिले. याचा अर्थ असा की मुसलमानांना त्यांनी
मागितलेल्यापेक्षा दुप्पट जागा मिळाली.
त्यावेळी भारतातील मुसलमानांची लोकसंख्या ३.५ कोटी होती. १९९१ मध्ये ती १४ कोटी झाली तर
आता ती १६ कोटीपेक्षाही जास्त आहे. यामध्ये २ कोटी बांग्लादेशी मुसलमानांचा समावेश केला पाहिजे.
हिंदु व मुसलमान यांच्या लोकसंख्येचे प्रमाण ४ : १ असे होते. १९९१ मध्ये ते ३ : १ असे झाले. आता
ते याहीपेक्षा कमी असणार आहे.
इस्लामच्या दृष्टीने विभाजन -
१. इतिहासाचे - इस्लामपूर्व इस्लामनंतर
२. मानवी समाजाचे - अल्ला, प्रेषित महंमद यांना मानणारा व काफिर - अल्लाला न मानणारा
३. पृथ्वीचे - दारुल इस्लाम - इस्लामबहुल व दारुल हरब - इस्ला अल्पसंख्य
अल कायदा - महंमद पैगंबरांची शिकवण मान्य केलीत तरच जग शांततेने नांदेल. जे कोणी हे मान्य
करणार नाही त्यांना जगण्याचा अधिकार नाही
मुसलमानांच्या तत्वानुसार त्यांचा धर्म एका जागी मर्यादीत नसून तो संपूर्ण जगात कायमस्वरुपी
पसरवायचा आहे.
हिंदूंची देवावरील श्रध्दा नष्ट करण्यासाठी व विश्वास मोडण्यासाठी देवळे तोडली जातात.
देवळे नुसतीच तोडली जात नाहीत तर मंदिरे तोडण्याच्या प्रक्रियेचे तपशीलवार वर्णन अलंकारीत भाषेत
नोंद करुन ठेवले जाते. त्यामुळे नवीन पिढीला मूर्तीभंजनाची प्रेरणा मिळते. धोंड, जिल्हा पुणे येथे
मशिदीच्या भिंतीवर लिहले आहे की ही इमारत ३३ मंदिरे तोडून बांधलेली आहे. मूर्तीभंजन व अल्लाला
मानणे हेच कुराणचे सार आहे.
श्रध्दाळू मुसलमान मूर्ती व देवळांचा तीका तिरस्कार करतात. ताचाच अर्थ या तिरस्काराचे रुपांतर
विध्वंसामध्ये होणार हे निश्चित ! प्रेषित महंमदाने स्वत: मूर्ती व मंदिरे तडून मुसलमानांसमोर उदाहरण
(?) ठेवले आहे.
शहाबुद्दीन घोरीने पृथ्वीराज चौहानला पराजीत केल्यावर अजमेरला भेट दिली. तेथील सूफी संत ख्वाजा
मोईबुद्दीन यांनी पृथ्वीराजला हरविण्यात मदत केली होती. तेथे एक मंदिर अडीच दिवसात तोडले व
त्याला अढाई दिनका व झोपडा असे नाव दिले.
ख्रिस्ती मिशनऱ्यांची आक्रमणे
ख्रिस्ती मिशनऱ्यांचा इतिहास दर्शवितो की ते एका हातात बायबल व एका हातात तलवार घेऊन आले.
सेंट थॉमस, वास्को द गामा, सेंट झेवियर, रॉबर्ट दी नोबल इत्यादी सर्वांनीच गरीब, अज्ञानी व भोळया
हिंदूंना दाकाने, फसवून जवळीक साधून धर्मांतरीत केले आणि हजारो परातन मंदिरे तोडली.
स्वातंत्र्यानंतर त्यांनी आपल्या कार्यपध्दतीची तंत्रे, धोरणे व मार्ग बदललेस. अत्यंत धूर्तपणे
व नळकत अप्रत्यक्षपणे, कावेबाजपणे त्यांनी मुसलमांनापेक्षाही प्रचंड परिणम साध्य केला आहे.
ख्रिस्ती मिशनऱ्यांची धोरणे :
१. कोणत्याही मार्गाने आदिवासी, गरीब भोळयाहिंदूंचे धर्मांतरण करणे.
२. पुरेसे अनुयायी मिळल्यावर त्या भागासाठी स्वतंत्र राजाच्या दर्जाची मागणी करणे.
३. स्वतंत्र मागणीसाठी चळवळ सुरु करणे.
राष्टी्रय व अंतराष्टी्रय राजकारण, बहुराष्ट्रीय कंपन्यांचा दबाव इत्यादी मार्गाने ख्रिस्ती संस्था सरकारच्या
धोरणात ढवळाढवळ करत आहेत. हे साध्य करण्यासाठी ते कायदे, व्यवस्थापन, शिष्यचार, चळवळ इ.
अश्या अनेक मार्गांचा वापर करतात.
चर्चकडे या प्रत्येक विषयातील तज्ञ आहेत.
या सर्वांचा परिपाक म्हणजे घटनेतील धार्मिक स्वातंत्र. अल्पसंख्यांकांना शिक्षण, निधर्मी राज्यव्यवस्था
यांच्या नावाखाली सर्रासपणे व राजरोस होणारी हिंदूंवी मानहामी व धर्मांतरण
धर्मातरणाचा आवाक व प्रभाव वाढविण्यासाऱ्ठी मिशनरी हिंदू नावे धारण करत आहेत. तसेच आश्रम
बांधून त्यांनाही हिंदू नावे देत आहेत. तेथे जीझस व मेरी यांचे पुतळे ठेवून धुप, जप, उदबत्ती इत्यादी
हिंदु पूजाविधीतील रितीरीवाज पाळत आहेत.हिंदु धर्मातील सत् चित् आनंद म्हणजे ख्रिस्ती पंथातील
पवित्र त्रिकूटच आहे.असेही ते सांगतात.
चर्चच्या कार्यपद्धतीत चर्चचा उद्देश सफल होत असेल तर कोणताही मार्ग अयोग्य मानला जात
नाही.आंध्र कर्नाटक सीमेवरील जॉन अब्राहम मेमोरीयल होमच्या माध्यमातून अनेक हिंदू बालके
कोट्याबधी रुपयांना बळी पडली परदेशी ख्रिस्तीना विकली जात असल्याचे उघडकीस आले.या
संस्थेव्या संचालीका सावित्री रॉबर्ट महीला कॉग्रसच्या सदया होत्या.१९९९ मध्ये त्यांच्या बँकेत ५ कोटी
रुपरे होते व २००० साली त्यांनी ४५ लाख रुपये करला.
ख्रिस्ती झाल्यावर जातीव्यचस्था नष्ट होते हा भ्रम आहे
अखिल भारतीय मागासवर्गीय मुस्लिम मोर्चा चे अध्यक्ष डॉ इजाझ - दलीत मुसलमानांचे सामाजीक
स्थान दलीत हिंदूंसारखे आहे.धर्मातरणामुळे त्यांना त्यांच्या सामाजीक दर्जात बदल घडवणे शक्य झाले
नाही.
धर्म व अध्यात्माच्या स्तरावर चर्चचा अपेक्षाभंग झाल्याने आता त्यांनी सामाजीक व आर्थीक मुद्यांच्या
आधारावर समाजातील कमकुवत घटनांचा लाभ उठवन्यास सुरवात केली आहे.दलीत आणी स्त्रीयांच्या
मुक्तीच्या नावाखाली अनेक चळवळी सुरु केल्या आहेत.
भारताचे सार्वभौमत्व जागतीक बँक नाणेनीधी डब्लू.टी.ओ. इ. आंतररष्ट्रीय संस्थामुळे धोक्यात आले
आहे् या संस्था अप्रत्यक्षपणे िख्रस्ति संस्थांनकडुन निंयत्रित नेल्या जाताय.
डब्लू.टी.ओ.मुळे भारतात बहुराष्ट्र कंपन्यांना मुक्त संचारास मुभा मिळाली आहे.परिणामस्वरुप प्रत्येक
भारतामध्ये आपल्याकडे सर्व अत्याधुनिक यंत्रे,उपकरणे,सुख,सुविधाअसाव्यात अशी प्रबळ ईच्छा
निर्माण झाली आहे.त्यासाठी तो आपली संस्कृती,धर्म,परंपरा यांचाही त्याग करायला तयार आहे.तसेच
स्थानिक लघु्यद्योगही नेस्तनाबूत होत आहेत
ख्रिस्ती संस्थाची धोरणे
१)गरीबांना आमीष दाखवून धर्मातरण
२)मध्यम वर्गीयांना चैनिच्या वस्तू मिळवण्यामध्ये गुंतवून स्वत:ता धर्म व संस्कृती या पासून अलिप्त
करायचे
पाश्र्चिमात्य देशात ख्रिस्ती पंथ लयास जात आहेत.पाद्री व नन च्या भूमिकेसाठी फारच थोडे जण तयार
होत आहेत.या जागा काही प्रमाणात भरुन काढण्यासाठी चर्चने आपला मोर्चा आशिया खंडाकडे-
भारताकडे वळवला आहे.कारण हिंदू भाविक असून धर्मोपदेशकाची भूमिका सहजतेने पार पाडू
शकतील असे आहेत. याच दरम्यान ख्रिस्शन हे अमेरीकेतील हिंदु धर्मावर आधारीत प्रसंगाला प्रत्युतर
म्हणून भारताला निशाण बनवत आहेत.अमेरीकेतील प्रसार त्यांना अत्यंत धोकादायक वाटतो त्यामुळे ते
हिंदुत्वाला व हिंदु गुरूंना नावे ठेवतात व सैतानाचा धर्म म्हणतात.
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा किंवा सदस्य व्हा

काही प्रश्न
लेख विस्तृत आहे आणि इस्लाम आणि ख्रिस्ती धर्माच्या जुलूमाने बाटवतात हे ही मला मान्य आहेत हे आधीच स्पष्ट करते. मला स्वतःला बाटवण्याचे प्रकारही घडले आहेत. म्हणजे ब्रेन वॉशिंग. या धर्मांची स्थिती जन्माला आल्यापासूनच "खतरेमें" आहे आणि हेच कारण धर्मांतरण करायला लावण्यास कारणी असावे. असो, मूळ लेखावर नंतर प्रतिसाद देईन पण तरीही काही प्रश्न पडले.
बौद्ध धर्माने तलवारीच्या जोरावर धर्म बदलण्यास लावला याचे उदाहरण देता येईल का?
असे का झाले असावे? जबरदस्ती आणि अमिष हेच कारण असावे का?
कशासाठी विकली जातात. त्यांना गैर-उद्योगांना लावले जाते का?
इतिहासात जुलूमाने बाटवलेल्यांना हिंदू धर्मात परत आणण्याच्या नोंदी किती? शिवाजी महाराजांच्या इतिहासाकडे पाहिले तर २ आठवतात. अधिकही असतील पण हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्याच असाव्यात. असे का?
संपूर्ण भारतात किती जिल्हे असावेत?
थोडेसे ऐकीव
वर प्रियालींनी म्हणल्याप्रमाणे लेख सविस्तर आहे. अधिक प्रतिक्रीया नंतर देइन. फक्त मला देखील आपण बौद्ध धर्मास त्यात का गोवले ते समजले नाही. एक फक्त वाचले होते ते म्हणजे अशोकाने धर्मांतर केल्यानंतर त्याने व त्याच्या नंतरच्या काळात काही राजांनी बौद्धधर्माचा अथवा त्यातील अहींसेचा अतिरेक केला. अर्थात त्या संदर्भात पण त्यांनी काही ख्रिस्ती-इस्लाम सारखे प्रकार केल्याचे ऐकीवात नाहीत. आंबेडकरांचे कारण वेगळेच होते आणि त्यांचा निर्णय बुद्धीवादी आणि सामाजीक होता असे म्हणावेसे वाटते.
भारताचा विचार केल्यास पूर्वेकडील सात राज्ये जवळजवळ ख्रिस्ती झाल्याचे दिसून येते. असे का झाले असावे? जबरदस्ती आणि अमिष हेच कारण असावे का?
या संदर्भात जे ऐकले त्या प्रमाणे ब्रिटीशांच्या काळात तेथे त्या भागातील लोकांव्यतिरीक्त बाहेरून फक्त मिशनर्यांना जायलाच पर्वानगी होती, स्वातंत्र्यानंतर पण बराच काळ तेच राहीले (जसे १९३५ चे कायदे आजही काही बाबतीत लागू करतात - अर्थात घटनेत सामील करून तसे). त्याचा त्यांना अयोग्य पद्धतीने बस्तान बसवायला फायदा झाला. पण ही माहीती ऐकीव आहे, जर कोणाला अधिक माहीती असल्यास सांगावे.
एक ऐकलेली मजेदार गोष्टः डॉ. आनंदी जोशींचा नवरा म्हणजे गोपाळ राव जोशी हा नाटकात दाखवल्याप्रमाणेच तर्कट असामी होता. त्याला पाद्र्यांना धडा शिकवायचा होता म्हणून आपणहून धर्मांतर करायला गेला. चर्चनेपण खूष होवून तसे केले. पाद्र्याबदोबर बाहेर आला आणि जे काही कॅथेलीकखूण (जानव्यासारखी) दिली होती ती भिरकावून म्हणाला की असले सोपस्कार करून माझ्या मनातला धर्म बदलता येइल का? आणि मग कसे फसवले या भावमुद्रेने निघून गेला!
शिवाजीने पण गोव्यातील अत्याचार पाहून ३ पाद्र्यांना पळवून आणून सक्तिने बाटवल्याचे ऐकले आहे. परीणामी नंतर पोर्तुगिजांनी जरा (काळ) नमते घेतले...
एक शंका / अधिक थोडेसे...
(क्षमस्व. हा प्रतिसाद प्रियालीताईंना उद्देशून नाही. केवळ त्यांचा एक मुद्दा उचलून धरून त्याचा थोडा विस्तार अधिक स्वतःची थोडी भर या कारणास्तव त्यांच्या प्रतिसादास जोडला आहे.)
पूर्वेकडील सातही राज्यांबद्दल ठामपणे बोलू इच्छीत नाही, पण निदान मिझोराम, अरुणाचल प्रदेश (पूर्वाश्रमीचे नॉर्थ ईस्ट फ्रंटियर एजन्सी अर्थात नेफा) आणि कदाचित नागालँड या राज्यांपुरते बोलायचे झाले, तर केवळ ब्रिटिशांनी आपल्या सोयीसाठी (नक्की माहिती नाही, पण बहुधा संरक्षणाच्या सोयीसाठी, बफ़र झोन म्हणून) हे प्रदेश ब्रिटिश इंडियाला जोडले आणि नंतर वारसाहक्काने ते भारताकडे आले, याव्यतिरिक्त ही राज्ये कधी खर्या अर्थाने भारताचा भाग होती काय*? या राज्यांतील लोकांशी आपले सांस्कृतिक, राष्ट्रीय अथवा भावनिक (किंवा मुळात धार्मिकसुद्धा! याविषयी नंतर.) बंध आहेत काय? किंवा तसे बंध निर्माण व्हावेत, हे लोक राष्ट्रीय मुख्यप्रवाहात यावेत यासाठी आपण कितीसे प्रयत्न केलेत? ख्रिस्ती मिशनर्यांचे सोडा, पण एरवीसुद्धा या लोकांना आपण पूर्वी ब्रिटिशांची वसाहत होतो, आता भारताची वसाहत आहोत, असे जर वाटलेच, तर त्यात त्यांचा दोष मानता येईल काय? आणि आपण कोणाची तरी वसाहत आहोत ही भावना आणि स्वतंत्र / वेगळे व्हायची इच्छा यांच्यात किती अंतर आहे?
*अरुणाचल प्रदेशच्या बाबतीत तर चीनचा हा पारंपारिकतः आपलाच भाग आहे आंणि हक्काने तो चीनकडेच असायला हवा असा दावा आहे. इतका की अरुणाचल प्रदेशमधील लोकांना चीनकडून व्हिसा नाकारला जातो. "चिनी नागरिकांना आपल्याच देशांतर्गत प्रवासासाठी व्हिसाची गरज नाही" असे कारण देऊन. खरे कारण बहुधा एखाद्या अरुणाचल प्रदेशच्या रहिवाश्याच्या भारतीय पासपोर्टवर व्हिसाचा शिक्का मारला तर ती व्यक्ती भारतीय नागरिक आहे असे मान्य केल्यासारखे आणि पर्यायाने अरुणाचली हे भारतीय नागरिक आहेत हे मान्य केल्यासारखे होते, आणि ते आपल्याच (अरुणाचल हा चीनचा भाग आहे या) दाव्यास खंडनात्मक ठरते हे असावे.
ख्रिस्ती मिशनर्यांनी या लोकांना बाटवून आणि बाटवता बाटवता "तुम्ही वेगळे आहात, वेगळे व्हा" अशी फूस लावणे सोडून द्या. तो त्यांचा (ख्रिस्ती मिशनर्यांचा) पोटापाण्याचा धंदाच आहे. चीनकडूनही यांपैकी काहींना निदान एकेकाळी तरी मिळणार्या मदतीचे आणि पाठिंब्याचे सोडून द्या. चीन आपले हितसंबंध राखण्यासाठी काय वाटेल ते करते आणि करत राहणार. पण आपण भारतीयांनी आपल्याच हितसंबंधांच्या दृष्टीने या राज्यांच्या लोकांच्या मनात भारतीयत्वाची भावना रुजवण्याचा, त्यांना आपल्यात आणण्याचा, त्यांना आपलेसे करण्याचा काही तरी प्रयत्न केला आहे का? किंबहुना मुळात आपल्यालाच या राज्यांतले लोक (या राज्यांचे भूभाग नव्हेत!) आपले वाटतात का? (उदा. एखाद्या मराठी माणसाला एखाद्या बंगाली, राजस्थानी किंवा कन्नडिग माणसाबद्दल जी देशबंधुत्वाची, सहभारतीयत्वाची भावना वाटते, तीच एखाद्या मिझोरामीबद्दल वाटते का? या राज्यांत काय आहे, काय चालते याबद्दल आपल्याला कितीशी कल्पना अथवा जाणून घेण्याची इच्छा असते?) मग ख्रिस्ती मिशनर्यांना तरी का दोष द्यायचा?
आणि भारताला स्वातंत्र्य मिळून साठ वर्षे होऊन गेली. इतकी वर्षे या लोकांमध्ये आपलेपणाची भावना रुजवायला पुष्कळ होती. इतकी वर्षे त्याबदल काही केले नाही, आणि आता हे लोक वेगळे होण्याची मागणी करतील अशी भीती वाटली तेव्हा, खूप उशिरा, खडबडून जाग आली. उपयोग काय? यात कर्मदरिद्रीपणा कोणाचा?
आणि ही जळजळ तरी नेमकी कशाबद्दल आहे? हे लोक वेगळे होण्याची मागणी करतील म्हणून, की ख्रिस्ती झाले म्हणून, की पर्यायाने हिंदू राहिले नाहीत म्हणून? यापैकी तिसरे कारण असले, तर (केवळ नागालँड, मिझोराम आणि कदाचित अरुणाचल प्रदेश याच राज्यांबद्दल बोलायचे झाले तर) यांतील बहुसंख्य मंडळी ही मुळात हिंदू (किंवा मेनस्ट्रीम हिंदू) नेमकी कधी होती (किंवा होती का)? यांच्या ज्या पारंपारिक चालीरीती, धर्मविश्वास, प्रथा वगैरे ज्या होत्या, त्यांना 'हिंदुधर्म' मानता येईल का? (माझ्या कल्पनेप्रमाणे त्या फक्त traditional tribal faiths या प्रकारात मोडाव्यात, हिंदुधर्मात नव्हेत.) मग जे मुळात हिंदू नव्हतेच, ते हिंदू न राहण्याचा प्रश्न कुठे येतो?
('सर्व एतद्देशीय आदिवासी प्रथा या हिंदुधर्मातच मोडतात' या दाव्याला माझ्या मते काही अर्थ नाही. हे म्हणजे आकडे वाढवण्यापुरते एखाद्याला आपल्यात घ्यायचे आणि एरवी वेगळे लेखायचे अशातला प्रकार आहे. शिवाय आपणा मेनस्ट्रीम हिंदूंच्या लेखी हे लोक हिंदू आहेत का यापेक्षा त्या लोकांना आपण 'हिंदू' [म्हणजे जे काही असेल ते] आहोत असे वाटते का, हे महत्त्वाचे.)
मसुराश्रम
आमच्या घरी लहानपणी येणार्या "सज्जनगड" मासिकात दर महिन्याला "मसुराश्रमातील शुद्धिकरण आणि विवाह समारंभ" अशा काही नावाचे सदर येत असे.
त्यात दर महिन्यात कोणातरी (साधारणपणे नावानुसार मुसलमान वाटणार्या) व्यक्तींचे शुद्धीकरण, हिंदू पद्धतीने विवाह झाल्याच्या बातम्या छायाचित्रासकट येत.
मी छापील फोटोसकट नोंद बघितली आहे, दर महिन्याला.
याला फूस म्हणा की प्रेम म्हणा, उलट्या दिशेने लग्ने आणि धर्मांतरणे झाल्याची मी छापील, फोटोसकट नोंद दर महिन्याला बघितली आहे.
याचा काय ऐतिहासिक मागोवा? गोवा केंद्रशासित प्रदेशाचे राज्य झाला त्यावेळी मी गोव्यात येऊन जाऊन स्थायिक होतो. राज्य होण्यासाठी ख्रिश्चन लोकांनीच मागणी केली नाही, आणि ख्रिश्चन धर्म हा वेगळे राहाण्याचे कारण नव्हता. कोकणी भाषा होती. राज्यभाषा म्हणून मध्य गोव्यातली हिंदूंची बोली देवनागरी लिपीत वापरली जाते. (ख्रिश्चनांची रोमन लिपीत लिहिलेली बोली नव्हे.) त्यानंतरची तीन नवी राज्ये छत्तिसगड उत्तराखंड आणि झारखंड. यांचा ख्रिस्ती धर्माशी संबंध काय? उत्तराखंडात हिंदूंची टक्केवारी बहुतेक राज्यांपेक्षा अधिक आहे. मग हे वाक्य तुम्ही कुठल्या जोरावर लिहिले?
तूर्तास लेख माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण वाटत नाही. लेखात दिलेले बाकीचे तपशील पडताळून बघायचे कष्ट मी का घ्यावे, हा प्रश्न माझ्या मनात येतो. इतके भरमसाठ तपशील लेखात बिनासंदर्भ दिलेले आहेत. ते अभ्यास करून पडताळण्यास वाक्यागणिक ५-१० मिनिटे तरी लागतील. म्हणजे पूर्ण दिवस खलास, कदाचित पूर्ण आठवडा. त्यामुळे माझ्याकडून इत्यलम् .
तुमच्या मुद्द्यांचा गंभीरपणे विचार का व्हावा हे कळत नाही. योग्य आकडेवारी जमवून, सत्यासत्याची पडताळणी करून, हीच माहिती दिली असती तर अधिक लक्ष देऊन वाचण्यास मला चालना मिळाली असती.
मसुराश्रम वगैरे
मसुराश्रमाबद्दल मी पण असेच (कदाचीत सज्जनगड मासीकच असावे) वाचल्याचे आठवते. पण त्यांनी अत्याचार करून धर्मांतरे केल्याचे ऐकलेले तरी नाही. त्यांची चळवळ ज्यांना बाटवले गेले आहे त्यांना स्वग्रूही आणण्याची होती असे आठवते.
पुरेसे अनुयायी मिळल्यावर त्या भागासाठी स्वतंत्र राजाच्या दर्जाची मागणी करणे.
यात त्यांना स्वतंत्र राज्य म्हणजे स्वतंत्र देश म्हणावयाचे असेल. कारण नॉर्थईस्टचा तो प्रश्न आहे असे म्हणले जाते. यावर अजून लिहू शकेन पण गरज पडल्यास नंतर...
इस्ट तिमोर
इस्ट तिमोर चे ढळढळीत उदाहरण
डोळ्यासमोर नाही येत का तुमच्या?
इस्ट् तिमोर चे बहुसंख्य लोक ख्रिश्चन नाहीत का?
आपला
गुंडोपंत
ख्रिस्ती, मुसलमान वगैरे...
ख्रिस्ती ईस्टतिमोरी मुसलमान इंडोनेशियापासून अलग झाले, ही बाब लक्षात घ्या. आणि आता तुमच्या नॅचरल सिंपथीज़ कुठल्या बाजूने वळतात ते सांगा. ;-)
मुसलमान इंडोनेशियापासून ???
मुसलमान इंडोनेशियापासून ???
इंडोनेशिया हा 'मुस्लीम बहुल देश' आहे मुस्लीम नाही; जसे पकिस्तान हे 'इस्लामीक' रिपब्लीक आहे तसे इंडोनेशिया नाही.
ही बाब येथे महत्वाची आहे.
मात्र येथे मुस्लीम हा देश धर्म निरपेक्ष न राहता मुस्लीम व्हावा याठी मोठे दडपण आणत आहेत यात वाद नाही.
आपला
गुंडोपंत
त्याने काय फरक पडतो?
इंडोनेशिया हे इस्लामी राष्ट्र नसून मुस्लिमबहुल राष्ट्र आहे, हे मान्य. पण तोच तर मुद्दा आहे.
ईस्ट तिमोरचे बहुसंख्य लोक जसे ख्रिश्चन, तसे इंडोनेशियाचे बहुसंख्य लोक मुसलमान. ख्रिस्तीबहुल ईस्टतिमोर हे मुस्लिमबहुल इंडोनेशियापासून वेगळे झाले, इतकेच.
आणि मुळात या वेगळे होण्याचे कारण धर्म हे नव्हतेच. ईस्ट तिमोर ही पूर्वी एक पोर्तुगीज़ वसाहत होती. १९७४ साली पोर्तुगालमधील सत्तांतरानंतर पोर्तुगालने स्वातंत्र्याची बोलणी सुरू केली, मात्र पुढे काही कारणांमुळे ही बोलणी पूर्ण न करताच पोर्तुगीज़ ही वसाहत सोडून (अबँडन करून) निघून गेले, आणि ईस्ट तिमोरने आपले स्वातंत्र्य एकतर्फी जाहीर केले. परंतु या एकतर्फी स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्यास आंतरराष्ट्रीय मान्यता मिळण्याच्या आधीच इंडोनेशियाने हा प्रदेश गिळंकृत केला. त्यानंतर इंडोनेशियाने या प्रदेशावर दडपशाही पद्धतीने राज्य केले आणि स्थनिक लोकांवर अनन्वित अत्याचार झाले आणि अनेक जण मृत्युमुखी पडले.
मुळात ईस्ट तिमोर हा इंडोनेशियाचा भाग कधीच नव्हता; इंडोनेशियाने तो बळकावून त्याला इंडोनेशियाचा एक प्रांत म्हणून स्वघोषित केले होते. अशा परिस्थितीत ईस्ट तिमोरचे वेगळे होणे हा विभक्तीकरणाचा लढा नसून स्वातंत्र्ययुद्ध होते. आणि मुख्य म्हणजे त्याचा धर्माशी काहीही संबंध नव्हता.
(सर्व माहिती विकिपीडियावरून.)
+१
माहितीपूर्ण (चांगल्या अर्थाने*) प्रतिसाद आवडला!
-----------------------------------------------------------
*हल्ली माहितीपूर्ण म्हंटले की लोक चांगल्या अर्थाने घेतातच असे नाही! ;)
धडधडीत उदाहरणे
ईस्ट तिमोर हे एक उदाहरण आहे खरे. पण ते लेखाच्या या मुद्द्याला विशेष सामर्थ देत नाही.
जरा भारतकेंद्रित आशियाई दृष्टीने यादी (ब्रिटिश काळ आणि नंतर) अशी दिसते :
१. ब्रह्मदेश (बहुतेक बौद्ध) हिंदूबहुल ब्रिटिश इंडियापासून वेगळा झाला. मुद्दा शासकीय सोय.
२. पाकिस्तान (मुसलमान बहुल) हिंदूबहुल भारतापासून वेगळा झाला
३. बांगलादेश (मुसलमान बहुल) मुसलमानबहुल पाकिस्तानपासून वेगळा झाला. मुद्दा बंगाली अस्मिता.
४. तमिळनाडु (हिंदूबहुल) हिंदूबहुल भारताबाहेर जायची थोडीफार चळवळ. मुद्दा द्रविड अस्मिता.
५. खलिस्तान (शिखबहुल) हिंदूबहुल भारताबाहेर जायची तीव्र चळवळ
६. कश्मीर
७. ईलम (हिंदूबहुल) बौद्धबहुल श्रीलंकेबाहेर जायची तीव्र चळवळ. मुद्दा तमिळ अस्मिता
भारताच्या ईशान्येकडे :
८. असम (हिंदूबहुल, उल्फा) मध्यम-तीव्र चळवळ. मुद्दा : अहोमिया अस्मिता, बंगाली विरोध
९. नागालँड (ख्रिस्ती) मध्यमपेक्षा-तीव्र चळवळ
१०. मणिपूर (पी एल ए, हिंदू) मध्यम-तीव्र चळवळ
११. त्रिपुरा (बहुतेक ख्रिस्ती) आदिवासी चळवळ, मुख्य मुद्दा बंगाली-विरोध
१२ बोडो (हिंदूबहुल) मध्यम-तीव्र चळवळ
१३. मिझोराम (ख्रिस्ती) मध्यम-तीव्र चळवळ, भारतात सामिल होण्याची कायमस्वरूपी शांती प्रस्थापित
आता वरील यादीतील विदागार उपलब्ध असताना, ईस्ट तिमोरचे उदाहरण या लेखाच्या संदर्भात "धडधडीत" किंवा समर्पक का व्हावे, हे मला कळत नाही. शिवाय ईस्ट तिमोर हे कॅथोलिक आहे, आणि भारतातील ईशान्येकडील ख्रिस्ती प्रोटेस्टंटातले वेगवेगळे पंथ आहेत, त्या पंथांच्या आंतरराष्ट्रीय ढवळाढवळीबाबत कार्यवाह्या वेगळ्या आहेत, याचा साधारण अभ्यास तरी अशा लेखात अपेक्षित असावा.
पुन्हा सांगणे आले, की हा विषय असा आहे, की काही प्रवक्ते अप्रमाण वक्तव्ये करू शकतात, आणि बाकीच्यांना सुसूत्र बोलावे लागते. अशा संवादात सत्य आणि सारासार विचार होण्याची क्षमता कलुषित होते. कळकळ असलेल्या उपक्रमींनी लिहिलेल्या मतास एक उत्तर द्यावेसे वाटले, पण नाहीतर मी उपक्रमासाठी दुसरा एखादा लेख लिहिण्यात वेळ खर्चावा, हेच उत्तम.
आणखी थोडे...
(क्षमस्व, हा प्रतिसाद धनंजयांना उद्देशून नाही. केवळ त्यांच्या प्रतिसादातील एक मुद्दा उचलून धरून त्याचा थोडा विस्तार अधिक स्वतःची थोडी भर घातली, म्हणून त्यांच्या प्रतिसादाखाली मांडला आहे.)
तसेच म्हटले तर १९३२मध्ये एडन (त्या काळी ब्रिटिश वर्चस्वाखाली परंतु बहुधा मुस्लिमबहुल) आणि १९३६मध्ये सिंध (नक्की बाहुल्य कोणाचे याची खात्री नाही, परंतु बहुधा शहरी भागांत हिंदुबहुल आणि ग्रामीण भागांत मुस्लिमबहुल पण एकंदरीत बहुधा मुस्लिमबहुल असे वाटते) हे प्रांत मुंबई इलाख्यापासून (पुन्हा शासकीय सोयीसाठी) वेगळे करण्यात आलेच की!
पण ते एक वेळ सोडा - कोणाचीही मागणी नसताना एका विदेशी व्यापक सत्तेने ('फॉरीन ऑक्युपाइंग पॉवर'च्या भाषांतराचा दुबळा प्रयत्न!) आपल्या सोयीसाठी केलेले विभाजन म्हणून ते इर्रेलेव्हंट (मराठी?) मानता येईल.
पण मला एक सांगा, ते विदर्भवाले नाही का अधूनमधून महाराष्ट्रापासून वेगळ्या 'स्वतंत्र विदर्भा'चे आवाज उठवत असतात, ते नेमके मुसलमान की ख्रिश्चन?
फार कशाला, आपल्याच मराठी लोकांनी नाही का 'बिगर बायलिंग्वल'चे विभाजन करून (इतकेच नव्हे, पण तत्कालीन इतर प्रांतांतल्या सीमासंलग्न मराठी 'पॉकेट्स'चे त्यात्या प्रांतांपासून विभाजन करून*) संलग्न मराठीभाषिक प्रदेशांचा 'संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे' म्हणून आंदोलन केले, आणि मोरारजीभाईंच्या गोळ्या खाल्ल्या? एक रेवरंड टिळकांचा (आणि तत्सम लोकांचा) सन्माननीय ('रेव्हरंड'!) अपवाद सोडल्यास बहुसंख्य मराठीभाषिक जनता ही ख्रिस्ती असल्याचे निदान मी महाराष्ट्रात राहत असताना तरी ऐकले नव्हते - अर्थात त्यानंतर परिस्थिती बदलली असल्यास कल्पना नाही - हल्लीच्या घडामोडींबद्दलचे माझे ज्ञान फारच त्रोटक आहे. मुद्दा हा, की संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या वेळी तरी बहुसंख्य मराठीभाषिक जनता ही ख्रिस्ती नव्हती. तरीही त्यांनी स्वतःचे वेगळे राज्य मागितलेच. (फॉर द रेकॉर्ड, रेव्हरंड टिळकांनी संयुक्त महाराष्ट्राची मागणी केल्याचेही ऐकिवात नाही.)
*म्हणजे स्वतः फुटायचे ते फुटायचे, वर इतरांनाही फोडायचे! मग पाकिस्तान कश्मीरमध्ये फुटीरतावाद्यांना (विशेषतः कश्मीर भारतापासून अलग करून पाकिस्तानमध्ये विलीन करू इच्छिणार्या फुटीरतवाद्यांना - 'कश्मीर बनेगा पाकिस्तान' फॅक्शन, 'आजा़द कश्मीर' फॅक्शन नव्हे!) प्रोत्साहन देते, त्यापेक्षा यात वेगळे काय नेमके काय? अर्थात १९८०च्या दशकापासून पाकिस्तानच्या कश्मीरमधील कारवायांना दहशतवादाचे वळण लागले, ज्याचे कधीच समर्थन होऊ शकत नाही, आणि त्याचे समर्थन करण्याचा हा प्रयत्नही नाही, पण १९८०पूर्वीचे काय? विदर्भ, मराठवाडा हे अनुक्रमे मध्यप्रांत आणि हैदराबादेपासून विभक्त करून महाराष्ट्रात विलीन करणे आणि पाकिस्तानने कश्मीर भारतापासून विभक्त करून पाकिस्तानमध्ये विलीन करू पाहणे यात नेमका फरक तो काय? अर्थात पुढे त्याला लागलेले दहशतवादाचे वळण सोडल्यास. पण हे सर्व अवांतर.
थोडक्यात, एखाद्या प्रदेशापासून फुटण्याचा / वेगळे राज्य किंवा राष्ट्र मागण्याचा धर्माशीच संबंध असतो, असे नाही. आणि (राष्ट्रीय) अस्मिता हे केवळ हिंदूंचे (विशेषतः मराठीभाषिक हिंदूंचे) राखीव कुरण असण्याचे काही कारण निदान मला तरी दिसत नाही.
बरोबर आहे
मसुराश्रमाबद्दल मी पण असेच (कदाचीत सज्जनगड मासीकच असावे) वाचल्याचे आठवते. पण त्यांनी अत्याचार करून धर्मांतरे केल्याचे ऐकलेले तरी नाही. त्यांची चळवळ ज्यांना बाटवले गेले आहे त्यांना स्वग्रूही आणण्याची होती असे आठवते.
अगदी बरोबर आहे
काहीही
तूर्तास लेख माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण वाटत नाही. लेखात दिलेले बाकीचे तपशील पडताळून बघायचे कष्ट मी का घ्यावे, हा प्रश्न माझ्या मनात येतो. इतके भरमसाठ तपशील लेखात बिनासंदर्भ दिलेले आहेत. ते अभ्यास करून पडताळण्यास वाक्यागणिक ५-१० मिनिटे तरी लागतील. म्हणजे पूर्ण दिवस खलास, कदाचित पूर्ण आठवडा. त्यामुळे माझ्याकडून इत्यलम् .
तुमच्या मुद्द्यांचा गंभीरपणे विचार का व्हावा हे कळत नाही. योग्य आकडेवारी जमवून, सत्यासत्याची पडताळणी करून, हीच माहिती दिली असती तर अधिक लक्ष देऊन वाचण्यास मला चालना मिळाली असती.
१००% सहमत.
तरीही न रहावुन अजुन थोडेसे तुमच्या लेखाला मदत आचार्य महोदय. एक राहीलेला किंवा मुद्दाम वगळलेला मुद्दा
हिंदुंकडून हिंदुंना अन्याय्य वागणूक, जुलूम, छळ म्हणून पिडीत हिंदुंचे धर्मांतर -
केवळ दलीत म्हणून दुष्काळात देखील सार्वजनीक विहीरी वरून पाणी प्यायला बंदी, देवळात प्रवेश करायला बंदी, जातीवरून विशीष्ट कामे करवणे, सवर्णातील मुलीशी/मुलाशी विवाह केल्याबद्दल खालच्या जातीतील लोकांना जाळणे, त्यांची वस्ती उधळवुन टाकणे. त्यांचे खच्चीकरण करणे. आजही भारताल्या बर्याच ठीकाणी हे चालू आहे.
अश्या हिंदु धर्मातील लोकांनी पाळलेल्या जाचक रुढी, परंपरा या कारणामुळे हिंदु धर्म सोडलेल्या लोकांची माहीती, टक्केवारी कुठे मिळु शकेल का हो? का तुमचे म्हणणे आहे की जबरदस्ती धर्मांतर केवळ अन्यधर्मीय करवुन आणतात? आपण होऊन वैतागुन हिंदु धर्म आजतगायत कोणीच सोडला नाही?
हे सगळे शतकानुशतके चालत असुन अजुनही हिंदु चांगलेच बहुसंख्य (दुवा १ , दुवा २)आहेत की नाही? का १००% झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही? का हा प्रतिसाद लिहुन होइस्तवर आत्ताच तुमच्या हातात आलेल्या ताज्या बातमीत भारतात हिंदु अल्पसंख्य झाले आहेत? झाले तर बरे होईल म्हणा जरा सवलती मागता येतील ;-)
आणखी एक...
आणखी एक: हे सर्व तथाकथित हिंदुत्ववादी करत असलेले (आणि भरपूर प्रसिद्धी मिळणारे) मूर्ख उपद्व्याप पाहून यांना आपले धर्मबांधव मानण्याची लाज वाटल्यामुळे केलेले धर्मांतर. (इफ़ यू कान्ट बीट देम, क्विट देम!)
याची अजून उदाहरणे ऐकलेली नाहीत, पण हे असेच चालू राहिले, तर तो दिवस दूर नाही.
(यात एक लक्षात घेण्यासारखा मुद्दा म्हणजे ही लाज हिंदुधर्माची नाही, तर आपल्या मूर्ख चाळ्यांनी हिंदुधर्माची विटंबना आणि बदनामी करणार्या या स्वतःला हिंदू म्हणवणार्यांची. यांच्या या मूर्ख चाळ्यांमुळेच जर 'गर्व से कहो हम हिंदू हैं' असेल, तर अशांशी आपली ओळख निगडित करण्यात गर्व करण्यासारखे काहीही वाटत नाही, वाटलेच तर लाज वाटण्यासारखे वाटते. अर्थात हिंदुधर्मात मुळात वाईट असे काही नसावे, आणि बहुसंख्य हिंदू असे नसावेत अशी आशा आहे, पण अशा मूठभरांनी धर्म 'हायजॅक' करून स्वतःशी आयडेंटिफाय करवून घेतल्यामुळे हे इतर बहुसंख्य 'गिल्ट बाय असोसिएशन'ने नाहक बदनाम होतात. [इतर धर्मांच्या बाबतीतही हेच होत असावे असे वाटते.] त्यामुळे ही 'लाज' म्हणजे काहीसे "मी स्वतःला हिंदू समजतो, पण हे लोक जर स्वतःला हिंदू समजणार असतील आणि 'हिंदू' ही ओळख यांच्याशी निगडित होणार असेल, तर मला दुसर्यांदा विचार करावा लागेल" अशासारखे.
सर्व - किंवा बहुतांश - जर्मन हे जरी नाझी नसले, तरी नाझींच्या कारवायांमुळे जर्मन राष्ट्र इतके बदनाम झाले, की युद्धोत्तर एकदोन पिढ्यांचा स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला, एक प्रकारची आपल्या इतिहासाबद्दलच्या शरमेची छाया त्यात येऊ लागली, एक प्रकारचे 'कलेक्टिव गिल्ट' त्यात येऊ लागले, असे कोठेतरी पूर्वी वाचल्याचे अंधुकसे स्मरते. [खरेखोटे जाणकारांनाच माहीत.] त्यातलाच काहीसा प्रकार.
अर्थात या कारणाकरिता धर्मांतरामध्ये एक छोटीशी अडचण आहे - इतर धर्मांची स्थितीही याहून फारशी वेगळी नाही, किंवा असलीच तर अधिक वाईट असावी. [म्हणजे कुठलाही धर्म वाईट नसावा, पण त्या धर्माच्या नावाने आपली ओळख सांगणार्यांपैकी काही गट तो धर्म हायजॅक करतात, आणि ते एक तर वाईट तरी असतात किंवा मूर्ख तरी असतात. आणि त्या धर्माची लोकमानसातील ओळख अशा गटांशी निगडीत होते.] त्यामुळे एका गटाशी ओळख निगडीत झाल्याने बदनाम झाले काय, किंवा त्याऐवजी दुसर्या धर्मात जाऊन दुसर्या एखाद्या गटाशी ओळख निगडीत झाल्याने बदनाम झाले काय, सारखेच. त्यापेक्षा स्वतःला 'निधर्मी' म्हणवून आपल्याला जे योग्य वाटेल त्यावर विश्वास ['फेथ' अशा अर्थी; यात थोडी धार्मिक छटा आली.] ठेवावा, हे बरे.)
प्रतिसाद आवडला
वरची प्रतिक्रीया खूप चांगली आणि १००% पटण्यासारखी आहे.
त्यामुळे ही 'लाज' म्हणजे काहीसे "मी स्वतःला हिंदू समजतो, पण हे लोक जर स्वतःला हिंदू समजणार असतील आणि 'हिंदू' ही ओळख यांच्याशी निगडित होणार असेल, तर मला दुसर्यांदा विचार करावा लागेल" अशासारखे.
या वाक्यावरून जो या प्रतिक्रीयेचा गाभा वाटला, अजून एक सांगावेसे वाटते (वादाचा मुद्दा म्हणून नाही) की आपण मग भारतीय म्हणवून घेण्याची लाज वाटून घ्यावी का? जे काही वास्तव आहे पण जे भडक करून पाश्चात्य दूरचित्रवाणींवर दाखवले जाते, अथवा माध्यमात छापले जाते, कधी कधी एखाद्या भारतीयाने परदेशात केलेला गुन्हा, या सर्व बाबी आपल्याला लाज आणतात. पण जो पर्यंत आपण दुसर्यादेशाचे नागरीकत्व घेत नाही तो पर्यंत भारतीयच असतो आणि नंतरही भारतीय वंशाचे म्हणूनच ओळखले जातो अगदी आपली मुलेबाळे पण (अपवाद - अर्थातच आर्तंवंशीय विवाह) .
तीच गोष्ट हिंदू धर्माबाबत अथवा जो कुठला आपला धर्म असेल त्याबद्दल असावी. विचार करा, (तुर्त भारताच्या संदर्भातच जरी तीच गोष्ट इतरत्र असली तरी) बर्याचदा धर्माधारीत सर्वात जास्त नावे ठेवली कुणाला जातात? - मुसलमानांना? आता सगळे मुसलमान वाईट असतात का? अगदी त्यांचा द्वेष करणारे त्यांचे शत्रू देखील तसे म्हणणार नाहीत. मग असे काय घडते? तर जेंव्हा कुठल्याही धर्मातील मवाळ लोकं आणि बुद्धीवादी हे त्यांच्या धर्मात राहूनच त्याच्यातील वाईट गोष्टींबद्दल, कृत्यांबद्दल आवाज उठवत नाहीत तेंव्हा आधी ते सर्वमत मानले जाते आणि नंतर संपूर्ण नियंत्रणच अतिरेकी शक्तींच्या हातात जाऊ शकते.
म्हणून जे आपण आहोत ते म्हणून आवाज उठवणे आणि वेळीच विचारस्वातंत्र्यास जागृत करणे हे महत्वाचे असते. ते जेंव्हा होत नाही तेंव्हा तालीबानी अथव बूश तयार होतात - दोन्ही त्यांच्या जनतेस चांगले ठरत नाहीत (अर्थात बूश जिथे आहे तिथे लोकशाही असल्याने त्यामानाने त्याला कमी नियंत्रण ठेवायला मिळतयं तरीही!)
म्हणून स्वत:स हिंदू आणि हिंदूत्ववादी सातत्याने म्हणून त्यावरील अन्याय सांगणे जरूरीचे वाटते आणि त्यातील चांगल्या आणि वाईट ही गोष्टींवर बोलणे / टिका करणे ही महत्वाचे वाटते. त्यात जसा गर्व ठेवण्याची काही गरज नाही तशीच लाज वाटायचे पण कारण नाही .
धर्मभास्कर
असाच मजकूर धर्मभास्कर नावाच्या मासिकात पूर्वी येत असे.
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
(http://marathisahitya.blogspot.com)
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
कोणती जात?
मसुराश्रमात शुद्धीकरण म्हणजे धर्मांतरणच ना? म्हणजे ज्यांना बाटवले गेले त्यांचे शुद्धीकरण हेच असावे. मग शुद्धीकरणानंतर त्यांना कोणती जात लावण्यात येत असावी?
हे बाकी भयंकर आवडलं.
मला वाटते की हा
विषय चांगला आहे.
यात खुप काही बोलण्यासारखे आहे. करण्यासारखेही आहे.
शेवटी ज्यु हे जगातल्या सगळ्या मोठ्या युद्धांना जबाबदार आहेत असे म्हणून मी आता थांबतो.
पण मला वाटते की हा विषय इथे आता खुपच चघळला गेला आहे.
शिवाय माझ्या इंपल्सीव्ह प्रतिसादांमुळे आत्महत्याही घडल्या त्यामुळे मी यात सामील होत नाही आता...
आपला
गुंडोपंत
गोव्यातील धर्मांतर
गोव्यात विहिरित पावाची लादी टाकून, तेथील वस्ती धर्मांतरीत झाली अशी आवई उठवून पुढील वस्तीत मार्गक्रमणा होत राहिली. पावानेही हिंदू बाटत असे. एकदा दुसर्या धर्मात जबरदस्तीने / नाईलाजाने/ आमिषापोटी गेला तर परतीचे दरवाजे बंद.म्हणजे बलात्कारित स्त्री च्या वाट्याला आलेल्या जीवनासारखे;त्यात तिची चुक काहीही नसू देत. शिवाजी महाराजांनी मात्र जबरदस्तीने धर्मांतरीत झालेल्यांना परत येण्यासाठी धर्मसत्तेवर दबाव आणला होता. (बजाजी निंबाळकर चे उदाहरण वाचल्याचे आठवते पण अशी उदाहरणे फार कमी)
नगर भागातील ख्रिस्ती धर्मांतर ही दलीत समाजातील आहेत. स्वधर्मीयांनी गावाकुसाबाहेर अपमानित जिण जगायला लावल्यावर त्यांनी हा मार्ग स्विकारला. आजारी लोकांची सेवा करुन मिशनर्यांनी मन जिंकली. त्याबदल्यात धर्मांतर सुसह्यच . आपल्याच लोकांनी हाकलल्यावर आणि परधर्मियांनी जवळ केल्यावर दुसरे काय होणार?
मिरजेच्या हॉस्पीटल मधे होणारी ख्रिस्ती धर्मांतरे ही सोयी साठी होतात. रुग्णालयाचा खर्च माफ होउन मोफत इलाज होतो, पोराला नोकरी लागते अजुन् काय हवय?
प्रकाश घाटपांडे
एक लहानशी घटना-दुरुस्ती हवी
घटनेने धर्माच्या बाबतींत जे स्वातंत्र्य दिले आहे त्यांत धर्माचा प्रसार करण्याचे (to propagate) स्वातंत्र्यही दिले आहे तेवढे काढून टाकावे. कारण प्रसारासाठी संबंधितांकडून ज्या मार्गांचा अवलंब केला जातो तो दखलपात्र गुन्हा आहे की नाही यावर वादंग माजवता येतो. मात्र आपणहून एखादा धर्म स्वीकारायचे स्वातंत्र्य कायम ठेवावे.
ताडती जीर्ण या लाटा..
सावधान् !
येऊ घातलेली त्सुनामी चीनी आहे !
हिंदु- मुस्लीम्- ख्रिस्चन्. ..सगळे एकाच् टापां खाली चिरड्ल्या जाणार् आहेत !
चिनि राष्ट्रीयता हा सुप्त् त्सुनामी जाग्रुत होत आहे.
चिन मधील सर्वात् प्राचीन् बौध्द् मठाला सदिच्चा भेट दिली तेंव्हा मी अर्पण केलेल्या उदबत्त्यांच्या पुड्याला हात देखील न लावता १५ वर्षांचा चिनि बौध्द् भिकशू मला म्हणतो >
"डु यू स्पीक् चायनीज् ? "
मी" नो.. धीस ईज माय फर्स्ट चायना व्ही.."
माझे वाक्य पुर्ण व्हायच्या आत >
"सौरी !!आय् कान्ट् आक्सेप्ट् युअर् गिफ्ट .. वी डोण्ट आक्सेप्ट गिफ्ट्स फ्रोम पिपल हू डोंट स्पिक चायनीज !! "
खड्ड्यात गेले तुमच्या सदिच्च्चा आणि प्रेम ! उडत गेला गौतमांचा देश व संदेश !
ताय्नानामेन चौकात आपल्याच हजारो तरूणांना कंठ स्नान घालून तो आमचा अंतर्ग्त प्रश्न आहे हे अमेरीके सह सर्व जगाला खडसाऊन सांगणारा देश ..
.. चीन मधील मानव अधिकारांबद्द्ल अमेरीकी नागरीकांनी आपसात देखील बोलण्याचा अधिकार नाही हे ठ्णकाऊन सांगण्याची ताकद असलेला देश !
अमेरीकेची मुजोरी क्षण भर देखील सहन न करणारा..
नेपाळ् ची हालत याच चपट्यांनी दुर्धर करून ठेवली आहे.
जगातील सर्व अर्थ व्यवस्थांना खिळखीळे करण्यारा चपट्या नाकाच्या सर्व धर्मभक्षक माओ वाद्यांच्या स्वागता साठी आपण तयार आहोत ! आपण चिनचे सर्वात मोठे व सर्वात सहज असे सावज आहोत.
खाटकांचे स्वागत गाईंनी नाही तर कुणी करायचे ?
सुर्य सुद्धा आता चिनि साम्राज्या वर कधीही न मावळण्याचे स्वप्न पहात आहे असा चीन चा
सतार्कीक विश्वास आहे .
पण आपले बरोबर आहे .. बाह्य आक्रमणा इतकेच जीर्ण अंतर्गत संक्रमण देखील धोक्याचे आहेच !
मग ? आता काय ?
चिंता करू नये .. सुस्त रहावे ! मस्त रहावे !!
काय आठवताय ?
तदान्मानं .. ????
वाट बघुया की.. येईलच तो .. माझ्या खाटेवरच मला जेवण देईलच तो!
व्यास मुनी ऒरडत आहेत : अरे माकडांनो .. तुम्ही मानव कधी बनाल ? तो येतो तो दुबळ्या माणसांसाठी.. पराक्रमी माणसां मधुन...पण... तुम्ही अजुनही हुप ..हुप.??. !!!
प्रतिशब्द
इर्रेलेव्हंट = असंबद्ध
हा केवळ टग्यारावांनी विचारलेल्या शब्दाला प्रतिशब्द समजावा.. एकुण चर्चा विषय अथवा चाललेल्या चर्चेला प्रतिसाद नव्हे :)
-(असंबद्ध)ऋषिकेश
गैरलागू
इर्रेलेव्हंट = गैरलागू, (असंबद्ध = इन्-कोहेरन्ट)
नीळकंठशास्त्री गोर्हे, पंडिता रमाबाई, ना. वा. टिळक
यांच्यासारख्या बुद्धिमान व विद्वान तसेच हिंदू धर्म नीट जाणणार्यांनी धर्म का बदलला असेल याचाही विचार करावा. हे तरी निरक्षर, अडाणी, भूलथापांना फसलेले किंवा पोटासाठी धर्मांतर केलेले नव्हते ना ?
अर्थात् धूर्त मिशनर्यांनी मोर्चे बांधून पूर्ण प्रयत्न केला हे मी अजिबात नाकारत नाही.
पण या सर्व धर्मज्ञांना हिंदू धर्मात कशाची तरी उणीव जाणवली आणि ते ख्रिश्चन् धर्मात मिळाले हे निश्चित.
- दिगम्भा
करार/अवांतर
मनोगतावरील एक सदस्य जी एस यांनी लिहीलेली सत्यघटनेवर आधारीत कथा 'करार' यासंदर्भात सहज आठवली.
करार
जर्मनीत असताना हे असे काही धर्मांतराचे त्रांगडे माहित नसताना एक फक्त जर्मन बोलणारी महिला लहान मुलीसह घरी आली होती. ही नक्की कोण आहे/काय विकायला आली आहे हे न कळूनही बावळटपणाने तिला आत घेतले. मग मोडक्यातोडक्या जर्मन भाषेत मी भारतीय आहे हे सांगितल्यावर तिने हिंदी भाषेतले 'येशू हाच तुमचा आधार' अशा काहीश्या अर्थाचे पुस्तक काढले आणि ते वाच असे सांगून गेली तेव्हा डोक्यात प्रकाश पडला. माझ्या सहकार्याच्या डोक्यात प्रकाश थोडा आधी पडल्यामुळे त्याने मला फक्त तुळू भाषा वाचता येते असे सांगून तिला तुळू भाषेतले पुस्तक शोधायला सांगून कटवले.
तुळू भाषा
तुमचा सहकारी अगदी हुशार म्हणायला हवा कारण तुळू भाषेला लिपीच नाही. ;-)
तुळू भाषा - विचारले पाहीजे
तुमचा सहकारी अगदी हुशार म्हणायला हवा कारण तुळू भाषेला लिपीच नाही. ;-)
ऐश्वर्याला विचारले पाहीजे :-)
तीला जेंव्हा तुला कुठल्या भाषा येतात असे डेव्हीड लेटरमनने विचारले तेंव्हा तीने मराठीच्या खालोखाल तुळू (तिची मायबोली) चे नाव घेतले होते ते आठवले. लेट नाईट शो मधे मराठीचे नाव ते ही ऐश्वर्याच्या तोंडून डेव्हीड लेटरमनची (तीने ) खेचताना ऐकून आनंद झाला होता.
प्रकाटाआ
...
ऐश्वर्या
ऐश्वर्याने त्या कार्यक्रमात इंग्लिशचे नाव घेतले नाही याचे आश्चर्य वाटून डेव्हिड लेटरमननेच नंतर तिची खेचली होती असे वाटते.
-- आजानुकर्ण
मुलाखत
मुलाखतीत 'हिंदी, तुळू (जी माझी मातृभाषा आहे), मराठी, व थोडिफार तामिळ' अशा उत्तरावर डेव्हिडने 'कमाल आहे, आम्ही इथे फक्त इंग्रजीच बोलतो' अशा अर्थाची टिप्पणी केली होती असे आठवते. यात त्याने तिची नव्हे तर त्याने नाव न ऐकलेल्या या भाषांची खिल्ली (या कुठल्या भाषा? या आल्या काय किंवा न आल्या काय.. अशा अर्थी) उडवली होती असे वाटले होते.
खिल्ली
सदर मुलाखतीत 'आम्ही 'हिंदी, तुळू (जी माझी मातृभाषा आहे), मराठी, व थोडिफार तामिळ' बोलतो असे वाक्य म्हटल्यावर डेव्हिडने आम्ही इथे इंग्लिश बोलतो हे ऐश्वर्याची खिल्ली उडवण्यासारखे होते कारण मुलाखत इंग्लिशमधून चालू होती. व ऐश्वर्याला येणार्या भाषांमध्ये तिने इंग्लिशचा उल्लेख केला नाही ह्या मुद्द्यावर हशा वसूल करण्यात आला होता असे वाटते. ;)
नवीनच ऐकलेल्या भाषांची खिल्ली उडवण्याचा तो प्रकार