हनुमानाचा शाप व त्यावर उतारा - ३
हनुमानाचा शाप व त्यावर उतारा - १
हनुमानाचा शाप व त्यावर उतारा - २
- लाचखोरी व वित्तिय घोटाळ्यां पासुन स्वतः दुर रहाणे व दुस-याला परावृत्त करणे. ज्याच्या कडे कौशल्य, कर्तब, शक्ती किंवा बुद्धी असते, आणि परिश्रम करण्याची तयारी असते, तो मनुष्य आपल्या कर्तबगारीवर पैसे मिळवतो. स्वतःचे इमान व स्वतःचा धर्म विकुन नव्हे. थोड्याशा पैशासाठी, आत्मा विकुन आपल्या स्वतःला व आपल्या घरच्या लोकांना सामोरं जाता येणार नाही. प्रत्येक लाचखोर माणसापाठीमागे नेहमी त्याचे हवरट कुटूंबं असते. लाचखोरी करुन तुम्हाला असे म्हणुन टाळता पण येत नाही की दुस-यानी मला लाच घ्यायला लावली - कारण लाच घ्यायची का नाही हे ठरवणारे शेवटी तुम्ही स्वतःच असता व हा निर्णय तुमचा स्वतःचाच असतो. जो लाच खातो व देतो तो आपल्या राष्ट्राचा शत्रू ठरतो, मग तो किती का इतरवेळेला राष्ट्रप्रेमाचा आव आणुदे. जो लाच घेतो व लाच देतो तो पापी व राष्ट्रद्रोही असतो.
- आपल्यातले कला, नैपुण्य सतत वाढवणे व छंद जोपासाणे. शरीराला व्यायामाची सवय ठेवणे. आपली मातृभाषा सुधारण्याचा ध्यास घ्या. भाषाकौषल्य वाढवा. ब-याचदा आपले भाषाकौषल्य जर अपुरे असेल तर गैरसमज उद्भवण्याचा संभव असतो. आपला जो अभ्यासक्रम असतो, त्याच बरोबर आपण वेगवेगळे आवडणारे असे व ज्यात आपल्याला गती व रस आहे अश्या कला जोपासाव्या व कौशल्य वाढवावे. आपला शालेय अभ्यासक्रम हा बुद्धीला चालना देणारा नसुन पुस्तकी जास्त आहे, कौशल्य वाढवणारा नाही. आपणही कौशल्य वाढवायच्या मागे नसतो. कसे तरी करुन पदवीधारक बनुन नोकरी लागली की झाले, अशी आपली स्वतःची भावना असते. कमरेवर हात ठेवुन
दुस-यांकडुन काम करवुन घेण्याचा फार शौक आपल्याला. उंटावरुन शेळ्या हाकायला फार आवडतात आपल्याला. पण आपल्याकडे कौशल्याची कमी असेल तर फार काळ आपला टिकाव लागत नाही. कोणी तरी जास्त कौशल्याचा आपल्या पुढे निघुन जातो.
कौशल्या बरोबर एखादा छंद जापासावा. छंद हे व्यसन नाही. काँप्युटर वर सारखे खेळ खेळणे हे व्यसन म्हणता येईल. नेट चॅटींग हे व्यसन म्हणता येईल. हल्ली आपले काँप्यटर मित्र फार व आसपासच्या ख-या लोकांशी आपल्याला बोलायला वेळ नाही अशी परिस्थिती झाली आहे. ह्याचे पर्यवसन लोकांना ‘डिप्रेशन’ व तत्सम व्याधीं मधुन पहायला मिळते. ह्याच कारणास्तव आपल्याला आपल्या येणा-या पिढीला छंद जोपासायला शिकवले पाहीजे. प्रत्येक लहान मुलाला एखादा चांगला छंद अंगिकारायला प्रोत्साहन द्यायला पाहीजे. मोठे झाल्यावर हल्लीच्या ‘न्युक्लीयर’ कुटंबांतुन छंद हाच प्रत्येकाचा खरा सोबती ठरणार आहे. चांगला छंद आपल्याला कठीण प्रसंगी कामास येईल. आपले मनोस्वास्थ्य जोपासण्यास त्याची अतोनात मदत होते. छंद जोपासण्यानी ब-याच अंशाने आपल्या डोक्यावरचा ताण कमी होण्यास नैसर्गीकरीत्या मदत होते. चांगले छंद आपला एकटेपणा दुर करतात व तो असा एक विरंगुळा आहे की जो जोपासल्याने आपली प्रसन्नता टिकवुन ठेवली जाते. शेवटी प्रत्येकानी आपला ‘जु’ आपणच उचलुन पुढे चालले पाहीजे. ह्या जगात तोच मनुष्य यशस्वी गणला जातो ज्याला प्रसन्नतेने व आनंदाने जगता आले आहे. गुरु रविंद्रनाथ टागोरांचे ‘एकला चालो रे’ हे गीत हाच उपदेश आपल्याला देते की स्वतःची वाटचाल अशीच आनंदाने चालु ठेवा, जरी कितीही अडचणी आल्या तरी, छंद आपला हा प्रवास सुकर करण्यास निश्चित मदत करेल.
आपल्या शरिराला व्यायामाची सवय ठेवा. दररोज किमान अर्धातास तरी शरीराला व्यायाम द्यावा. आपला हा व्यायाम आपण मुलांमध्ये मिसळूण त्यांना शिकवत असताना करु शकता. स्वतःच्या शरिराला व्यायाम देताना तुम्ही स्वतः तो कशा पद्धतीने करायचा ह्याचा आराखडा आपण तयार करु शकता. आपल्या ह्या अर्धा तासाची सुरवात प्राणायमाने करु शकता, त्यानंतर थोडे पळणे, घरातील कामे करणे – साफसफाई, केर काढणे तत्सम गोष्टी व्यायामाच्या आ-याखड्यात प्रवीष्ट करु शकता, महीलांना भारतीय नृत्य येत असेल तर त्या त्याची तालीम करु शकतात. जे ठरवू त्यात नियमितता आणली पाहीजे. चांगली सवय लावुन घेण्यासाठी सोपा उपाय म्हणजे तो उपक्रम सतत २१ दिवस करा, आपोआप त्याची सवय लागेल व मग आपले मनच चुकचुकेल व लागलीच व्यायाम करु. आपल्या शरीराला व्यायाम हा हवाच. कोणतीही सरकारी वा गैरसरकारी स्वास्थ्य योजना असली आणि नीट राबवत असली तरी आपले शरीरच जर कमकुवत असेल तर आपल्याला प्रसन्नता, तरतरीतपणा व शरीर सौष्ठवता कदापी लाभणार नाही.
- कामाच्या चागल्या सवयी लावुन घेणे. तसेच कोणच्या ही कामाची व काम करणा-यांची उपेक्षा टाळणे. चांगले काम कौशल्य, प्रतीभा व प्रसन्न मन ह्यावर आवलंबुन असते तोंडपुजेपणा, अपात्रतेला प्रोत्साहन व नाकर्तेपणा ह्यावर नाही. चोख काम हे वेळेत व बरोबर कले गेलेले ह्यावर जास्त अवलंबुन असते हलगर्जीपणावर नाही. तसेच ते चांगल्या प्रसासनावर अवलंबुन असते धाकदपटशाहीवर नव्हे. एक दुस-याच्या आदर भावनेवर अवलंबुन असते. कोणच्या ही राष्ट्राची समृद्धता पिढ्यां पिढ्यांच्या परीश्रमातुन निर्माण होते व त्यापेक्षाही जास्त पिढ्यां पिढ्यांच्या त्यागातुन टिकुन रहाते. ती काही कोणा एका महात्म्या मुळे बनत नाही व टिकत नाही. अशा महात्म्यांची माळ लागते व त्याही पेक्षा तुमच्या आमच्या सारखे सामान्यच लोकं ती टिकवुन ठेवू शकतात. कोणतेही काम हे कनिष्ठ नसते. हलकट असतात ती लोकांची मने. कोणतेही कर्तब व कौशल्य कमीपणा आणणारे नसते. प्रत्येकाला परस्परांबद्दल आदरभावना असली पाहीजे मग तो कामगार असो, अधिकारी असो वा मालक असो. अहम् भाव, उर्मट पणा परस्परांमधला आदरभाव संपुष्टात आणतात. अहम् भावावर जो मात करत नाही त्याला अहम् भाव मारतो. साधेपणा नेहमीच फायद्याचा ठरतो. आपल्या कामावर श्रद्धा ठेवावी. कामाची अस्मिता जोपासावी व दुस-यांचे काम कमीदर्ज्याचे लेखू नये.
- नितिमत्ता व चांगल्या आचारणांचा वापर सतत करणे. आपल्या धर्माने दिलेली व आपल्या सदसदविचार बुद्धिला साजेसी अशी नितिमत्ता व समाजात रहायचे म्हणुन अंगीकारलेले काही सामाजिक नियम आपण स्वतः ठरवायला हवेत व एकदा ठरवले की त्यांच्याशी बांधील रहायला हवे. स्वतःला पटलेले व स्वतःनी ठरवलेली नितिमत्ता व नियम म्हणजे स्वतःनी स्वतःला दिलेला शब्द. शब्द पाळण्यासाठी लोकं स्वतःचा जिव देतात अशी कित्येक उदाहरणे पाहीला मिळतील. ही नितिमत्ता आपण हाती घेतलेल्या कामात, आपण करत असलेल्या अभ्यासात, शेजारच्यां बरोबर राहताना आणि दुस-यां बरोबरच्या व्यवहारात अमलात आणायचा प्रयत्न करायला पाहीजे. एकदा ठरवल्यावर नितिमत्तेचे ढोंग करुन उपयोगी नाही. ते म्हणजे स्वतःलाच फसवल्यासारखे झाले. ह्यात काही पुरुषार्थ नाही. आपण ठरवलेल्या नितिमत्ते प्रमाणे वागलात तर स्वतःत आत्मविश्वास जागृत होईल. आपणाला कणखर बनवेल. प्रलोभनांपासुन दुर राहायची शक्ति देईल. नितिमत्तेला धरुन चालणा-याला आपोआपच कठीण प्रसंगाना तोंड देण्यासाठी उत्तरे सापडतात. कठीण प्रसंगात मन शांत राहायला मदत मिळते. मानसिक धैर्य वाढते.
सामजात रहायचे म्हणजे प्राथमीक सुचार शिकले पाहीजेत व वापरले पाहीजेत. त्यांनी स्वतःचाच फायदा होतो. दुस-यांना भेटल्यावर त्याचे पहील्यांदा अभिवादन करायला विसरु नका. त्यानी एकमेकांत नाते जोडले जाते व दुसरा आपल्याला काय म्हणायचे आहे त्याकडे जास्त चांगल्या भावनेने लक्ष देतो. हसतमुख रहा आणि व्यवहार आटोपल्यावर दुस-याला धन्यवाद द्यायला विसरु नका. अशा करण्याने जोडलेले नाते वाढीस लागते. ह्या सोप्या तीन गोष्टी आचरणात आणल्या आपण तर एकदुस-यात मेळ निर्माण व्हायला वेळ लागणार नाही, एक नाते तयार होईल, सद्भावना वाढीस लागेल व त्या योगे दोघांचा फायदा होईल.
- टोकाच्या आवडी-निवडी टाळणे. छांदीष्टपणा टाळणे व स्वतः बद्दलची कीव कमी करणे. स्वतः बद्दलची कीव ही सगळ्यात वाईट गोष्ट आहे. ती कोणत्याही प्रगतिच्या आड येते. प्रत्येक वेळेस कोठचाही उपक्रम हाती न घेण्यासाठी आपण कारणे शोधत राहतो. घालुन दिलेला सरकारी नियम हा आपल्याला कसा लागु होत नाही ह्यासाठी कारणे शोधतो. त्या विरुद्ध अर्ज करतो. आपल्या सोयीप्रमाणे आपण नियम वाकवायचा प्रयत्न करतो. एकदाका आपले काम झाले की मग आपण तोच नियम कसा चांगला आहे व लोकांनी नियमाबरहुकूम का वागले पाहीजे ह्याचे ‘पाढे’ म्हणायला सुरुवात करतो. तीच गोष्ट सामाजिक कार्याच्या बाबतीत सुद्धा, किंवा रोजच्या व्यायामाबाबतीत. जेव्हा अशी गोष्ट हाती घ्यायची वेळ येते तेव्हा हजार कारणे आपल्याला सुचतात व दाखवता येतात. मग आपण स्वतःलाच समजवायचा प्रयत्नात असतो की ‘हा खोकला गेला की रोज सकाळी उठुन फिरायला जाईन’, किंवा ‘माझे अंग दुखायचे जेव्हा कमी होईल तेव्हा मी पळायला जात जाईन’. अशी कीव जो करतो तो अंग दुखायचे थांबले तरी कधी पळायला जाऊ शकणार नाही कारण तो पर्यंत त्याला दुसरे काहीतरी कारण सापडलेले असते. त्यापेक्षा सगळे बाजुला ठेवा मनात निश्चय करा व पळायला जा मग बघा चमत्कार, तुमचे शरीर जादु झाल्या सारखे वागायला लागेल.
आपल्या जवळ जर रोज लागणा-या गोष्टींच्या बद्दल टोकाच्या आवडी निवडी असतील – खायच्या बाबतीत, साफसफाई बाबत, कपड्यांबाबत, चवी बाबत तर आपल्याला खुप त्रास होईल व होत राहील. छोट्या छोट्या कारणांनी तुमचे मन दुःखी होईल. छोट्या छोट्या गोष्टीत मन गुंतले जाईल व तुम्ही दुःखी व्हाल. जर आपल्या आवडी निवडी अशा प्रकारच्या टोकाच्या असतील तर रोजचे येणारे कठीण प्रसंग आयष्याची दुःख समजुन हिरमुसले व्हाल. इतके उगाचच दुःखी व्हाल की, तुम्ही चालु घटकेचा आनंद उपभोगू शकणार नाही. प्रत्येक गोष्टीत व प्रत्येक माणसात उगाचच खोट काढत बसायची सवय लागेल, कोणालाही समजुन घेता येणार नाही, कोणाशीही नाते जोडता येणार नाही व माणसे जोडली जाणार नाहीत. जितक्या जास्ती आवडी निवडी व जितके जास्त छांदीष्ठ तितके तुमची मित्र मंडळी कमी होत जातील व तुम्ही एकटे पडाल. एकटेपणा माणसाला दुःखी करतो. पुढे तुमचे मनोस्वास्थ्य भिघडेल. आयुष्य आनंदाने जगायचे असेल तर एक कान मंत्र लक्षात ठेवायचा – टोकाच्या आवडी निवडी सोडुन द्याव्या. लहानपणा पासुन मुलांना त्यांची टोकाची आवड नावड कशी घातक आहे ते त्यांना समजवले पाहीजे.
- दुरदर्शी बनायचा प्रयत्न करा व स्वतःचे विचार उत्तम, उदात्त व उत्तुंग बनवा.
दुस-यांच्या चांगल्या संस्कारांची पुनरावृत्ती करण्यात काही गैर नाही. शत्रुच्याही चांगल्या गोष्टी आपण आत्मसात केल्या पाहीजेत. आपल्या धर्मात सांगितलेच आहे की रोज सहा गुरु करावेत म्हणजे रोज दुस-यांच्या कडुन सहा चांगल्या गोष्टी शिकाव्यात त्यानी आपली प्रतीभा उत्तुंग होते. इंग्रजांनी १२० वर्षापुर्वी व्हिक्टोराया टर्मीनस (आता छत्रपती शिवाजी टर्मीनस) बांधले. त्या वेळेला २० गाड्या व हजार बाराशे प्रवासी त्याचा वापर करीत होती. पण तो टर्मीनस ईतका भव्य बांधला गेला होता त्यावेळेला, की आज ३००० गाड्या व ३० लाखापेक्षा जास्त प्रवासी तो वापरु शकतात. ह्याला म्हणतात दुरदृष्टी ठेवुन केलेली आखणी. अशी दुरदृष्टीनी केलेली आखणी आपण आत्मसात केली पाहीजे व लहान मुलांना पण अश्या दुरदृष्टी ची सवय लावली पाहीजे. आपण कोणचाही कामाचा आराखडा तयार करताना अशी दुरदृष्टी बाळगली पाहीजे. आपली पिढी जरी ४०, ५० वर्षे त्याचा उपयोग करणारअसूदे पण पुढे येणा-या १० पिढ्यांचा आपण विचार केला पाहीजे. व तशी आखणी केली गेली पाहीजे. त्याच दृष्टीकोनातुन आपली बांधकामे, रस्ते, पुल, खेळाची मैदानं इत्त्यादी आखले गेले पाहीजेत. जरी दुर्दैवाने आपल्या हातात अशी आखणी किवा तिचा कार्यान्वय नसले तरी मनात नेहमी आपल्या राष्ट्रबद्दल चांगले उत्तुंग असे विचार आणावेत. अश्या राष्ट्राविषयी उत्तुंग विचारांची सवय लावण्यानी आपल्या स्वतःच्या दृष्टीमध्ये पुष्कळ फरक पडेल. तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीतला हेकेखोरपणा साडुन द्याल, दृष्टी विशाल बनेल, व रोजच्या जिवनातल्या अडचणींना सामोरे जाताना दुःख होणार नाही.
- आपल्या धर्मातल्या चागल्या नियमांचे पालन काटेकोरपणे करणे. आपले धर्मनिर्देश, आपली धर्म शास्त्रे, घालुन दिलेली धर्म सुत्रे ही आपल्या पुर्वजांनी त्यांच्या अनुभवातुन समाजात आनंदाने आयुष्य जगण्याच्या दृष्टीने दिलेली आपल्याला एक दिशा आहे. ह्या नियमांचे पालन केल्याने आपल्याला आपल्या आत्म्याची प्रगती होण्यास मदत होते. आपली चित्तशुद्धी होते, सचेतन बुद्धी वाढीस लागते. धर्म निर्देश, शास्त्रे, सुत्रे, व्रत, वैकल्ये ही सगळी स्वतःचे मन व आजुबाजुचे वातावरण प्रसन्न बनवण्याच्या हेतुने तयार केली होती व तशी बंधने घातली गेली होती. सामाजिक सौहार्द्रता व समरसता टिकवुन ठेवण्याच्या दृष्टीकोनातून तयार केली गेली होती. त्याला देश, काल पात्राच्या मर्यादा होत्या व अजुनही आहेत. त्या मुळेच प्रत्येकाने हल्लीच्या काळी ही सुत्रे विचार करुन अमलात आणली पाहीजेत. आजच्या देशाच्या गरजा, कालाच्या मर्यादा व पात्रता ह्याचा विचार करुन प्रसंगी त्या सुत्रात यथार्थ बदल करुन त्या त्या सुत्रांचा, व्रतांचा व धर्मनिर्देशाचे पालन केले पाहीजे. सतीची प्रथा कोण्या एका काळी चालु होती आता ती कालबाह्य झाली आहे व आपण ती टाकुन दिली. तीच गोष्ट बाकीच्या चालीरुढीं बाबत लागु आहे. ह्याचा विचार करुन आपल्या धर्माच्या चौकटीत वागले तर आपल्याला मानसिक सुरक्षितता लाभेल. त्याच बरोबर बाकीच्या धर्मातल्या चांगल्या गोष्टी अंगीकारल्या पाहीजेत. आपल्या धर्मात सांगितल्या प्रमाणे जो वागतो त्याला कठीण परिस्थीतीत मार्ग काढायला शक्ती व बुद्धी मिळते, कारण सामान्य माणसाच्या जिवनात येणा-या सगळ्या संभ्रमांवर तोडगा आपला धर्म देत असतो. आपल्या समोर ठाकणा-या सगळ्या व्दिधा मनस्थितींवर उहापोह धर्मात करुन ठेवलेला आहे. आपल्या आयुष्याच्या मार्गावरुन आपण जेव्हा घसरायला लागतो तेव्हा धर्म आपली मदत करतो, आपले रक्षण करतो. म्हणुनच आपल्या धर्मावर विश्वास ठेवा. आपली श्रद्धा असु द्यावी त्यावर पण अंध श्रद्धा टाळावी.
ही दहा सुत्रे व्रता सारखी जो आचरण करेल तो राष्ट्रव्रती. आजच्या देश काल पात्राच्या परिसीमेत आजच्या हिंदु माणसाला जर हिंदुत्वाचा पुरस्कार करायचा असेल तर तो वर्णन केलेल्या दहा सुत्रांप्रमाणे वागुन करता येईल. ह्यालाच राष्ट्रव्रत असे नाव आपण देऊ. ह्यालाच ख-या हिंदुत्त्वाचे पालन करणे असे होते. आता कोणी म्हणेल की मी ही दहाच्या दहा सुत्रे पाळत नाही पण कधी कधी, थोडी थोडी पाळली जातात. व्रत हे एकदा घेतले की थोडे करु, मग करु, आपल्या सोयी प्रमाणे करु असे नसते. घ्यायचे तर पुर्णपणे पाळायचे. आपणच आपल्याला दिलेल्या शब्दासारखे व्रत असते. आपण आपल्याला दिलेला शब्द जर पाळणार नसु तर द्यायचाच का? ह्यात कसला पुरुषार्थ? म्हणुन अर्धा राष्ट्रव्रती किंवा सोयीने राष्ट्रव्रती – अशा राष्ट्रव्रतींचा राष्ट्राला काही उपयोग नाही. राष्ट्रव्रती म्हणजे ही सर्व दहा सुत्रे नेहमी पाळणारा.
शिवाजीने ही जाणीव करुन दिली व समृद्ध साम्राज्य निर्माण केले. ही जाणीव संपली व आपण इग्रजां कडुन पराभूत झालो. आपला आत्मविश्वास आपल्या हिंदु मनाच्या अभिमानाबरोबरच संपला. तो एक दुवा होता देशासाठी आपोआप स्फुर्ती देणारा तोच संपला. संकटाला तोंड देण्याला, कठीण काम करण्यास जी स्फुर्ती लागते ती स्फुर्ती देणारी गुटीकाच नसेल तर माणसाचे हातपाय लटपटायला लागतात. इंग्रजानी हे ओळखले व पहील्यांदा हिंदु धर्माबद्दलचा अभिमानच संपुष्टात आणला. इतका की आजची पिढी नाव घ्यायलाही लाजू लागली. जो मग हिंदु धर्माचा नुसता उच्चार करता झाला त्याला जातीय म्हणून आपली पिढी स्वतःची सुटका करुन घ्यायला लागली. आपल्याला आपल्या शक्तीची परत जाणिव करुन घ्यायची वेळ आली आहे.
(क्रमशः)
Comments
शंका
असे का म्हणता? इमान आणि धर्म विकले की पुन्हा उगवत नाहीत का? भूकबळी जावे की धर्मांतर करावे? आता, भूक ही चटणी-भाकरीचीच असते असे थोडीच आहे? मर्सिडीजची भूक कशी भागवावी? प्रत्येकाला बिल गेटस किंवा निलेकणी बनता येत नाही.
खूपशा पैशांसाठी विकला तर सामोरं जाता येईल का?
--------
सध्या इतकेच विचारतो, या प्रश्नांची उत्तरे मिळाली की पुढील प्रश्न विचारेन.
शंका
असे का म्हणता? इमान आणि धर्म विकले की पुन्हा उगवत नाहीत का? भूकबळी जावे की धर्मांतर करावे? आता, भूक ही चटणी-भाकरीचीच असते असे थोडीच आहे? मर्सिडीजची भूक कशी भागवावी? प्रत्येकाला बिल गेटस किंवा निलेकणी बनता येत नाही.
आपल्या धर्मसुत्रात सुंदर विवेचन आहे त्या वर.
पण प्रत्येकाच्या सदसदविवेक बद्धीला अनुसरुन वागले म्हणजे शहाण्यासारखे वागल्या सारखे होतेच.
खूपशा पैशांसाठी विकला तर सामोरं जाता येईल का?
थोड्याश्या पैशासाठी विकणे आणि खुप पैशासाठी विकणे एकच - आपली लिहीण्याची पद्धत.
बाकी लोभ आहेच
ठीक
म्हणजे, ते विवेचन ज्यांना माहिती नाही त्यांना राष्ट्रव्रत पटणार नाही ना?
भुकेपेक्षाही सद्सद्विवेकबुद्धी शक्तिशाली असते काय? आणि असली, तरी भूकबळी जाण्यापेक्षा सद्सद्विवेकबुद्धी गुंडाळू नये काय?
ज्यांना सामोरं जाता येते त्यांना राष्ट्रव्रतातून सुट्टी मिळेल का?
ज्याना सामोरे
ज्यांना सामोरं जाता येते त्यांना राष्ट्रव्रतातून सुट्टी मिळेल का?
राष्ट्रव्रत भावले तर घ्यायचे. घेतले तर पैशांसाठी विकले जाणे थांबेल. कोणाला भावेल कोणाला नाही. कोणाला आवडेल कोणाला नाही. एक विचार ठेवला आहे.
लोभ आहेच
?
पण राष्ट्रव्रत हे घरच्या लोकांना सामोरे जाण्याची हिम्मत जमविण्यासाठी घ्यायचे आहे ना? की इतर काही उद्देशाने घ्यायचे आहे?
"थोड्याशा पैशासाठी, आत्मा विकुन आपल्या स्वतःला व आपल्या घरच्या लोकांना सामोरं जाता येणार नाही." या विधानावरून तरी असे वाटते की "राष्ट्रव्रतामुळे वैयक्तिक फायदा होतो म्हणून ते घ्यावे" असे तुम्ही सांगत आहात.
समजा, एखाद्याने राष्ट्रव्रत घेतले नाही तर त्याच्या आयुष्यात काय तोटा होतो?
पुढे वाचा
पुढे वाचा पुर्ण झाले नाही अजुन.
आणखी काही सूत्रं
ब्रिटिशांच्या उल्लेखावरून राष्ट्रव्रताची जोपासना करण्यासाठी इतरही काही सूत्रं सुचली.
- सर्वधर्मसमभाव राखा : ब्रिटिशांनी हिंदू व मुस्लिम यांच्यात फोडा-झोडा तंत्र वापरून राज्य केलं. ते टाळण्यासाठी हिंदू व मुस्लिम भाई भाई झाले पाहिजेत. ईद व दिवाळी हे हिंदू व मुसलमान या दोन्ही समाजात सारख्याच उत्साहाने व बंधुभावाने साजरे झाले पाहिजेत.
- जातीभेद पाळू नका : जातीभेद, वर्णभेद यामुळे पोखरून गेलेला समाजच ब्रिटिशांच्या हाती पडू शकला. जातीनिहाय राजकारणाइतकं देशाला कमकुवत करणारं दुसरं काही नाही. तेव्हा जातीभेदाचा धिक्कार करा. जय बलभीम, जय शिवाजी व जय श्रीराम हे नारे एककंठाने द्या.
- स्त्रियांना सबल करा : स्त्रीला तोंडावर देवी म्हणणं पण प्रत्यक्षात तिच्यावर बंधनं घालून तिला कमकुवत ठेवणं याने निम्मी लोकसंख्या राष्ट्रव्रतापासून परावृत्त होते. हे टाळण्यासाठी स्त्री पुरुषांना समान स्वातंत्र्य द्या.
- महात्म्यांचा आदर्श ठेवा : गांधीजींसारखं तत्वाधिष्ठित जीवन जगणारे विरळा. त्यांचा आदर्श कायम डोळ्यापुढे ठेवा.
- त्याज्य रुढी सोडून द्या : बुरसटलेले विचार सोडून जिथे जे नवीन व चांगलं मिळेल ते विचार स्वीकारा व अंगिकारा.
- बुद्धिवादी दृष्टिकोन ठेवा : उठसूट कशालाही देव मानणं व त्यातून कर्मकांडं निर्माण करणं हे समाजहिताविरुद्ध व तद्वतच राष्ट्रहिताविरुद्ध आहे. उदाहरणार्थ सावरकरांनी सांगितल्याप्रमाणे 'गाय हा एक उपयुक्त पशू आहे' (देव नाही) हे लक्षात ठेवा.
माझ्या अल्पमतीला जे सुचलं ते लिहिलं. मूळ लेखातल्या विचारांना या सूत्रांनी पुष्टीच येईल अशी खात्री वाटते.
राजेश
द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी
छान
हो असुशकतात ना
मी एक सुची दिली आहे सुरवात करायला.
!
राष्ट्रव्रतात बीफ सेवन मान्य असेल काय?
वर्षा भोसले
हल्लीच्या आंतरजालीय राष्ट्रव्रतींच्या प्रेरणास्थान, मूल राष्ट्रव्रती, आदरणीय वर्षा भोसले, ह्या गोमांसभक्षण करूनही राष्ट्रव्रती आहेत, त्यावरून ठरवावे.
--
|| बुद्धं सरणं गच्छामि ||
शंका
कृपया संदर्भ द्या. गूगलून कोरॉबरेशन मिळाले नाही.
येथील उल्लेखानुसार वर्षा भोसले रास्वसं च्या विरोधात आहेत.
थोडेफार
त्यांचे काही लेख
तसे नव्हे
धन्यवाद. मी तो दुवा तपासला होता पण तेथे राष्ट्रव्रत हा शब्दप्रयोग सापडला नाही.
राष्ट्रव्रत
हा शब्द अंमळ "नॅशनलिझम" धर्तीचा वाटला. त्यामुळे आदरणीय वर्षाजींचे नाव आपसूक आठवले.
--
|| बुद्धं सरणं गच्छामि ||
आपले लेखन
राष्ट्रव्रतीची १० कलमे वाचली. काही शंकांचे समाधान झाले नाही. उदा. - आपल्या धर्मातल्या चागल्या नियमांचे पालन काटेकोरपणे करणे
या वाक्यावरून मी असे समजतो की तुमच्या धर्मात काही चांगले नियम आहेत काही वाईट. (नाहीतर चांगला शब्द निरुद्देश होतो.) यातील चांगल्यांच आचरण करा आणि वाईटांचे करू नका. तुम्ही दिलेल्या विवेचनात हे चांगले वाईट कसे ठरवायचे हे दिलेले नाही. याबाबत तुमचे काही म्हणणे आहे का? हे चांगले वाईट कसे ठरते? तुमच्या धर्मातील कोणते नियम चांगले आणि कोणते वाईट काही उदाहरणे मिळू शकतील का?
लेखनात विरोधाभास आढळतो (ज्याबद्दल मी पहिल्या लेखांकावरील प्रतिक्रियेत लिहिले होते.) हा विरोधाभास तुम्हाला जाणवला का? का तुमचे म्हणणे दोन्ही बाबतीत सयुक्तिक आहे? एक उदा. म्हणजे अहंभाव कमी करणे. पण लेखात भरपूर उपदेश आहेत. उपदेश करणारा नेहमीच उपदेश ऐकणार्यापेक्षा स्वत:ला जास्त हुशार/ज्ञानी समजतो. हे अहंभावाचे उदाहरण नव्हे का? आणि मग उपदेश कर्ता दुसर्याला सांगताना आपल्याच उपदेशाची पायमल्ली करत नाही का?
तुमच्या उत्तरातून असे जाणवते की तुम्ही 'तुम्हाला पटले तर घ्या नाही तर सोडा' असे काहीसे म्हणायचे आहे. पण पटवायची तयारी फारशी वाटली नाही. (तुमच्या लेखातून तुम्हाला काही पटवायचे आहे असे वाटते. पण उत्तरातून तसे वाटत नाही.)
आपली दशसूत्री बहुतांशांने मान्य होण्यासारखी आहे. पण त्यातील विवेचन हे कधी आक्षेपार्ह तर कधी वस्तुस्थितीला सोडून वाटते.
ही सुत्र जो अमलात आणतो तो हिंदु हा राष्ट्रव्रती असतो. ही सुत्रे आपल्या हिंदुधर्मात वेळोवेळी व वेगवेगळ्या संतांनी, स्मृती, श्रुतीं मधुन निर्देशांच्या रुपाने आधिच अस्तित्वात आहेत.
उदा.
फक्त हिंदू राष्ट्रव्रती असू शकतो. हे आक्षेपार्ह.
तर वरील सूत्रे संत, स्मृती व श्रुती यातून आली आहेत हे वस्तुस्थितीला सोडून. (हे वस्तुस्थितीला धरून असेल तर तुम्ही प्रत्येक सूत्रामागे हे या पुरातन धर्मग्रंथातून आले असे संदर्भ देऊ शकता.)
प्रमोद
काय निवडावे निवडणारे?
'चांगले' या शब्दाची व्याख्या रणजित चितळे सांगतील याची आशा नाही.

Euthyphro दुविधा सोडविणे आस्तिकांना शक्य झालेले नाही:
कमांडमेंट वरून स्मरले:

तुम्ही कोण?
हे सगळं करायला राष्ट्रव्रत कशाला पाहिजे? ख्रिश्चन धर्मात दिलेल्या १० (बालिश) वचनांसारखा तुमचा राष्ट्रव्रताचा क्रायटेरिया वाटतो. हे सगळं म्हणजे 'राष्ट्रव्रत' हे ठरवणारे तुम्ही कोण?
राष्ट्रव्रत
प्रास्ताविकात म्हटल्या प्रमाणे
शेवटच्या भागात राष्ट्रव्रत घेण्यास कोण पात्र आहे, ते कसे घ्यायचे व ते घेतल्याने काय होईल ह्या संबंधाने रुपरेषा दिली आहे.
आपले राष्ट्र बलाढ्य, समृद्ध व कल्याणकारी करायचे असेल व ते तसे टिकवुन ठेवायचे असेल तर पिढ्यां पिढ्यांचा प्रयत्न सतत झाला पाहीजे. हे राष्ट्रबांधणीचे कार्य हा आपला राष्ट्रधर्म झाला पाहीजे, आपला स्वभाव झाला पाहीजे. राष्ट्रव्रताची अशी आपली संस्कृती निर्माण झाली पाहीजे. राष्ट्रव्रत हे प्रत्येकाने त्याच्या कुवतीला धरुन घेतलेले पवित्र व्रत आहे. रामाच्या खारुटली प्रमाणे राष्ट्रबांधणी रुपी सेतू मध्ये घातलेले खारुटलीचे छोटे दगड आहेत. हे राष्ट्रव्रत आपल्या परिवाराच्या कल्याणाच्या आड न येणारे असे आहे. स्वतःवर ओझे न पाडणारे आहे, आपली गैरसोय न करणारे आहे आणि तरी सुद्धा राष्ट्रासाठी लागणारे सुकार्य आपल्या हातुन घडवुन आणणारे आहे.
त्यामुळे बरीच माहीती पुढच्या भागात आहे.
उत्तरे?
ह्या भागातल्या प्रश्नांची उत्तरे कधी? की राष्ट्रव्रतात उत्तरे देण्याची पद्धत नसते?