इंटरनेट हिंदूंचा अप्रामाणिकपणा... आणि विश्वासार्हता

दिल्लीमधील अत्यंत दुर्दैवी घटनेनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी 'बलात्कार भारतात होत नाहीत इंडियात होतात' दुवा असे वादग्रस्त विधान करुन प्रसिद्धीझोतात येण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर पाश्चात्य विवाहव्यवस्था व भारतीय विवाहव्यवस्था यांबाबत काहीतरी गोलमोल विधाने करुन आणखी गोंधळ उडवून दिला. कोणत्याही स्वरुपाच्या बाईट्ससाठी टपून बसलेल्या प्रसिद्धीमाध्यमांनी लगेचच हा मुद्दा उचलून धरला. रा.स्व.संघाबाबत जनतेच्या मनात असलेला कमालीची अविश्वास आणि संघाच्या फुटीरतावादी धोरणांविषयीची अप्रीती यामुळे सामान्य जनतेचा या गोष्टींवर चटकन विश्वास बसणे साहजिकच होते. मात्र नव्या जमान्यातील यूट्यूब व तत्सम माध्यमांतून भागवत यांचे भाषण जसेच्या तसे ऐकल्यानंतर काही माध्यमप्रतिनिधींना उपरती झाली आणि त्यांनी ट्विटरवर का होईन माफी मागितली. (मात्र भारत-इंडिया या बलात्काराच्या थिअरीच्या विरोधात अनेक पुरावे सादर करुनही भागवत यांनी कुठेच माफी मागितली नाही हे विशेष!) यानंतर पुढचे अतिशय अप्रामाणिक प्रकरण घडले.

माध्यमांनी माफी मागितल्यावर इंटरनेट हिंदूंनी विविध ठिकाणी हा विषय वाजवायला घेतला. (इंटरनेट हिंदू या शब्दाची थोडक्यात व्याख्याः Internet hindus are defined as anonymous trolls and serial abusers, Hindu nationalists and other right wingers are making a serious play to dominate social media.) मात्र या एकंदर चर्चांचा अविर्भाव माध्यमांचा अप्रामाणिकपणा किंवा विश्वासार्हता हा नसून माध्यमांच्या गटारगंगेद्वारे संघाला शूचिर्भूत करवून घेणे हा होता असे दिसते.

भारतातील कुठल्याही बऱ्यापैकी समंजस व्यक्तीचा माध्यमांच्या प्रामाणिकपणावरील विश्वास कधीच उडाला आहे.मात्र माध्यमांच्या अप्रामाणिकपणाच्या गाड्याखाली संघाच्या नळाची यात्रा घडवण्याचे काहीच कारण नाही.

माध्यमे चुकीची ठरली असली तरी त्यामुळे संघ बरोबर ठरत नाही.

उपक्रम संकेतस्थळावरील सदस्य बऱ्यापैकी पुरोगामी आहेत. त्यामुळे उपक्रमींची निष्पक्ष मते वाचायला आवडतील.

Comments

समज-गैरसमज

दुर्दैवाने पाकिस्तान ला दुखावणे म्हणजे भारतातल्या मुस्लिमांना दुखवणे असा समाज मिडिया, काँग्रेस, समाजवादी आणि साम्यवादी लोकांचा आहे.

निर्देश केलेल्यांचा असा समज आहे, असा गैरसमज निर्देश न केलेल्यांचा आहे! अन्यथा ६५ आणि ७१ घडलेच नसते!

बाकी चर्‍हाट चालू द्या!!

सर्वांचे आभार

समतोल व परिपक्व चर्चा घडवून आणणाऱ्या सर्वांचे आभार

नाण्याची दुसरी बाजू

काय निवडावे निवडणारे?

संघ आणि माध्यमे दोन्ही वाईट म्हटल्यावर माध्यमांमुळे संघाचा फायदा होत असल्यास आपण काय करणार? (किंबहुना, आधी टीका करावयाची आणि नंतर माफी मागावयाची हा संघसमर्थक व्यक्तींचा डावच असू शकेल की!)
या प्रकरणात इंटरनेट हिंदू जिंकले म्हणून सोडून द्या.
--
भागवत यांच्या विधानांतून मला दोन अर्थं दिसले. 'इंडियातील लोक अधिक बलात्कार करतात' असा स्पष्ट अर्थ तो असत्य असला तरी ती तथ्यात्मक चूक (फॅक्च्युअल एरर) म्हणता येईल. भागवत यांच्या विचारसरणीला तो संदेश सोयीचा असल्यामुळे त्यांना तो सुचला असू शकेल.
मात्र, एक दुसरा अस्पष्ट अर्थसुद्धा दिसला की इंडियातील लोक बलात्काराला आवाहन देणारे वर्तन करतात. 'उत्तेजक कपडे घालणार्‍या व्यक्तीवर बलात्कार झाल्यास बलात्कार्‍यांना कमी शिक्षा द्या' अशा प्रकारचा तो अर्थ आहे. हा अर्थ अधिक टीकार्ह आहे.

 
^ वर