कर नाही, त्यालाच डर नाही !
महान भारताच्या महान लोकशाहीत संसद गेली १४ दिवस बंद आहे. बातम्यांनी वृत्तपत्रांची पाने वाहून जात आहेत. कोण 'योग्य', कोण 'अयोग्य' ह्याचे रोज विविध विचार वाचून नक्की काय ते कळत नाही.विविध वृत्तपत्रांमधून ज्या पद्धतीने हि परस्थिती हाताळली गेली हवी होती असे ठासून सांगितले जाते, तेव्हा त्यांनी आजच्या आदर्श पद्धतीचा अभ्यास केलेला असतो नि नसतो, ह्याचाच विचार मनात येतो.
ढोबळ मुद्धे :
१) विरोधकांनी जे संसदबंद चालू केले आहे ते कितपत योग्य आहे ? नसेल, तर मग दुसरा प्रभावी उपाय कोणता ?
२) सरकार विरोधकांची 'संयुक्त संसदीय समिती' (जेपीसी) मागणी मान्य का करत नाही ? असे करण्यामागे सरकारची काय जी भूमिका आहे, ती कितपत योग्य आहे ?
३) गेली १४ दिवस जे संसद बंद आहे त्याची जबाबदारी खरोखर कोणाची ? सरकारची, विरोधकांची, जनतेची कि सर्वांची ?
४) आज सरकारला कोंडीत न पकडता, संसदेत केवळ चर्चेद्वारे मूळ भ्रष्टाचारावर खरोखरीच नियंत्रण आणता येईल काय ?
५) 'संयुक्त संसदीय समिती' (जेपीसी) ची स्थापना जर झाली तर त्याने सरकारला काही तोटा होऊ शकतो का, कि विरोधकांना काही फायदा ?
विरोधी पक्षांची मागणी असंसदीय किंवा संसदविरोधी आहे काय, या प्रश्नाचे उत्तरही "होय' असे देणे अवघड आहे. विविध प्रचार माध्यमांचा सूर असा दिसत आहे कि संसद गोंधळामुळे ९५ कोटींचा भुर्दंड तिजोरीवर पडला आहे, पण जिथे लाखो करोडो रुपयांच्या घोटाळ्याची चौकशी निष्पक्षपणे करून दोषींना सजा देण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे, तिथे ९५ करोड पणाला लावले तर ते योग्य ठरेल काय ? कि ९५ कोटी वाचविण्यासाठी कामकाज आहे त्याच पद्धतीने पुढे जाऊन द्यायचे आणि भविष्यात पुन्हा परत पहिले पाढे पंचावन्न ?
उपक्रमियांना काय वाटते ?
अधिक वाचनासाठी दुवे :
http://72.78.249.124/esakal/20101202/4686897583712771926.htm
http://72.78.249.124/esakal/20101202/5644089233050370712.htm
http://72.78.249.124/esakal/20101202/5534412479250946362.htm
http://72.78.249.124/esakal/20101203/4709642710324116329.htm
http://72.78.249.124/esakal/20101203/5176179306440625244.htm
http://72.78.249.124/esakal/20101129/4694954486635855192.htm
http://72.78.249.124/esakal/20101203/5224506154514494938.htm
http://72.78.249.124/esakal/20101203/4774364087680602051.htm
http://72.78.249.124/esakal/20101202/4720652688987652872.htm
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/7029954.cms
http://timesofindia.indiatimes.com/india/Oppn-stalls-Parliament-demands-...
सरते शेवटी केवळ एकच म्हण आठवते 'कर नाही केवळ त्यालाच डर नाही'
Comments
त्यालाच ?
शिर्षकामधे "त्यालाच " हा शब्द का वापरला आहे ?
---------------------
वाद विवादात "जो शेवटचं वाक्य बोलतो / लिहीतो तो जिंकला" असा समज is = गैरसमज
-धनंजय कुलकर्णी
कर नाही?
आपले संसदप्रतिनिधी कर भरत नाहीत का?
आणखी
आणखी एक मुद्दा.
या बातमीत म्हटल्याप्रमाणे लोकसभेने शेवटच्या दिवशी ४४००० कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर केल्या.
१४ दिवस एका मुद्द्यावर संसदेचे कामकाज रोखून धरून या ४४००० कोटींवर पुरेश्या चर्चेशिवायच मंजूरी मिळाली. पुढे आपण केव्हातरी "राष्ट्रकुल स्पर्धांसाठी मंजूरी कोणी दिली?" असा प्रश्न विचारू. ;)
नितिन थत्ते