कन्नमवार नगर (विक्रोळी ,पुर्व) मुंबई

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कनमवार नगर, विक्रोळी येथील सभेत उत्तर भारतीयांविरोधात जे विधान केले . व त्यांची अटक आणि सुटका तेथील न्यायालयात झाली . त्यामुळे अचानक कन्नमवार नगर चे नाव सगळीकडे झाले.
तर अशा कन्नमवार नगर ,विक्रोळी येथील भागाविषयी आम्हाला मिळालेली माहीती.
मध्य रेल्वेच्या विक्रोळी (पुर्व )या उपनगरापासून अवघ्या १५ मिनिटांवर कन्नमवार नगर आहे. महापालीकेच्या 'एस ' विभागात हा प्रभाग येतो. प्रभागाचा क्रमांक आहे ११२.साधारण ६० ,७० च्या दशकात वसलेली अशी ही म्हाडाची वसाहत . या वसाहतीने आशिया खंडातील सर्वात मोठी म्हाडाची आदर्श वसाहत म्हणुन नाव मिळवलेले आहे. एकुण २६५ इमारती ,प्रत्येक इमारतीला स्वतंत्र नंबर, एक कामगार कल्यांण मंडळ, महानगर पालिकेचे क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले रुग्णालय, विकास हायस्कूल शाळा समुह, मुलिंचे अस्मिता महाविधालय, पोलीस स्टेशन ,बस इ. सेवा या विभागात येतात. एक अस्सल मराठमोळी मध्यमवर्गी वसाहत म्हणजेच कन्नमवारनगर असे आपण म्हणू शकतो.
खेळाचे गोलाकार असे छत्रपती संभाजी मैदान हे तर येथील वैशिष्ट्ये आहे. तेथील कट्टे व म्युझिकल जॉगिंग ट्रॅक सकाळी (पहाटे पासूनच आणि संध्याकाळी हाऊसफुल असतात. वृध्द मंडळीचे प्रभात मित्र मंडळ तर तेथे प्रसिध्द आहे. अजुन खेळाचे मैदान म्हणजे हुतात्मा रविंद्र म्हात्रे मैदान तेथील उत्कर्ष व्यायामशाळा दहीहंडी, शरीरसौष्ठव स्पर्धा ,उत्कर्ष व्याख्यानमाला या करीता प्रसिध्द आहे. या विभागात बस क्रं ३९४,३९७ (कन्नमवार नगर ते विक्रोळी स्टेशन(पुर्व), ३५४ (कन्नमवार नगर ते शिवाजी पार्क), ३८८ (कन्नमवार नगर ते पोयसर आगार),
१८५ (कन्नमवार नगर ते मजास आगार) या शिवाय पुर्वद्रुतगती मार्गावरून ३६८ (शिवडी,मुलुंड(पुर्व)),३७३(वांद्रे स्टेशन (प) ते वैशाली नगर (मुलुंड,प.),३५३ (वडाळा आगार,टागोर नगर ५ ) या बेस्टच्या बससेवा उअपलब्ध आहेत.
या विभागात अजिबात रहदारी नाही. सर्वत्र हिरवीगार झाडे नजरेस पडतात. या विभागाला लागूनच पुर्वद्रुतगती मार्ग आहे. येथे फक्त राहण्यासाठीच वसाहत आहे . व्यापारी संकुल् नाहीत.
लोकशाहीर विठ्ठल उमप,संगितकार विठ्ठल शिंदे, माजी महापौर दत्ता दळवी, नाट्यनिर्माते दिग्ददर्शक जनार्दन लवंगारे, खासदार एकनाथ गायकवाड, जेष्ठ पत्रकार काकासाहेब पुरंदरे, प.म. राऊत सर(मुख्याधापक विकास हायस्कूल शाळा समुह),साहित्यीक वामनराव होवाळ, इत्यादी मान्यवर व्यक्ती येथे राहतात.
सर्वात आधी काँग्रेसचा बालेकिल्ला हा विभाग होता. अलकाताई देसाई नगतसेवक म्हणुन सतत येथून निवडून येत होत्या. अचानक वारे पालटले (साधारण ९० च्या दशकात)आणि शिवसेनचा बालेकील्ला म्हणुन कन्नमवारनगर नावारुपाला आले त्यामुळे नगरसेवक दत्त्ता दळवी यांना महापौर पदाचा मान मिळाला. पण मागिल मनपा निवडणूकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मंगेश सांगळे येथुन विजयी झाले. आता हा विभाग मनसेचा बालेकिल्ला होण्याच्या मार्गावर आहे.

पण या म्हाडावसाहतीत पुर्नविकासाचे वारे वाहू लागले आणि येथील वातावरण पलटत आहे. एक अस्सल मराठमोळी वसाहत नष्ट होणार की काय अशी भिती वाटायला लागलेली आहे. विकासक येथे येत आहेत आणि येथील रहीवाशांना उंच ,उंच टॉवर ची स्वप्न दाखवत आहेत. काही स्थानिक माणसेही या विकासकांना सामिल आहेत. त्यामुळे काय होणार या नगराचे ही चिंता लागुन राहीली आहे .आतापर्यंत येथील ५ इमारती विकासकाच्या(बिल्डर हो) ताब्यात गेल्या आहेत.

आपण एकदा याच कन्नमवार नगर पाहून

आपला
कॉ.विकि

लेखनविषय: दुवे:

Comments

चांगली माहिती.

माहिती आवडली. आज नाही तर उद्या सर्वच जागा या विकासकाच्या ताब्यात जाणारच आहे.

द्वारकानाथ जी

प्रतिसाद लिहील्याबद्दल धन्यवाद. विकासाच्या नावाखाली मराठी माणुस मुंबईतून हद्दपार होणार हे मात्र नक्की.
आपला
कॉ.विकि

काय करावे?

विकासाच्या नावाखाली मराठी माणुस मुंबईतून हद्दपार होणार हे मात्र नक्की.

हे मान्य आहे विकीसाहेब. फक्त याला आपल्याला सुचलेला अथवा योग्य वाटणारा उपाय काय?

फर्स्ट दे केम फॉर द ज्यूज्

हे सर्व वाचताना मला बॉस्टनमधे एक ज्यू लोकांवर नाझींनी केलेल्या जर्मनीतील अत्याचारांवर होलोकॉस्ट मेमोरीयल आहे त्याच्यावर वाचलेल्या वाक्याची आठवण झाली:

First They Came for the Jews
First they came for the Jews
and I did not speak out
because I was not a Jew.
Then they came for the Communists
and I did not speak out
because I was not a Communist.
Then they came for the trade unionists
and I did not speak out
because I was not a trade unionist.
Then they came for me
and there was no one left
to speak out for me.
- Pastor Martin Niemuller

मराठी माणूस मुंबईतून हटवला जात आहे ती लढाई कन्नमवार नगर ला येई पर्यंत आपल्याला त्याचे महत्व वाटले होते का? आज आपले तेच होत आहे असे वाटत नाही का? केवळ मुंबईतील मराठी म्हणून नाही तर सर्वच बाबतीत - कधी मराठी म्हणून, कधी मध्यमवर्गीय म्हणून, कधी हिंदू , निधर्मी - निव्वळ भारतीय नागरीक म्हणून, कधी विद्यार्थी म्हणून तर कधी शिक्षक, शेतकरी इत्यादी म्हणून.

पण सर्वच म्हणणार मला काय त्याचे? थोडक्यात पुढ्च्यास ठेच लागली तरी मागचा शहाणा होत नाही कारण तो आंधळा असतो म्हणून नाही तर डोळेझाक केलेली असते म्हणून....

व.पु. काळ्यांनी कुठेतरी म्हणले होते की, "आपण तीन शब्दांसाठी जगतो - लोक काय म्हणतील?" मला वाटते तसेच जेंव्हा सामाजीक प्रश्न सोडवायची वेळ येते तेंव्हा आपण तीनच शब्द जगतो, "मला काय त्याचे?"


प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

वा!

वा विकासराव!

सामाजीक प्रश्न सोडवायची वेळ येते तेंव्हा आपण तीनच शब्द जगतो, "मला काय त्याचे?"

काय बोललात.. सह्ही!!!
वरची कविताही थेट भिडली..

-ऋषिकेश

विकास साहेब

मराठी माणूस मुंबईतून हटवला जात आहे मुंबईत परप्रांतीय वाढत आहेत हे मी मनोगत ,उपक्रम आणि आता मिसळपाववर सातत्याने मांडत आहेत.पण आपण करणार काय .केवळ भ्रष्टाचारामुळेच असे होत आहे.तुम्हीच पहा ना राज्य मराठी,भाषा मराठी,माणसे मराठी,राज्यकर्ते मराठी ,पोलीस मराठी,म्युनसीपालटीचा कारभार मराठी तरीही मुंबईत मराठी माणूस कमी होत आहे.काय करणार आपण.

कन्नमवार नगराविषयी म्हणत असाल तर ती म्हाडाची वसाहत आहे म्हाडा अधिकार्‍यांनी जर मनावर घेतले तर ते स्वतःच या नगराचा विकास करू शकतात पण................

आपला

कॉ.विकि

 
^ वर