हे सुरांनो चंद्र् व्हा ....

हे गाणे मी पहिल्यांदा कॉपी पेस्ट्च्या वयांत ऎकलं, म्हणजे १७-१८चा असताना. दुरदर्शन वर बहुधा आरती पाटिल अश्या नावाची कोणी गायिका होती. आता नाव नक्की आठवत नाही, पण त्या काळांत गाणं जास्त लक्षात राहिलं ते त्या गायिकेच्या दिसण्यामुळं, तिचा चेहरा आणि तिची तवला वाजवणा-या कडं पाहतानाची नजर, त्या नजरेत एक प्रकारचा धाक होता किंवा अधिकार होता.

हे गाणं चारच ऒळींचं, अगदि टिपीकल नाट्यसंगीत, थोडेसेच शब्द आणि त्या बरोबरच्या सुर, आलाप, तानांच्या नाना हरकती. नाट्यसंगीत हा प्रकारच असा आहे की इथे मुळच्या रागदारीचे सुर, आलाप वगॆरे त्या थोड्याश्या शब्दांना जिवंत करतात की, मुळच्या सारेगमला हे शब्दांचं आवरण एवढं सुंदर बनवतं,की माझ्यासारख्या शास्त्रीय संगीताबद्दलच्या अगाढ अज्ञानी माणसाला सुद्धा हे संगीत नितांत सुंदर आणि जवळचं वाटतं.

तिचं झालं आहे भांडण जिवलगाबरोवर आणि तो निघुन गेला आहे. प्रेम हे असंच असतं प्रेमाच्या एका विशिष्ट काळांत कमालीची ऒढ,आपलेपणा ह्या गोष्टी स्वामित्वांत कधी बदलतांत कळत देखिल नाही,आणि त्यात ती गायिका,जेंव्हा त्याच्या प्रेमांत धुंद नसेल तेंव्हा सप्तसुरांच्या बर्षावात चिंब भिजणारी आणि भिजवणारी. खरंतर तो तिच्या आयुष्यांत येण्यापुर्वी हे सुरच तिचे जिवलग होते, पण आता तो ही आहे.

आज झाले काय की त्याला भेटायची वेळ टळुन गेली आणि तिला झाला उशिर तिचा रियाझ लवकर न संपल्यामुळं. गुरुजी म्हणाले देखिल कि आज तुझा आवाज जास्तच छान लागला होता, आणि त्या कॊतुकांत थोडा उशिर झाला खरा. पण त्याच्यातल्या पुरुषाला एवढं कारण पुरेसं होतं आणि तो चिड्ला निघुन गेला. मग आता अचानक एक पोकळी जाणवते आहे. मग हि पोकळी भरायला तिच्या मदतीला तिचे मित्र सुरच उभे नाही राहिले तर नवलच. कालिदासांच्या जवळ जसा मेघ होता तसा हिच्याकडं सुर होते, हक्काचे अगदी हुकुमत होती त्यांच्यावर. पण आता तर तो खुप दुर गेला असेल ते सुर पोहोचतील त्या पेक्षा खुप लांब.

तिला वाटलं की त्याच्या चिडण्याचं कारण पण हेच सुर होते, म्हणुन त्यांच्यावर पण चिडावं त्यांना रागवावं. तसं यावेळी राग काढायला जवळचं कुणीतरी हवंच होतं. तुमच्यामुळं तो गेला ना आता मी तुमच्यावर कशि रागावते ते पहाच. तिच्या रागाची कल्पना येउन सुर तिला म्हणाले बघ बाई आम्ही तुझे मित्र आता या क्षणी तुझ्या रागानं आम्हालाही दु:ख होतं आहे, आमची काही मदत होत असेल तर सांग करु आम्ही जेवढं जमेल तेवढं. अशा क्षणी तिला केवढा आधार वाटला या शब्दांचा. कोरड्या पडलेल्या विहिरीत एका कोप-यातुन अलगद एखादा झरा फुटावा आणि खालच्या तापलेल्या खडकाला त्यानं क्षणार्धात थंड करावं अगदी स्वताची वाफ झाली तरी त्याची पर्वा न करता तसं वाटलं तिला.

या जुन्या, न रागावणा-या मित्रांना तिनं मनापासुन धन्यवाद दिले आणि सांगितलं

हे सुरांनो चंद्र व्हा

तो गेला आहे लांब कुठेतरी काही ठावठिकाणा नाही, म्हणुन तुम्हीच आता चंद्र व्हा आणि तुमच्या चांदण्यांचे कोष बनवुन त्यांना माझ्या प्रियकराकडे पाठवा.सुर अगदी आनंदानं तयार झाले हे करायला पण, पण चंद्र होणं त्यांना समजलं, तो कुठं आहे ते पाहणं पण समजलं ठिक, मग हे चांदण्यांचे कोष कशासाठी गं? सुर असलं ते सुद्दा तिचे मित्रच होते त्याच्या ही आधिपासुनचे, थोडा त्याच्या बद्दल राग त्यांनाही होताच.

वाट एकाकी तमाची, हरवलेल्या माणसाची,

ती म्हणाली , अरे सुरांनो तुम्ही दॆवी आहांत,स्वयंभु आहांत पण तो तसा नाही. तो साधा माणुस आहे आणि आता तर चिड्लेला, रागावलेला. एकदा का राग आला ना की मग ओळखीच्या वाटा पण अनोळखी वाटायला लागतात, जवळची माणसं दुरची वाटतात, सगळा अंधार होतो,काही म्हणजे काही कळत नाही, अशावेळी आपलंच कोणितरी लागतं रे वाट दाखवायला. आज कितीतरी दिवसांनी त्याला भेटायचं होतं आणि त्यामुळं तर आज विरहिणि गातांना मी तुमच्या जवळ आले होते. मग तो चिडला गेला निघुन कुठेतरी एकटाच रागाच्या अंधारात, आणि या रागाच्या अंधारात तो नेहमीच्या वाटा देखिल चुकत असेल, कारण वाटा कधिच चुकत नसतांत, चुकतांत ती आपलीच माणसं, मग त्यांना परत नको का आणायला, सांगा बरं.

बरसुनि आकाश सारे अम्रुताने नाहवा

तेंव्हा आता तुम्हि चंद्र व्हा आणि तुमच्या चांदण्या या सा-या आकाशांत विखरुन टाका, जसा आषाढातला मेघ बरसतो ना तसंच आज तुमचं हे चांदणं बरसुद्या. तुमच्या या बरसणा-या चांदण्यांच्या अम्रुतधारांनी त्याला नाहवुन टाका, मग त्याचा राग शांत होइल आणि त्याला त्याची परतीची वाट ओळखु येउ लागेल.

हर्षद्

पुर्वप्रकाशित् - http://www.harshad-gaaanikha.blogspot.com/

लेखनविषय: दुवे:

Comments

हे जरा

हे जरा ललित वाटते आहे. उपक्रमाच्या ध्येयधोरणात बसते का ?

(कारण सुरांमधील तरंगलांबी आणि चंद्राच्या प्रकाशातील ऊर्जेची सांगड घातल्याशिवाय, सुरांना, चंद्र व्हा, असे कसे सांगता येईल ?)

--
|| बुद्धं सरणं गच्छामि ||

हॅहॅहॅ

आता तर तो खुप दुर गेला असेल ते सुर पोहोचतील त्या पेक्षा खुप लांब

वेग, त्वरण, इ. संकल्पनांशिवाय, हे विधानही ढगांतलेच वाटते.

लेख आवडला

छान लेख.. आवडला


हे जरा ललित वाटते आहे. उपक्रमाच्या ध्येयधोरणात बसते का ?

टारगेट वाचक डोळ्यासमोर ठेऊन ललित अंगाने दिलेली माहिती / अनुभव उपक्रमाच्या धोरणात बसतो असे वाटते.

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

लेखाचा आस्वाद घेता आला नाही.

लेख वाचला पण वाचून ही तो चावता आला नाही. प्रेमात पडून बराच काळ लोटला, पडलेल्याच्या जखमा देखील बर्‍या झाल्या. आता केवळ मनावर त्या जखमांचे डाग उरले आहेत. ती स्वप्नाळू दृश्टी आता नाहीशी झाली आहे, त्यामुळे हा लेख वाचून ही चावता आला नाही.

 
^ वर