कल्पनागार - भाग २
या आधीच्या भागाला मिळालेला भरघोस (?) प्रतिसाद लक्षात घेऊन ह्या उपक्रमात थोडा बदल केलेला आहे. आता एका विदागाराविषयी फक्त 'त्याचे काय कराल?' हा प्रश्न न देता. त्याविषयी अधिक प्रश्न विचारण्यात येतील. तर, कल्पनागाराचा हा दुसरा भाग.
भारतातील किंवा अन्य कुठल्याही देशातील सर्व वाहनांत एक असे उपकरण लावले, की जे एका विशिष्ट वारंवारितेच्या तरंगाला (सिग्नल फ्रॉम अ फ्रीक्वेन्सी रेन्ज) परावर्तित करते. हा तरंग परावर्तित व्हायला किती वेळ लागतो, ह्यावरून ते उपकरण तरंग-प्रक्षेपकापासून किती दूर आहे, हे प्रक्षेपकाला कळू शकते. तरंग परावर्तित करताना हे उपकरण आपला अनुक्रमांक देखील पाठवते, त्यामुळे प्रक्षेपकाला हे कोणते उपकरण आहे, ते लगेच कळू शकते.
ह्या उपकरणाची जागा (अक्षांश, रेखांश) कळण्यासाठी ह्या उपकरणाशी एकाचवेळी संपर्क साधू शकणारे किती प्रक्षेपक लागतील ?
प्रक्षेपकाने दोन तरंग प्रक्षेपित करताना दोघांत किती वेळेचे अंतर ठेवावे म्हणजे वाहनाचे स्थान एका मीटरच्या परीघाइतके अचूकपणे ठरवता येईल ?
सर्व प्रक्षेपकांकडून एका मध्यवर्ती संगणकाकडे (वाहनक्रमांक, अक्षांश, रेखांश) ही माहिती एकसारखी पाठवली जाते. ह्या प्रक्षेपकाची वाहनक्षमता (बँडविड्थ) किती असावी ?
मध्यवर्ती संगणकाची वाहनक्षमता किती असावी ? (प्रक्षेपकांवर माहितीच्या साठवणुकीसाठी अत्यंत कमी जागा उपलब्ध आहे, हे गृहित धरावे.)
समजा एका देशातील सर्व वाहनांकडून मिळालेला हा विदा, म्हणजे (वेळ, वाहनक्रमांक, अक्षांश, रेखांश) ह्या बहुकांची (टुपल्स) यादी, म्हणजे आपले विदागार. हे साठवायला किती जागा लागेल (बाईट्स?)
हे विदागार तुम्हाला उपलब्ध झाले, तर तुम्ही कुठले निष्कर्ष काढू शकाल ?
युरोपासारख्या खंडात, जेथे प्रायव्हसीला (पडतपावशी) खूप महत्व दिले जाते. तेथे प्रायव्हसी जपण्यासाठी ह्या विदागाराचे स्वरूप कसे असावे ?
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा किंवा सदस्य व्हा
माझे निष्कर्ष
आपण विचारलेल्या एकूण ७ प्रश्नांपैकी पहिले ५ अत्यंत तांत्रिक स्वरुपाचे असून ६ वा प्रश्न मात्र तार्किक स्वरुपाचा आहे आणि ७ व्या प्रश्नास तांत्रिक व तार्किक अशा दोन्ही बाजू आहेत.
१) ह्या उपकरणाची जागा (अक्षांश, रेखांश) कळण्यासाठी ह्या उपकरणाशी एकाचवेळी संपर्क साधू शकणारे किती प्रक्षेपक लागतील ?
२) प्रक्षेपकाने दोन तरंग प्रक्षेपित करताना दोघांत किती वेळेचे अंतर ठेवावे म्हणजे वाहनाचे स्थान एका मीटरच्या परीघाइतके अचूकपणे ठरवता येईल ?
मला वाटतं वरील दोन्ही प्रश्नांचे उत्तर जीपीएस तंत्रज्ञानामध्ये आहे. उपग्रहाचे संदेश वहन तंत्रज्ञान वापरल्यास ज्या विशिष्ट भूभागा वरील वाहनांची माहिती मिळवायची असेल तो भूभाग सतत २४ तास कव्हर करु शकतील तेवढे उपग्रह लागतील.
६) हे विदागार तुम्हाला उपलब्ध झाले, तर तुम्ही कुठले निष्कर्ष काढू शकाल ?
मला वाटतं या प्रश्नाचा रोख 'कुठले निष्कर्ष काढू शकाल' यापेक्षा 'हे निष्कर्ष कशासाठी वापरता येतील' हा असावा.
अशी माहिती वाहतुक कंपन्यांना वाहनांची अद्यावत स्थिती कळण्यास खूप उपयोगी आहे.
एखाद्या विशिष्ट मार्गावरुन वाहतुकीचा ओघ किती आहे हे कळू शकते, त्याने वाहतुकीचे सुयोग्य नियोजन करता येईल.
- जयेश
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा किंवा सदस्य व्हा
उपग्रह
विशिष्ट भूभागा वरील वाहनांची माहिती मिळवायची असेल तो भूभाग सतत २४ तास कव्हर करु शकतील तेवढे उपग्रह लागतील
कमीतकमी चार किंवा सहा उपग्रह लागतील !
एक उपग्रह हा जास्तीत जास्त २०००० किलोमीटर वर लक्ष ठेवू शकतो.
क्षमा असावी,
माझी ही माहीती चूकीची आहे व बरोबर माहीती खाली मिलिंद साहेबांनी दिलेली आहे.
राज जैन
काहीतरी करावे हा विचार मनात असणे म्हणजेच तुम्ही जिवंत आहात ह्याचे लक्षण आहे !!! काय म्हणता !
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा किंवा सदस्य व्हा

डोके खाजवा..
मला या बाबतीत तांत्रिक ज्ञान काहीच नाही. पण थोडी फार माहिती आहे ती अशी...
भारतात टाटा मोटर्सने असे काम केले आहे. त्यांना मदत करणारी त्यांचीच उपकंपनी आहे. टाटा टेक्नॉलॉजीज. भारतातल्या ट्रक चालकांना शोधण्यासाठी ह्या माहितीचा वापर करण्याचा त्यात मानस आहे.
त्यासाठी
त्यासाठी (म्हणजे ट्रकला स्वतःचे ठिकाण कळावे म्हणून) जीपीएस रिसीव्हर वापरला आहे का ? कारण सर्व प्रमुख रस्त्यांवर मोबाईलच्या सेल टॉवर सारखे मनोरे उभारले नसावे. किंवा मोबाईलच्या टॉवर वरच ही यंत्रणा (म्हणजे पिंग करणारी) बसवण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. अधिक माहिती आवडेल.
अर्थात मूळ उपक्रमाचे उद्देश्य 'हे विदागार उपलब्ध असल्यास त्यावरून कुठल्या निष्कर्षाप्रत पोचता येईल?" ह्या प्रश्नाची उत्तरे शोधणे आहे.
- सर्किट
--
सर्किटधर्मात कुठलाही शुद्धिचिकित्सक वापरत नाहीत.
मोबाईल टॉवर
मला वाटते कि मोबाईल टॉवर वापरले आहेत. या बद्दल त्यांनी माहिती कुठेच जास्त जाहिर केलेली नाही. पण अलिकडे त्यांची या तंत्रज्ञान तयार करण्यावर बरिच महत्वाकांक्षा आहे असे कळते.
नवीन टाटा इंडिका गाडी सोबत एक सिम कार्ड येते असे हि ऐकले आहे. अर्थात हि सगळी ऐकिव माहिती आहे. मला सुद्धा अधिक माहिती मिळवायला आवडेल.
माझी माहीती !
टाटा ने ट्रकसाठी GPS वापरला आहे,
GPS मध्ये असे का केले आहे की वाहनाची जागा ही २-३ किमी च्या रेंज मध्येच दाखवले जाते ?
माझ्या माहीती प्रमाणे GPS हा इंच इंच जागेची ९९.९ टक्के बरोबर माहीती देऊ शकतो ! मग टाटा अथवा अशी व्यवसायीक सेवा देणा-या सर्व संस्थेला ९० % च माहिती देण्याची अट का केली असावी भरत सरकार ने ?
जर माहीती असेल तर येथे द्यावी ही विनंती !
राज जैन
काहीतरी करावे हा विचार मनात असणे म्हणजेच तुम्ही जिवंत आहात ह्याचे लक्षण आहे !!! काय म्हणता !
जीपीएस
राज,
जीपीएस् तंत्रज्ञानात एकाच दिशेने संवाद होऊ शकतो. म्हणजे ट्रकमधल्या उपकरणाला स्वतःचे अक्षांश रेखांश कळू शकतात. ते मध्यवर्ती संगणकाकडे पोहोचवण्यासाठी टाटांनी काय वापरले आहे ? बहुधा सेलफोनचे तंत्रज्ञान वापरले असावे.
जीपीएस तंत्रज्ञानाचा दुरूपयोग प्रायव्हसीच्या उल्लंघनासाठी वापरता येऊ शकतो, त्यामुळे रिसोल्युशन कमी ठेवण्याची अट घातली असावी.
(जीपीएस तंत्रज्ञानाची अचूकता १५ मीटर्स इतकी आहे. तुम्ही म्हणता तशी इंच इतकी नाही.)
- सर्किट
--
सर्किटधर्मात कुठलाही शुद्धिचिकित्सक वापरत नाहीत.
ही साईट पहा